शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संत सोयराबाईंचा 'हा' अभंग म्हणजे परमार्थातील अद्वैताचे दर्शन घडवणारी सुंदर रचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:41 IST

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दैवी आवाजात हा अभंग आजवर आपण कितीतरी वेळा ऐकला असेल. जणू काही त्यांच्या स्वरातून सोयराबाई आपला आनंद व्यक्त करतात.

इंद्रधनुष्याचे रंग किती? असे विचारल्यावर लहान मुलही सांगेल, सात! मात्र, सूर्याच्या एका पांढऱ्या रंगातून हे सप्तरंग तयार झालेले असतात ना? या शास्त्रीय उदाहरणाप्रमाणे परमार्थातही अनेक रंग दिसत असले, तरी त्यांचा मूळ रंग एकच आहे. त्याच्यापाशी येऊन सगळे धर्म, पंथ, जात येऊन मिळतात. तो रंग कोणता, तर संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात,

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग।मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया।नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम।देही असूनी तू विदेही, सदा समाधिस्थ पाही।पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी।

संत चोखामेळा आणि त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्तीत एवढे रमून गेले होते, की तो भक्तीरंग एक झाला होता. सोयराबाई म्हणतात, तो रंग मी अनुभवला आहे, पाहिला आहे, ज्या रंगात खुद्द श्रीरंगही रंगून जातो. त्या भक्तीची गोडी मी अनुभवली आहे, जिथे सारे भेद लयाला जातात आणि सगळे जीव एका पातळीवर येऊन पोहोचतात. काम-क्रोधाला तिथे अजिबात थारा नाही. सगळी सृष्टी विठ्ठलमय होते आणि विठ्ठल देहात असनही सर्वत्र दिसू लागतो. तो आत आहे, तसा बाहेरही. त्याला पाहताना समाधि लागते. कामात असूनही मन त्याच्या चरणी लागते. काम हाच ईश्वर होतो. ही भावावस्था केवळ भक्तीरंगात अनुभवता येते. 

सोयराबाईंचे सांगणे केवळ शब्दरचनेतून नव्हे तर तो अभंग ऐकताना क्षणोक्षणी जाणवते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दैवी आवाजात हा अभंग आजवर आपण कितीतरी वेळा ऐकला असेल. जणू काही त्यांच्या स्वरातून सोयराबाई आपला आनंद व्यक्त करतात, विठ्ठलचरणी समाधी अनुभवतात आणि श्रीरंगाबरोबर रंगून जातात, असा आपल्यालाही भास होतो. 

या अभंगाला संगीतही किशोरीताईंनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी भैरवी रागाचा वापर केला आहे. भैरवी रागात बारा सूरांचा वापर होत असल्याने बैठकीत हा राग सर्वात शेवटी गायला जातो. किशोरीताईंनी सदर अभंगासाठी या रागाची निवड अतिशय चपखलपणे केली आहे. सर्व रंगांची, भावनांची, काम-क्रोधाची जिथे सांगता होते, त्या विठ्ठल नामापायी लागताना सूरांचाही रंग एक व्हावा, हा त्यामागील विचार असू शकतो. त्यांच्या सात्विक स्वराने आपण तो एक रंग अनुभवतोही. 

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू.