शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Sadguru: अयोध्या राममंदिरावर आक्षेप घेणाऱ्यांची सद्गुरूंनी खरमरीत शब्दात केली कानउघडणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 15:02 IST

Ayodhya Ram Mandir: दरदिवशी राम मंदिरासंदर्भात होणाऱ्या टीकेला उत्तर देताना चढ्या स्वरात सद्गुरू म्हणाले, 'नास्तिक असलात तरी हरकत नाही, पण...'

२२ जानेवारी जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी एकीकडे राम भक्तांची उत्सवाची लगबग सुरू झाली आहे तर दुसरीकडे टीकाकारांची टीकेची झोड. श्रीरामाच्या चारित्र्यापासून मंदिर व्यवस्थापन, पूजा, आमंत्रित लोक अशा कोणत्याही विषयावर शेरेबाजी होऊ लागली आहे. मात्र अयोध्येत होणाऱ्या उत्सवावर त्याचा किंचितही फरक पडताना दिसत नाही. उलटपक्षी प्रत्येक जण आपापल्या तऱ्हेने रामसेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. लेखन, नृत्य, वक्तृत्त्व, कथाकथन, रांगोळी, शिल्प, चित्र अशा अनेक तऱ्हेच्या अभिव्यक्तीतून लोक आपला आनंद व्यक्त करत आहेत. अशातच टीकाकारांना उत्तर देताना ज्येष्ठ आध्यात्मिक व्याख्याते सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी खरमरीत शब्दात कानउघडणी केली आहे. 

अलीकडेच एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'रामलला हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. तेहेतीस कोटी देव आपण मानतो, पैकी राम, कृष्ण आणि शंकर यांची देवस्थाने हिंदूंच्या हृदयाच्या अतिशय जवळची आहेत. ५०० वर्षांच्या लढ्यानंतर रामललाला त्याचे जन्मस्थळ असलेले मंदिर मिळत असेल तर हा आनंदाचा क्षण आपणही आनंद मानून साजरा करायला हवा. त्यात टीका करण्याचे काहीच कारण नाही. किंवा कोणत्याही शंका उपस्थित करण्याचीही गरज नाही. राम सर्वांचा आदर्श असल्याने आपणही एकजुटीने या सोहळ्याचे मनापासून स्वागत केले पाहिजे. तो केवळ देव म्हणून नाही तर मर्यादापुरुषोत्तम म्हणूनही अनुकरणीय आहे. त्यामुळे, नास्तिक असाल तर दुसऱ्यांच्या आनंदावर विरजण न टाकता दोन पावलं मागे घेऊन त्यांना त्यांचा आनंद साजरा करू दिला पाहिजे. 

मंदिर हे केवळ भगवंताचे वसतिस्थान नाही तर ते लाखो लोकांसाठी ऊर्जा केंद्र आहे. रामललाचे मंदिर हा केवळ तात्कालिक सोहळा नाही तर पुढच्या शंभरेक वर्षात येणाऱ्या पिढ्यांसाठी रामाचा इतिहास सांगणारी वास्तू आहे. ते त्याचे जन्मस्थळ आहे. तिथे मंदिर नव्याने उभे राहत आहे तर त्यात वावगं वाटण्याचे कारणच नाही. हे मंदिर कोणाच्याही हक्कांवर गदा न आणता रीतसर कायद्याची लढाई जिंकून उभारले जात आहे. त्यामुळे धार्मिक, आर्थिक, ऐतिहासिक, कायदेशीर रित्या ते अधिकृत स्थान आहे. 

म्हणून, २२ जानेवारीच्या सोहळ्यात ज्यांना आनंद व्यक्त करावासा वाटत नाही त्यांनी शांत राहून या उत्सवाचे पावित्र्य राखा आणि ज्यांना हा सोहळा आनंदाने साजरा करावासा वाटतो, त्यांच्या मार्गातला अडसर बनू नका, हे समंजसपणे करणे हीच खरी लोकशाही!

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या