शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

Rituals: दिव्याची शिल्लक राहिलेली वात फेकू नका; त्याआधी वाचा 'हे' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 07:00 IST

Rituals: देवासमोर दिवा लावण्याचा प्रघात घरोघरी आहे, पण तो तेवत ठेवणारी वात योग्यरीत्या विसर्जित करावी असे शास्त्र सांगते, त्याचे नियम. 

शुभं करोति म्हणताना त्यात एक ओळ आहे, ज्यात 'दिवा जळू दे सारी रात' असे म्हटले आहे. म्हणजेच देवाजवळ लावलेल्या समयीत, निरंजनात रात्रभर दिवा तेवत राहो एवढं तेल, तूप घालण्याएवढे वैभव आम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना केली आहे. छोट्याशा ओळीत किती सुंदर मागणं मागितले आहे ना? वैभव आपल्याला, उजेड देवाला आणि सौख्य घराला! म्हणून सण उत्सवाला आपल्याकडे नंदादीप लावण्याचा प्रघात आहे. जो रात्रभर मंदपणे तेवत राहतो. पण त्यात शिल्लक राहिलेल्या वातीचे करायचे काय? तेही जाणून घेऊ. 

घरात सुख, समृद्धी, शांती नांदावी म्हणून आपण सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो. बाहेर कितीही झगमगाट असला तरी संथ तेवणारी दिव्याची ज्योत अधिक मंगलमयी वाटते. देवघरात दिवा लावल्याने देवाला तर प्रसन्न वाटतेच, पण तो गाभारा पाहून आपलेही मन प्रसन्न होते. त्यामुळे देवाची कृपादृष्टी तर राहतेच शिवाय घरातही वातावरण प्रसन्न राहते. 

परंतु अनेकदा दिव्यात लावलेली वात पूर्ण संपत नाही, त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते. ती वात पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो, पण ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो. पण शास्त्रात म्हटले आहे, की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका. तर पुढील नियमांचे पालन करा. 

>> ज्याप्रमाणे आपण निर्माल्य नदीत विसर्जित करतो, त्याबरोबरच अर्धवट जळलेली वात वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. 

>> निर्माल्याच्या फुलांचा खत म्हणून वापर करतो तसा जळलेल्या वातीला चांगल्या ठिकाणच्या मातीत पुरावे. 

>> हिंदू धर्मात जे पाच पवित्र वृक्ष सांगितले आहे, आंबा, वड, पिंपळ, चिंच, आवळा या वृक्षांच्या पायथ्याशी जळलेली वात विसर्जित करावी. 

>> तसेच देवाचा दिवा कधीही फुंकर मारून विझवू नये, थोड्याशा जड वस्तूच्या मदतीने ज्योत मालवावी, अर्थात दिव्याला निरोप द्यावा. 

>> रात्रभर दिवा तेवत ठेवायचा असेल तर वात मोठी आणि लांब घ्यावी. तेलात भिजवावी. मग पुरेसे तेल घालून अखंड दिवा ठेवावा. 

>> निरांजनाच्या अर्थात तुपाच्या वातीदेखील कोरड्या न वापरता तुपात भिजवून ठेवाव्या, मगच निरंजनात लावून तूप घालून दिवा लावावा. 

>> तेलाचा आणि तुपाचा दिवा एकाच काडीने लावू नये. 

>> देवाच्या दिव्यासाठी रोजच्या वापरातले तूप, तेल न वापरता त्याची वेगळी सोय करून ठेवावी. 

>> दिवे नियमित उजळावे आणि वाती तयार ठेवाव्यात. 

>> काजळी धरेल एवढी मोठी वात ठेवू नये. दिव्याची ज्योत नेहमी माध्यम असावी. 

>> वातीला पाण्याचा हात लागणार नाही किंवा दिव्यात पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

>> वापरलेल्या वाती कचरा कुंडीत न टाकता निर्माल्यात टाकून वरील दिलेल्या नियमाप्रमाणे वापर करावा.