शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

Rituals: शास्त्रानुसार जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का फिरवले जाते? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:22 IST

Rituals : जुने जाणते लोक, जेवायला सुरुवात करण्यापुरती ताटाभोवती पाणी फिरवून आपोष्णी घेऊन मगच जेवायला सुरुवात करत असत. पण का? जाणून घेऊ. 

सनातन धर्मात अशा अनेक महान गोष्टी आहेत, ज्यांच्या मागे खोल वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारणे दडलेली आहेत, परंतु त्यांचा खरा अर्थ आपल्याला अनेकदा माहीत नसतो किंवा आपण तो जाणून घेण्यात कमी पडतो. अशीच एक परंपरा आहे की जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडेसे पाणी घेऊन ताटाभोवती पाणी फिरवले जाते. असे करण्यामागील कारणे आणि फायदे तुम्हाला माहीत आहेत का? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

खूप जुनी परंपरा

जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवण्याची आणि श्लोक म्हणून ईशस्मरण करण्याची परंपरा जुनी आहे. उत्तर भारतात त्याला आमचन आणि पानाच्या बाहेर जी चार शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती म्हणतात. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिसेशनम म्हणतात. आजही ही अनेक जण ही परंपरा पुढे चालवताना आपण पाहतो. त्यांच्याकडून या परंपरेची माहिती घेऊन आपणही ती पुढे नेली पाहिजे.

अन्नदेवतेचाआदर

शास्त्रानुसार ताटाभोवती पाणी फिरवणे आणि जेवण सुरू करण्यापूर्वी नामजप करणे हे दर्शविते की आपण अन्नदेवतेचा आदर करत आहात. असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. जे लोक या परंपरेचे नियमित पालन करतात, त्यांचे स्वयंपाकघर नेहमी अन्न धान्याने भरलेले राहते.

कीटक दूर होतात

या परंपरेला शास्त्रीय कारणंही आहे. खरे तर पूर्वीचे लोक जमिनीवर बसून जेवत असत. अशा स्थितीत अन्नाच्या आकर्षणाने ताटाजवळ छोटे किडे-किडे यायचे. ताटाभोवती पाणी फिरवल्यामुळे ते अन्नात प्रवेश करू शकत नव्हते. सोबतच ताटाभोवती असलेली धूळ आणि मातीही जागी बसत असे. 

आताच्या काळात काय उपयोग?

आता टेबल खुर्ची पद्धत आली, मग या प्रथेची काय गरज असे आपल्याला वाटू शकेल. पण हा एक संयम ठेवण्याचाही संस्कार आहे. अन्न समोर येताक्षणी हातातोंडाची गाठ पडू न देता. काही क्षण थांबावे, देवाचे स्मरण करावे. ताटाभोवती पाणी फिरवावे. या प्रथेमुळे पूर्वी अन्नातून विषप्रयोग तर झाला नाही ना, हे कळायला सुद्धा मदत होत असे. जेवण्याआधी ताटाभोवती पाणी फिरवून काही शीतं ताटाच्या बाजूला काढून ठेवली जात असत. प्रार्थना होईस्तोवर कीटकांनी ते अन्न खाल्लेले दिसल्यास ते अन्न सुरक्षित आहे, अशीही चाचपणी केली जात असे. सद्यस्थितीत आपल्यालाही हितशत्रूंची कमतरता नाही. ते पाहता आपणही या प्रथेचे अनुसरण केले तर जीवाचे रक्षण होईल आणि प्रथेचे पालनही!

टॅग्स :foodअन्न