शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संत रोहिदासांनी घेतली चर्मव्यवसायात ईश्वराची अनुभूती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 16:05 IST

शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे. 

पंधराव्या सोेळाव्या शतकातील रोहिदास हे एक मोठे संत म्हणून ओळखले जातात. हे चर्मकार असून रवीदास, रैदास या नावानेही प्रसिद्ध होते. राजघराण्यातील स्त्री मीराबाई, ही यांची शिष्या असल्यामुळे रोहिदासांची महती वाढली. रोहिदासांनी अनेक पदे लिहिली आहेत. शिखांच्या 'ग्रंथसाहेबा'तही यांची सुमारे चाळीस पदे आहेत. वर्णबाह्य असल्याकारणाने त्यांना लौकिक शिक्षण मिळाले नव्हते, पण साधुसंतांच्या संगतीत ते आत्मज्ञानी झाले. आपल्या व्यवसायास अनुसरून ते एका पद्यात म्हणतात,

ज्यांहा देखो वांहा चामही चाम,चामके मंदिर बोलत राम।चामकी गऊ चामका बचडा,चामही धुने चामही ठाडा।चामका हाती चामका राजा,चामके उंटपर चामका बाजा।कहत रोहिदास सुनो कबीर भाई,चाम बिना देह किनकी बनाई।।

रोहिदास म्हणतात की, मी चर्मकार असूनही ईश्वराची भक्ती करतो. मला तर जेथे पहावे तेथे चामडे दिसून येते. चामड्याच्याच  शरीररूपी मंदिरात राम विराजमान झाला आह़े चामड्याची गाय व वासरूही चामड्याचेच. सर्वत्र चामडेच पसरले आहे. राजा चामड्याचा आणि हत्तीही चामड्याचाच. उंटसुद्धा चामड्याचाच आणि त्याच्यावर ठेवलेले वाद्यही चामड्यानेच मढवले आहे. त्या चर्माशिवाय देह कसा बनणार? 

या एका पदात रोहिदास महत्त्वाचा सिद्धान्त सांगत आहेत. मानवी शरीर कोणत्याही जातीचे असले तरी, त्यात अस्थी, मांस, चरबी सर्वत्र सारखीच असते. रक्ताचे प्रकार वेगळे असले तरी, सर्व जातीत ते आढळतात. शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? जा प्रश्न चोखोबांनी विचारला होता. परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे.