शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या पाखंडी जगातही संत सज्जन आहेत, पण ते ओळखावे कसे? सांगताहेत संत निळोबा राय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:48 IST

केवळ भगवी वस्त्रे धारण केली म्हणून कोणी संत होत नाहीत, त्यासाठी त्या व्यक्तीचे आचरणदेखील शुद्ध असावे लागते.

'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' असे पूर्वी म्हटले जात असे. कारण, तेव्हा खऱ्या अर्थाने साधू-संतांचा समाजात वावर होता. मात्र, सद्यस्थितीत स्वयंघोषित संतांची, गुरुंची संख्या एवढी वाढली आहे, ती पाहता संतांची ओळख पटावी तरी कशी? हा संभ्रम दूर करण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अनुग्रहित शिष्य निळोबा राय म्हणतात,

तेचि संत, तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठली।नेणति काही जादूटोणा। नामस्मरणावाचोनि।।

सर्वात पहिली गोष्ट, संत कधीच स्वत:ला उपाधी देत नाहीत, तर लोक त्यांचा संत म्हणून गौरव करतात. परंतु, अलीकडच्या काळात लोकांवर अंधश्रद्धेचा एवढा पगडा आहे, की ते जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीला साधू-संत म्हणू लागले आहेत. संतांच्या ठायी जादू करण्याची किमया आहे, परंतु ही जादू व्यावहारिक जगाची नाही, तर पारमार्थिक जगाची आहे. त्या जादूचा प्रभाव अखंड टिकणारा आहे. असे संत समाजाची दिशाभूल करत नाहीत, तर विठ्ठलनामाची गोडी लावतात, सन्मार्गाची वाट दाखवतात आणि भगवंतापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, हे पटवून देतात.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा, अशी तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या करून ठेवली आहे. असे लोक जे निर्हेतुकपणे जनसेवा करतात. स्वत:जवळ कितीही ज्ञान असले, तरी त्याचे प्रदर्शन करत नाहीत, तर त्या ज्ञानाचा लोककल्याणासाठी उपयोग करतात.

संत ज्ञानेश्वर यांना सर्व संतांनी एकमुखाने माऊली म्हटले आहे. कारण, त्यांनी समाजाचा रोष पत्करूनही प्रेमाची परतफेड केली. सर्वसामान्य लोकांना भगवद्गीतेचे मर्म कळावे, म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीची रचना केली. साध्या साध्या गोष्टी सोदाहरण समजावून सांगितल्या. जड बुद्धीच्या रेड्यासारख्या लोकांकडून वेद वदवून घेतले. भिंतीसारख्या थिजलेल्या समाजात चैतन्य निर्माण करून समाजाला गती दिली. अमृतानुभव दिला. अभंगरचना केली. विठ्ठलाशी सोयरिक निर्माण करून दिली, तरीदेखील या कार्याचे श्रेय आपल्या गुरुंना देताना आपल्याकडे उणेपणा घेतला. गुरुकृपेने आपल्या आयुष्यात मोगरा फुलला, अशी ते ग्वाही देतात. 

ही विनम्रता संतचरित्राचे दर्शन घडवते. संत वृत्ती सापडणे दुर्मिळ. परंतु संतविचारांचे आचरण करणे, शक्य आहे. याकरिता आधी संतचरित्राचा आढावा घ्या आणि मगच संतांच्या विचारांचे अनुसरण करा, अशी विनवणी निळोबा राय करतात. जय हरी!