शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Rituals: दिव्याची शिल्लक राहिलेली वात फेकू नका; त्याआधी वाचा 'हे' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 07:00 IST

Rituals: देवासमोर दिवा लावण्याचा प्रघात घरोघरी आहे, पण तो तेवत ठेवणारी वात योग्यरीत्या विसर्जित करावी असे शास्त्र सांगते, त्याचे नियम. 

शुभं करोति म्हणताना त्यात एक ओळ आहे, ज्यात 'दिवा जळू दे सारी रात' असे म्हटले आहे. म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत, निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढं तेल, तूप घालण्याएवढे वैभव आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना केली आहे. छोट्याशा ओळीत किती सुंदर मागणं मागितले आहे ना? वैभव आपल्याला, उजेड देवाला आणि सौख्य घराला! म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदादीप लावण्याचा प्रघात आहे. जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो. पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय? तेही जाणून घेऊ. 

घरात सुख, समृद्धी, शांती नांदावी म्हणून आपण सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो. बाहेर कितीही झगमगाट असला तरी संथ तेवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते. देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच, पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते. त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते. 

परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वात पूर्ण संपत नाही, त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते. ती वात पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो, पण ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो. पण शास्त्रात म्हटले आहे, की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका. तर पुढील नियमांचे पालन करा. 

>> ज्याप्रमाणे आपण निर्माल्य नदीत विसर्जित करतो, त्याबरोबरच अर्धवट जळलेली वात वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. 

>> निर्माल्याच्या फुलांचा खत म्हणून वापर करतो तसा जळलेल्या वातीला चांगल्या ठिकाणच्या मातीत पुरावे. 

>> हिंदू धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहे, आंबा, वड, पिंपळ, चिंच, आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जळलेली वात विसर्जित करावी. 

>> तसेच देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझवू नये, थोड्याशा जड वस्तूच्या मदतीने ज्योत मालवावी, अर्थात दिव्याला निरोप द्यावा. 

>> रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी. तेलात भिजवावी. मग पुरेसे तेल घालून अखंड दिवा ठेवावा. 

>> निरांजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्या न वापरता तुपात भिजवून ठेवाव्या, मगच निरंजनात लावून तूप घालून दिवा लावावा. 

>> तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच काडीने लावू नये. 

>> देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप, तेल न वापरता त्याची वेगळी सोय करून ठेवावी. 

>> दिवे नियमित उजळावे आणि वाती तयार ठेवाव्यात. 

>> काजळी धरेल एवढी मोठी वात ठेवू नये. दिव्याची ज्योत नेहमी माध्यम असावी. 

>> वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

>> वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्माल्यात टाकून वरील दिलेल्या नियमाप्रमाणे वापर करावा.