शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

संत रोहिदासांनी घेतली चर्मव्यवसायात ईश्वराची अनुभूती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 16:05 IST

शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे. 

पंधराव्या सोेळाव्या शतकातील रोहिदास हे एक मोठे संत म्हणून ओळखले जातात. हे चर्मकार असून रवीदास, रैदास या नावानेही प्रसिद्ध होते. राजघराण्यातील स्त्री मीराबाई, ही यांची शिष्या असल्यामुळे रोहिदासांची महती वाढली. रोहिदासांनी अनेक पदे लिहिली आहेत. शिखांच्या 'ग्रंथसाहेबा'तही यांची सुमारे चाळीस पदे आहेत. वर्णबाह्य असल्याकारणाने त्यांना लौकिक शिक्षण मिळाले नव्हते, पण साधुसंतांच्या संगतीत ते आत्मज्ञानी झाले. आपल्या व्यवसायास अनुसरून ते एका पद्यात म्हणतात,

ज्यांहा देखो वांहा चामही चाम,चामके मंदिर बोलत राम।चामकी गऊ चामका बचडा,चामही धुने चामही ठाडा।चामका हाती चामका राजा,चामके उंटपर चामका बाजा।कहत रोहिदास सुनो कबीर भाई,चाम बिना देह किनकी बनाई।।

रोहिदास म्हणतात की, मी चर्मकार असूनही ईश्वराची भक्ती करतो. मला तर जेथे पहावे तेथे चामडे दिसून येते. चामड्याच्याच  शरीररूपी मंदिरात राम विराजमान झाला आह़े चामड्याची गाय व वासरूही चामड्याचेच. सर्वत्र चामडेच पसरले आहे. राजा चामड्याचा आणि हत्तीही चामड्याचाच. उंटसुद्धा चामड्याचाच आणि त्याच्यावर ठेवलेले वाद्यही चामड्यानेच मढवले आहे. त्या चर्माशिवाय देह कसा बनणार? 

या एका पदात रोहिदास महत्त्वाचा सिद्धान्त सांगत आहेत. मानवी शरीर कोणत्याही जातीचे असले तरी, त्यात अस्थी, मांस, चरबी सर्वत्र सारखीच असते. रक्ताचे प्रकार वेगळे असले तरी, सर्व जातीत ते आढळतात. शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? जा प्रश्न चोखोबांनी विचारला होता. परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे.