शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही साखर खाऊन जा', असं आजी का म्हणायची? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:57 IST

Ritual And Science: आजही महत्त्वाच्या कामाला जाताना तसेच शुभ कार्याला सुरुवात करताना दही साखर देण्याची प्रथा का आहे ते जाणून घ्या. 

दही-साखर खाऊन घराबाहेर पडण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. आजही बरेच लोक त्याचे पालन करतात. अगदी रोज नाही, पण कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आई, आजी आपल्या हातावर चमचाभर दही साखर टेकवतातच; का? ते पाहू!

शतकानुशतके पाळले जाणारे अनेक नियम आणि प्रथा आजही सश्रद्ध भावनेने पाळल्या जातात. घरातील वडीलधाऱ्यांमुळे या परंपरा आजही टिकून आहेत. फरक एवढाच की पूर्वीचे लोक या परंपरा जतन करताना त्यामागील पार्श्वभूमीदेखील समजून घेत असत, आताची पिढी एकतर त्या प्रथांचा अनादर करते किंवा डोळे बंद करून पालन करते. संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी तशा घातकच! म्हणूनच या लेखात आपण दही साखर खाण्याच्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. 

घराबाहेर पडताना दही साखर देण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक कारण म्हणजे, ज्या कामासाठी जात आहे त्या कामाची पूर्तता व्हावी हा आशीर्वाद आणि सदिच्छा त्यामागे असतात. तर दही साखर देण्यामागे वैज्ञानिक कारण कोणते ते जाणून घेऊ. 

दही हे पाच अमृत तत्वांपैकी एक आहे -

हिंदू धर्मात, दही हे पाच अमृत तत्वांपैकी एक मानले गेले आहे, ज्यामुळे त्याचे धार्मिक दृष्ट्या महत्त्व वाढते. दह्याचा उपयोग पूजा, धार्मिक विधी इत्यादींमध्ये केला जातो. दह्यापासून पंचामृत बनवले जाते, महादेवालाही दह्याने अभिषेक केला जातो....

दह्याचा रंग पांढरा असल्यामुळे त्याचा संबंध चंद्राशी आहे आणि साखरेसोबत दही खाल्ल्याने चंद्र ग्रहापासून शुभ परिणाम मिळतात. चंद्राच्या शुभतेमुळे भाग्य बलवान होते आणि मनही शांत राहते. म्हणूनच शुभ कार्याला जाताना दही साखर दिले जात असे. 

वैज्ञानिक कारण जाणून घेऊ - 

दही हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. कारण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी6 आणि बी12 इत्यादी पोषक घटक असतात. त्यामुळे दह्याचा आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समावेश केला जातो.

अशा स्थितीत घराबाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखरेचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, कारण दह्यात साखर मिसळली की ती ग्लुकोजचे काम करते. त्यामुळे शरीरात ऊर्जा राहते आणि अपचनाचा त्रास होत नाही. 

थोडक्यात काय, तर आजीचा सल्ला, प्रथा, परंपरा, विश्वास याचा ज्योतिष शास्त्र आणि आरोग्याशीही संबंध आहे. म्हणून तुम्ही देखील पुढच्या वेळी महत्त्वाच्या कामाला निघताना दही साखर खाऊनच निघा!

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यscienceविज्ञान