शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या पाखंडी जगातही संत सज्जन आहेत, पण ते ओळखावे कसे? सांगताहेत संत निळोबा राय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:48 IST

केवळ भगवी वस्त्रे धारण केली म्हणून कोणी संत होत नाहीत, त्यासाठी त्या व्यक्तीचे आचरणदेखील शुद्ध असावे लागते.

'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' असे पूर्वी म्हटले जात असे. कारण, तेव्हा खऱ्या अर्थाने साधू-संतांचा समाजात वावर होता. मात्र, सद्यस्थितीत स्वयंघोषित संतांची, गुरुंची संख्या एवढी वाढली आहे, ती पाहता संतांची ओळख पटावी तरी कशी? हा संभ्रम दूर करण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अनुग्रहित शिष्य निळोबा राय म्हणतात,

तेचि संत, तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठली।नेणति काही जादूटोणा। नामस्मरणावाचोनि।।

सर्वात पहिली गोष्ट, संत कधीच स्वत:ला उपाधी देत नाहीत, तर लोक त्यांचा संत म्हणून गौरव करतात. परंतु, अलीकडच्या काळात लोकांवर अंधश्रद्धेचा एवढा पगडा आहे, की ते जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीला साधू-संत म्हणू लागले आहेत. संतांच्या ठायी जादू करण्याची किमया आहे, परंतु ही जादू व्यावहारिक जगाची नाही, तर पारमार्थिक जगाची आहे. त्या जादूचा प्रभाव अखंड टिकणारा आहे. असे संत समाजाची दिशाभूल करत नाहीत, तर विठ्ठलनामाची गोडी लावतात, सन्मार्गाची वाट दाखवतात आणि भगवंतापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, हे पटवून देतात.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा, अशी तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या करून ठेवली आहे. असे लोक जे निर्हेतुकपणे जनसेवा करतात. स्वत:जवळ कितीही ज्ञान असले, तरी त्याचे प्रदर्शन करत नाहीत, तर त्या ज्ञानाचा लोककल्याणासाठी उपयोग करतात.

संत ज्ञानेश्वर यांना सर्व संतांनी एकमुखाने माऊली म्हटले आहे. कारण, त्यांनी समाजाचा रोष पत्करूनही प्रेमाची परतफेड केली. सर्वसामान्य लोकांना भगवद्गीतेचे मर्म कळावे, म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीची रचना केली. साध्या साध्या गोष्टी सोदाहरण समजावून सांगितल्या. जड बुद्धीच्या रेड्यासारख्या लोकांकडून वेद वदवून घेतले. भिंतीसारख्या थिजलेल्या समाजात चैतन्य निर्माण करून समाजाला गती दिली. अमृतानुभव दिला. अभंगरचना केली. विठ्ठलाशी सोयरिक निर्माण करून दिली, तरीदेखील या कार्याचे श्रेय आपल्या गुरुंना देताना आपल्याकडे उणेपणा घेतला. गुरुकृपेने आपल्या आयुष्यात मोगरा फुलला, अशी ते ग्वाही देतात. 

ही विनम्रता संतचरित्राचे दर्शन घडवते. संत वृत्ती सापडणे दुर्मिळ. परंतु संतविचारांचे आचरण करणे, शक्य आहे. याकरिता आधी संतचरित्राचा आढावा घ्या आणि मगच संतांच्या विचारांचे अनुसरण करा, अशी विनवणी निळोबा राय करतात. जय हरी!