शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

Sankashti Chaturthi March 2021: मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी; पाहा, शुभ मुहूर्त आणि महती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 10:54 IST

sankashti chaturthi march 2021: मराठी वर्षातील अखेरची संकष्ट चतुर्थी साजरी होईल. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचा शुभ, मुहूर्त, महती आणि काही मान्यता...

भारतीय संस्कृतीत साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सव, व्रत-वैकल्यांपैकी अधिक महत्त्व प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीलाही आहे. कारण गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. हजारो भाविक लहान वयापासून संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायकी चतुर्थीचे व्रत केले जाते. तर, वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी मराठी वर्षातील अखेरची संकष्ट चतुर्थी साजरी होईल. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचा शुभ, मुहूर्त, महती आणि काही मान्यता... (sankashti chaturthi march 2021)

गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच वातावरण एकदम आनंददायी, मंगलमय होते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. फाल्गुन वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाईल. 

फाल्गुन संकष्ट चतुर्थी: बुधवार, ३१ मार्च २०२१

फाल्गुन वद्य चतुर्थी प्रारंभ: बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी दुपारी ०२ वाजून ०४ मिनिटे.

फाल्गुन वद्य चतुर्थी समाप्ती: गुरुवार, ०१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता. 

चंद्रोदय वेळ: रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे.

देवघरात नेमके कोणते आणि किती देव ठेवावेत, जाणून घ्या!

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. (sankashti chaturthi march 2021 date)

संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे आगळे-वेगळे महत्त्व 

फाल्गुन संकष्ट चतुर्थीचे विशेष म्हणजे ही मराठी वर्षातील अखेरची चतुर्थी आहे आणि दुसरे म्हणजे मार्च महिन्यातील ही दुसरी चतुर्थी आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता. मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी अनेक पालक संकष्टीचे व्रत करतात. एवढेच काय, तर खुद्द यशोदा मय्याने कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्यात म्हणून संकष्टीचे व्रत केले होते. गणपती हा मंगलमूर्ती आहे. म्हणून त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे अमंगल होत नाही, अशी धारणा आहे. भावभक्तीने हे व्रत केल्यामुळे ग्रहदशा सुधारते व अनिष्ट ग्रहस्थिती असल्यास बाप्पाच्या कृपाशिर्वादाचे पाठबळ मिळते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे घरात मंगलमय वातावरण राहते. तसेच मंगल कार्यांना गती मिळते. 

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी