शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Sankashthi Chaturthi 2024: गणपतीची 'खरी' ओळख होण्यासाठी मुलांना 'ही' माहिती आवर्जून सांगा'- सद्गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:57 IST

Sankashthi Chaturthi 2024: गणपती बाप्पा हे आपले लाडके दैवत असले तरी त्याच्याबद्दल अचूक माहिती पुढच्या पिढीला कळणे गरजेचे आहे, ती माहिती देत आहेत सद्गुरू!

आबालवृद्धांचे आवडते दैवत म्हणजे गणपती. एक तर तो हाकेला पटकन धावून येतो, दुसरं म्हणजे पाहुणचार घेण्यासाठी आपल्या घरी येतो आणि तिसरी बाब म्हणजे तो विघ्नहर्ता आहे, म्हणजे आपल्यावरील संकट दूर करतो. अशी ही मंगलमूर्ती पाहून सगळ्यांनाच प्रसन्न वाटतं. आपण त्याला प्रेमाने गणू, गणोबा, गजनना म्हणत असलो तरी त्याची मुख्य ओळख आहे ती म्हणजे गणपती! काय विशेष आहे या नामात? सांगताहेत सद्गुरु!

गणपतीची निर्मिती कशी झाली यामागची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आणि तो गजानन कसा झाला हेही ऐकिवात आहे. याबद्दल खुलासा करताना सद्गुरू सांगतात, गणपती म्हणजे शिवगणांचा प्रमुख आणि गज अर्थात हत्तीचे शीर त्याला जोडले म्हणून तो गजानन झाला. कवींनी त्याला विविध नामे उल्लेख करताना गजानन संबोधले, वास्तविक ही त्याची ओळख नाही तर गणपती हेच त्याचे प्रमुख नाम आहे. 

सद्गुरू सांगतात, गजानन म्हणजे हत्तीचे शीर धारण केलेला मानवी देह. हे आपण मुलांना शिकवतो. परंतु, त्याच्या डोक्याबद्दल कमी आणि पोटाबद्दल जास्त बोलतो. लंबोदर म्हणतो. तसा तो आहे, पण सुस्त, आळशी नाही. कारण त्याचं डोकं मानवी मेंदूपेक्षा कैक पटींनी जास्त काम करतं. 

ज्याचा मेंदू तल्लख तोच दूरदृष्टीने विचार करू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. नेतृत्त्व करू शकतो. भविष्याची आखणी करू शकतो. गणपतीचे मस्तक त्याचेच प्रतीक आहे. म्हणून गणपती बाप्पा मोदक खातो एवढेच मुलांच्या मनावर न बिंबवता तो बुद्धिदाता आहे, योद्धा आहे, शूर वीर आहे आणि उत्तम नेता आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. 

गणेश उत्सव असो नाहीतर दर महिन्यात येणारी विनायकी किंवा संकष्टी याच गोष्टींची जाणीव करून देते. बाप्पाकडून बोध घेत आपणही हे गुण अंगिकारले पाहिजेत, हा त्यामागचा हेतू आहे, असे सद्गुरु सांगतात. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती