शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:40 IST

Sarva Pitru Amavasya 2024: स्वतःचेच श्राद्धविधी तेही जिवंतपणी करण्याची सोय, का आणि कशासाठी व कुठे ते जाणून घेऊ!

पितृ पक्षादरम्यान, लोक पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान इत्यादी श्राद्धविधी करतात. पण भारतात असेही एक मंदिर आहे, जिथे स्वतःचेच श्राद्ध आपल्या जिवंतपणी घालता येते. ही सुविधा कशासाठी व कुठे आहे आणि त्यामागचे कारण काय ते जाणून घेऊ. 

पितृ पक्षाच्या १५ दिवसांत पितरांसाठी श्राद्ध केले जाते. सर्व पितृ अमावस्येला पितृ पक्ष संपतो. या श्राद्धविधीसाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी गया येथे येतात. तीर्थक्षेत्री पिंडदान केल्याने, श्राद्धविधी केल्याने पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते  श्रद्धा आहे. यावर्षी सर्व पित्री अमावस्या (Sarva pitru Amavasya 2024) २ ऑक्टोबरला आहे. ज्यांना कुणाला पितृपक्षात श्राद्धविधी करता आले नाही त्यांना सर्वपित्री अमावस्येला ते करता येतात. पण गया येथे असेही एक मंदिर आहे, जिथे तुम्हाला स्वतःचेच श्राद्ध जिवंतपणी करता येते. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. 

जनार्दन मंदिर, गया 

गयामध्ये मृत नातेवाईकांचे श्राद्ध आणि पिंड दानसोबतच जिवंत लोकांचे, तसेच स्वतःचे श्राद्ध आणि पिंड दान देखील केले जाते. गया येथील जनार्दन मंदिराची वेदी ही संपूर्ण जगात एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध म्हणजेच स्वतःचे पिंडदान जिवंत असताना केले जाते. गया येथील भस्मकूट पर्वतावर मंगला गौरी देवी मंदिराजवळ जनार्दन मंदिर आहे. असे मानले जाते की येथे भगवान विष्णू स्वतः जनार्दन स्वामींच्या रूपात विसावले होते. त्यामुळे हे देवस्थान अतिशय पावन मानले जाते. 

पण जिवंतपणी श्राद्धविधी कशासाठी?

आता प्रश्न असा पडतो की लोक जिवंत असताना पिंडदान करण्याचे कारण काय? ही सुविधा धर्मशास्त्राने अशा लोकांसाठी केली आहे ज्यांना मुले नाहीत किंवा त्यांच्या पिंडदानासाठी त्यांच्या कुटुंबात कोणीही सदस्य नाही. संन्यासी लोक देखील येथे येतात आणि त्यांचे पिंड दान देतात. मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी सांसारिक जीवन सोडले असल्याने, ते गया येथील जनार्दन मंदिराची वाट धरतात. 

मोक्षाचा प्रवास 

श्राद्धविधी मोक्षप्राप्तीसाठी केले जातात. आत्म्याचा प्रवास मानवी देहात येऊन संपला तर त्याला मोक्ष मिळतो. पण त्यासाठी मृत्यूपूर्वी त्याच्या आशा अपेक्षा संपायला हव्यात. त्या संपल्या नाही की आत्म्याला नाईलाजाने पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पुढचा देह धारण करावा लागतो. श्राद्धविधी करताना आत्म्याला शांती मिळून सद्गती मिळावी, हा त्यामागचा हेतू असतो. पितरांच्या नावे नैवेद्य ठेवून त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू असे म्हटले जाते. त्यानंतर कावळा पिंडाला तथा नैवेद्याला शिवतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जनार्दन मंदिरातील सुविधा त्यांच्यासाठीही म्हणता येईल, ज्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या आणि यानंतर आत्मा परमात्म्याशी एकरूप व्हावा हीच अंतिम इच्छा राहते!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षTempleमंदिर