शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Rituals: शास्त्रानुसार जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का फिरवले जाते? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:22 IST

Rituals : जुने जाणते लोक, जेवायला सुरुवात करण्यापुरती ताटाभोवती पाणी फिरवून आपोष्णी घेऊन मगच जेवायला सुरुवात करत असत. पण का? जाणून घेऊ. 

सनातन धर्मात अशा अनेक महान गोष्टी आहेत, ज्यांच्या मागे खोल वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारणे दडलेली आहेत, परंतु त्यांचा खरा अर्थ आपल्याला अनेकदा माहीत नसतो किंवा आपण तो जाणून घेण्यात कमी पडतो. अशीच एक परंपरा आहे की जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडेसे पाणी घेऊन ताटाभोवती पाणी फिरवले जाते. असे करण्यामागील कारणे आणि फायदे तुम्हाला माहीत आहेत का? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

खूप जुनी परंपरा

जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवण्याची आणि श्लोक म्हणून ईशस्मरण करण्याची परंपरा जुनी आहे. उत्तर भारतात त्याला आमचन आणि पानाच्या बाहेर जी चार शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती म्हणतात. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिसेशनम म्हणतात. आजही ही अनेक जण ही परंपरा पुढे चालवताना आपण पाहतो. त्यांच्याकडून या परंपरेची माहिती घेऊन आपणही ती पुढे नेली पाहिजे.

अन्नदेवतेचाआदर

शास्त्रानुसार ताटाभोवती पाणी फिरवणे आणि जेवण सुरू करण्यापूर्वी नामजप करणे हे दर्शविते की आपण अन्नदेवतेचा आदर करत आहात. असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. जे लोक या परंपरेचे नियमित पालन करतात, त्यांचे स्वयंपाकघर नेहमी अन्न धान्याने भरलेले राहते.

कीटक दूर होतात

या परंपरेला शास्त्रीय कारणंही आहे. खरे तर पूर्वीचे लोक जमिनीवर बसून जेवत असत. अशा स्थितीत अन्नाच्या आकर्षणाने ताटाजवळ छोटे किडे-किडे यायचे. ताटाभोवती पाणी फिरवल्यामुळे ते अन्नात प्रवेश करू शकत नव्हते. सोबतच ताटाभोवती असलेली धूळ आणि मातीही जागी बसत असे. 

आताच्या काळात काय उपयोग?

आता टेबल खुर्ची पद्धत आली, मग या प्रथेची काय गरज असे आपल्याला वाटू शकेल. पण हा एक संयम ठेवण्याचाही संस्कार आहे. अन्न समोर येताक्षणी हातातोंडाची गाठ पडू न देता. काही क्षण थांबावे, देवाचे स्मरण करावे. ताटाभोवती पाणी फिरवावे. या प्रथेमुळे पूर्वी अन्नातून विषप्रयोग तर झाला नाही ना, हे कळायला सुद्धा मदत होत असे. जेवण्याआधी ताटाभोवती पाणी फिरवून काही शीतं ताटाच्या बाजूला काढून ठेवली जात असत. प्रार्थना होईस्तोवर कीटकांनी ते अन्न खाल्लेले दिसल्यास ते अन्न सुरक्षित आहे, अशीही चाचपणी केली जात असे. सद्यस्थितीत आपल्यालाही हितशत्रूंची कमतरता नाही. ते पाहता आपणही या प्रथेचे अनुसरण केले तर जीवाचे रक्षण होईल आणि प्रथेचे पालनही!

टॅग्स :foodअन्न