शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'हपापाचा माल गपापा' या म्हणीचा साधू बाबांनी शिकवला नेमका अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:50 IST

मेहनतीची कमाई अंगी लागते, वरची कमाई बाहेरचा मार्ग शोधत निघून जाते!

'हपापाचा माल गपापा' ही म्हण आपण बरेचदा ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ असा, की चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा, संपत्ती तो माणूस उपभोगू शकत नाहीच, तर दुसराच कोणीतरी येऊन तो पैसा घेऊन जातो. तुम्ही म्हणाल, आम्ही तर चांगल्या मार्गाने पैसा कमावतो, तरी कधी कधी दवाखाने, कोर्ट कचेरी, जागेची खरेदी विक्री यात पाण्यासारखा खर्च होतो, असे का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट शेवट्पर्यंत वाचावी लागेल.

एक तरुण मुलगा एका कंपनीत नोकरी करत होता. नोकरीला लागून पाच वर्षे होत आली तरी पगारवाढ होईना. नवीन नोकरी शोधावी तर नोकरीही मिळेना. तो दिवसरात्र पगार वाढीचा विचार करू लागला. त्या विचाराने तो आजारी पडू लागला. अशक्त झाला. ही चिंता त्याला अंतर्बाह्य पोखरू लागली. एक वेळ तर अशी आली की त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. औषधोपचार झाले. तो तात्पुरता बरा झाला. दवाखान्यातून घरी येतो न येतो तर दुसऱ्या दुखण्याने डोके वर काढले. असे करत जवळपास सहा महिने त्याच्या दवाखान्याच्या वाऱ्या सुरू होत्या आणि त्यात पाण्यासारखा पैसा वाया जात होता. 

तो पूर्वीपेक्षा अधिकच कष्टी झाला. त्याला कोणीतरी एका साधू बाबांना भेटायला सांगितले. तरुणाला वाटले, नाहीतरी सध्या दुसरा पर्याय दिसत नाही, त्यांना भेटून पाहू. ते काय म्हणतात हे ऐकून घेऊ. असे ठरवून त्याने साधू बाबांची भेट घेतली आणि त्यांना सगळे वृत्त सविस्तर कथन केले. साधू बाबा म्हणाले, 'तुझा पगार किती?'तो म्हणाला '२०,०००'साधू बाबा म्हणाले, 'येत्या महिन्यापासून कंपनीला सांगून तुझा पगार १८,००० करून घे. तुझी सगळी दुखणी थांबतील.'

एवढे बोलून साधू बाबांनी मौन धारण केले. तरुणाला कळेना, दुखण्याचा आणि पगाराचा काय संबंध? पण ते म्हणाले आहेत तर प्रयोग करून पाहावा का? अशा विचाराने त्याने कंपनीला पत्र लिहिले आणि दोन हजारांचे नुकसान पत्करून १८००० पगार घ्यायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य? चार महिन्यात तो तंदरुस्त झाला आणि त्याने येऊन साधू बाबांचे पाय धरले. आपले पूर्वायुष्य परत मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. आणि त्याचवेळेस शंका विचारली, 'साधू बाबा माझ्या पगाराचा आणि आरोग्याचा संबंध कसा जुळवलात ते सांगाल का?'

साधू बाबा हसून म्हणाले, 'लेका, तू तुझ्या कंपनीत १८००० चे काम करत होतास आणि २००० रुपये फुकटचे घेत होतास. तेच पैसे आल्या पावली निघून गेले.जी मेहनतीची कमाई असते तीच अंगी लागते, बाकीची कमाई बाहेरचे मार्ग आपोआप शोधते. म्हणून यापुढे एक तर तू जेवढा पगार घेतोस तेवढी मेहनत कर, नाहीतर जेवढी मेहनत करतोस तेवढाच पगार घे, म्हणजे नसती दुखणी मागे लागणार नाहीत!'