शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Sankashti Chaturthi 2024: डॉ. बालाजी तांबे यांनी सांगितले गणेश मंत्रांचे रहस्य आणि उपासनेचे भरघोस लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 09:50 IST

Sankashti Chaturthi 2024:कलियुगात त्वरित प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान गणेश, त्याच्या उपासनेसंदर्भात दिलेले नियम पाळले तर लाभ होणारच म्हणून समजा!

आयुर्वेद आणि अध्यात्म यांचे गाढे अभ्यासक डॉ. बालाजी तांबे यांनी गणेश उपासने संदर्भात अतिशय रोचक माहिती दिली आहे. ते म्हणतात, कलियुगात देवी, शंकर, विष्णू, लक्ष्मी आणि गणपती या पंचदेवता लवकर प्रसन्न होणाऱ्या आहेत. पैकी गणपती बाप्पावर आपला स्नेह अधिक असल्याने तो जास्त जवळचा वाटतो आणि सुखकर्ता दुःखहर्ता हे त्याचे वैशिष्ट्य असल्याने तो सगळी विघ्न देखील दूर करून आनंद देतो. पुढे दिलेल्या प्रार्थनेसाठी मोजून तीन मिनिटेही लागत नाहीत. मात्र तेवढा वेळ देवासाठी दिलात तर देवही तुमच्यासाठी वेळ देईल हे नक्की!

तर मग या बाप्पाची उपासना कधी, कशी आणि किती वेळा करावी?

डॉ. बालाजी तांबे सांगतात, बाप्पाची उपासना त्रिकाळ करावी. पहाटे, सकाळी आणि संध्याकाळी! आपल्या दिवसाची मंगलमयी सुरुवात व्हावी असे वाटत असेल तर पहाटे उठा. प्रातःर्विधी आवरून घ्या. स्नान करा आणि श्री गणेश प्रात:स्मरण स्तोत्र म्हणा. 

प्रातः स्मरामि गणनाथमनाथबन्धुं सिंदूरपूरपरिशोभित गण्डयुग्मम् ।उद्दण्डविघ्नपरिखण्डनचण्डदण्डं आखण्डलादि सुरनायक वृन्दवन्द्यम् ॥ १ ॥प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानं इच्छानुकूलमखिलंच फलं ददानम् ।तं तुंदिलं द्विरसनाधिप यज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय ॥२ ॥प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोक-दावानलं गणविभुं वरकुंजरास्यम् ।अज्ञानकाननविनाशनहव्यवाहं उत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य ॥ ३ ॥श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् ।प्रातरुत्थाय सततं यः पठेत्प्रयतः पुमान् ॥ ४ ॥

हे स्तोत्र ऐका, म्हणा तसेच श्रवण करा. स्तोत्र ऐकून ऐकून लवकरच पाठ होईल. या स्तोत्राला पर्यायी स्तोत्र म्हणजे माउलींनी लिहिलेलं गणेश कवन- ओम नमोजी आद्या! पहाटे उठून ही स्तोत्र म्हणावीत. 

सकाळी आवरून घराबाहेर पडण्याआधी गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. या स्तोत्राच्या शीर्षकातच त्याचा लाभ दिलेला आहे. थर्व म्हणजे हलणे, अ म्हणजे नाही, शीर्ष म्हणजे शीर अर्थात आपले डोके किंवा मेंदू. आपला मेंदू, तथापि आपले विचार, मन आणि शरीराचे हेड कोर्टर शांत ठेवण्याचे काम हे स्तोत्र करते. त्यात सुरुवातीला ओम गं गणपतये म्हणताना अनुस्वारात म नाही तर न म्हणा, जेणेकरून पूर्ण मेंदू त्या स्वराने व्यापून जाईल आणि डोकं शांत राहील. म्हणून अथर्वशीर्ष कोमल गांधार आणि निषादात म्हणावे असं म्हणतात. 

गणपती ही नाददेवता आहे. बुद्धी, संतती, संपत्ती देणारी देवता आहे. तिची उपासना मनोभावे केल्यास निश्चितच लाभ मिळतो, असे स्तोत्र कारांनी देखील लिहून ठेवले आहे, तसेच गणेश भक्तांनी अनुभव घेतले आहेत. वरील दोन प्रार्थना झाल्यावर तिसरी सायं प्रार्थना गणेश स्तोत्राने करावी. 'प्रणम्य शिरसा देवं' तथा 'साष्टांग नमन हे माझे' या संकटनाशन स्तोत्र पठणाने करावी. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३