शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Rituals: शास्त्रानुसार जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का फिरवले जाते? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:22 IST

Rituals : जुने जाणते लोक, जेवायला सुरुवात करण्यापुरती ताटाभोवती पाणी फिरवून आपोष्णी घेऊन मगच जेवायला सुरुवात करत असत. पण का? जाणून घेऊ. 

सनातन धर्मात अशा अनेक महान गोष्टी आहेत, ज्यांच्या मागे खोल वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारणे दडलेली आहेत, परंतु त्यांचा खरा अर्थ आपल्याला अनेकदा माहीत नसतो किंवा आपण तो जाणून घेण्यात कमी पडतो. अशीच एक परंपरा आहे की जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडेसे पाणी घेऊन ताटाभोवती पाणी फिरवले जाते. असे करण्यामागील कारणे आणि फायदे तुम्हाला माहीत आहेत का? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

खूप जुनी परंपरा

जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवण्याची आणि श्लोक म्हणून ईशस्मरण करण्याची परंपरा जुनी आहे. उत्तर भारतात त्याला आमचन आणि पानाच्या बाहेर जी चार शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती म्हणतात. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिसेशनम म्हणतात. आजही ही अनेक जण ही परंपरा पुढे चालवताना आपण पाहतो. त्यांच्याकडून या परंपरेची माहिती घेऊन आपणही ती पुढे नेली पाहिजे.

अन्नदेवतेचाआदर

शास्त्रानुसार ताटाभोवती पाणी फिरवणे आणि जेवण सुरू करण्यापूर्वी नामजप करणे हे दर्शविते की आपण अन्नदेवतेचा आदर करत आहात. असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. जे लोक या परंपरेचे नियमित पालन करतात, त्यांचे स्वयंपाकघर नेहमी अन्न धान्याने भरलेले राहते.

कीटक दूर होतात

या परंपरेला शास्त्रीय कारणंही आहे. खरे तर पूर्वीचे लोक जमिनीवर बसून जेवत असत. अशा स्थितीत अन्नाच्या आकर्षणाने ताटाजवळ छोटे किडे-किडे यायचे. ताटाभोवती पाणी फिरवल्यामुळे ते अन्नात प्रवेश करू शकत नव्हते. सोबतच ताटाभोवती असलेली धूळ आणि मातीही जागी बसत असे. 

आताच्या काळात काय उपयोग?

आता टेबल खुर्ची पद्धत आली, मग या प्रथेची काय गरज असे आपल्याला वाटू शकेल. पण हा एक संयम ठेवण्याचाही संस्कार आहे. अन्न समोर येताक्षणी हातातोंडाची गाठ पडू न देता. काही क्षण थांबावे, देवाचे स्मरण करावे. ताटाभोवती पाणी फिरवावे. या प्रथेमुळे पूर्वी अन्नातून विषप्रयोग तर झाला नाही ना, हे कळायला सुद्धा मदत होत असे. जेवण्याआधी ताटाभोवती पाणी फिरवून काही शीतं ताटाच्या बाजूला काढून ठेवली जात असत. प्रार्थना होईस्तोवर कीटकांनी ते अन्न खाल्लेले दिसल्यास ते अन्न सुरक्षित आहे, अशीही चाचपणी केली जात असे. सद्यस्थितीत आपल्यालाही हितशत्रूंची कमतरता नाही. ते पाहता आपणही या प्रथेचे अनुसरण केले तर जीवाचे रक्षण होईल आणि प्रथेचे पालनही!

टॅग्स :foodअन्न