शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:00 IST

Rituals: हिंदू धर्म शास्त्रात अनेक बारकाव्यांचा सखोल विचार केला आहे. सांसारिक दृष्ट्या या महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल काय भाष्य केले आहे ते जाणून घेऊ. 

>> सागर सुहास दाबके

कुठेही स्त्री पुरुष लैंगिक संबंधांचा विषय निघाला की त्याबद्दल खरंतर गांभिर्याने बोलायला हवं, नीट अभ्यास असायला हवा, पण नेहमी असे दिसते, की हा विषय निघाला कि थट्टा करायची अतोनात हुक्की येते लोकांना।

एका ठिकाणी गर्भाधान संस्कार होता. सकाळी संस्कार झाला आणि संध्याकाळी त्या यजमानाचेच मित्र गप्पा मारताना म्हणाले, ''आज सकाळीच गर्भाधान झालंय, आज रात्री बेत लावेल गडी, आज काय तो गप्पा मारायला येत नाही'', असे म्हणून हसले आणि एकमेकांना टाळ्या दिल्या. हे सगळं त्यातील एकाची पत्नी ऐकत होती, त्यांचं नुकतंच लग्न झालेलं, ती नंतर म्हणाली, ''ही अशी आपल्या वैयक्तिक गोष्टींची थट्टा होणार असेल तर मला नाही करायचे कुठले संस्कार!"

अशाप्रकारच्या शेरेबाजीमुळे चांगल्या गोष्टी बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टींबद्दल मनात अढी निर्माण होते. त्याला जबाबदार आपण ठरतो. म्हणून अशा गोष्टींची थट्टा टाळावी, एवढेच नाही तर या संदर्भात कोणाला माहिती हवी असल्यास योग्य तोच सल्ला द्यावा अन्यथा एखाद्याचे सांसारिक जीवन उध्वस्त होऊ शकते. असेच आणखी एक उदाहरण बघा. 

सगळे म्हणतात कि, "संबंध कसे ठेवायचे हे कोणाला शिकवायला लागत नाही, लग्न झालं की ते आपोआप येतं! प्राण्यांना कोण शिकवतं?" हा समज मोडून काढायला हवा, नीट मार्गदर्शन घेतल्याशिवाय प्रजोत्पादनाचा उद्योग करू नये. आणि पतिपत्नी दोघांना सुखप्राप्ती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहेच. 

एकदा एकजण हनिमूनला गेलेला, तिथे गेल्यावर नेमकी त्याची पत्नी बाजूला झाली, म्हणजे तिला पाळी आली. उत्कंठा वाढल्यामुळे संप्रेरकांचे संतुलन बिघडून असे होऊ शकते. दोघेही नवखे असल्याने तो गोंधळून गेला,  त्याने मोठ्या विश्वासाने त्याच्या ओळखीच्या एका जुन्या जाणत्या व्यक्तीला फोन केला, की असं असं झालंय, तर आता काय करू?

त्यावर तो जुना जाणता माणूस हसला आणि म्हणाला, "अरे वा, आता तर अजून मजा येईल, पाळीत स्त्री पण तापलेली असते आणि लुब्रिकंट पण मिळतं " असे एकदम हिणकस आणि खालच्या पातळीचे उद्गार ऐकून तो खिन्न झाला!

ही गोष्ट खरी, की पाळी चालू असताना स्त्रीमध्ये कामभावना वाढलेली असते कारण शरीरसंबंध हा बऱ्याचदा 'पेन किलर' चे काम करतो आणि स्त्री शरीर अत्यंत पीडेत असल्याने त्यातून सुटका होण्यासाठी शरीरसंबंधांची सहज भावना उत्पन्न होते. पण यात मोठी हानी अशी आहे की या काळात संबंध आले तर बऱ्याचदा पाळी थांबते किंवा स्राव होण्याचे प्रमाण कमी होते, अथवा पाळी यायची वेळ जवळ आल्ये आणि त्यात संबंध आले तर पाळी लांबते सुद्धा!

म्हणून आपल्या धर्मशास्त्रात पतीने आपल्या रजस्वला स्त्रीचे मुखदर्शन सुद्धा घेऊ नये असे सांगितले आहे. कारण निर्धारापेक्षा इंद्रिये बलवान असतात हे पूर्वसुरींना माहीत होते. त्यामुळे, 'हे काय नेहमीचंच आहे, यात काय शिकवायचं? इतकी युगानुयुगे प्रजा वाढली ती काय लैंगिक शिक्षण घेऊन?' या भूमिकेचा त्याग करायला हवा! स्त्रीपुरुष संबंधांना थट्टा मस्करी म्हणून न बघता खेळीमेळीने आणि त्याच वेळेस गांभीर्याने हाताळले पाहिजे. 

टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यSexual Healthलैंगिक आरोग्य