शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही साखर खाऊन जा', असं आजी का म्हणायची? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:57 IST

Ritual And Science: आजही महत्त्वाच्या कामाला जाताना तसेच शुभ कार्याला सुरुवात करताना दही साखर देण्याची प्रथा का आहे ते जाणून घ्या. 

दही-साखर खाऊन घराबाहेर पडण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. आजही बरेच लोक त्याचे पालन करतात. अगदी रोज नाही, पण कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आई, आजी आपल्या हातावर चमचाभर दही साखर टेकवतातच; का? ते पाहू!

शतकानुशतके पाळले जाणारे अनेक नियम आणि प्रथा आजही सश्रद्ध भावनेने पाळल्या जातात. घरातील वडीलधाऱ्यांमुळे या परंपरा आजही टिकून आहेत. फरक एवढाच की पूर्वीचे लोक या परंपरा जतन करताना त्यामागील पार्श्वभूमीदेखील समजून घेत असत, आताची पिढी एकतर त्या प्रथांचा अनादर करते किंवा डोळे बंद करून पालन करते. संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी तशा घातकच! म्हणूनच या लेखात आपण दही साखर खाण्याच्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. 

घराबाहेर पडताना दही साखर देण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक कारण म्हणजे, ज्या कामासाठी जात आहे त्या कामाची पूर्तता व्हावी हा आशीर्वाद आणि सदिच्छा त्यामागे असतात. तर दही साखर देण्यामागे वैज्ञानिक कारण कोणते ते जाणून घेऊ. 

दही हे पाच अमृत तत्वांपैकी एक आहे -

हिंदू धर्मात, दही हे पाच अमृत तत्वांपैकी एक मानले गेले आहे, ज्यामुळे त्याचे धार्मिक दृष्ट्या महत्त्व वाढते. दह्याचा उपयोग पूजा, धार्मिक विधी इत्यादींमध्ये केला जातो. दह्यापासून पंचामृत बनवले जाते, महादेवालाही दह्याने अभिषेक केला जातो....

दह्याचा रंग पांढरा असल्यामुळे त्याचा संबंध चंद्राशी आहे आणि साखरेसोबत दही खाल्ल्याने चंद्र ग्रहापासून शुभ परिणाम मिळतात. चंद्राच्या शुभतेमुळे भाग्य बलवान होते आणि मनही शांत राहते. म्हणूनच शुभ कार्याला जाताना दही साखर दिले जात असे. 

वैज्ञानिक कारण जाणून घेऊ - 

दही हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. कारण त्यात प्रोटीन, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी6 आणि बी12 इत्यादी पोषक घटक असतात. त्यामुळे दह्याचा आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समावेश केला जातो.

अशा स्थितीत घराबाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखरेचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, कारण दह्यात साखर मिसळली की ती ग्लुकोजचे काम करते. त्यामुळे शरीरात ऊर्जा राहते आणि अपचनाचा त्रास होत नाही. 

थोडक्यात काय, तर आजीचा सल्ला, प्रथा, परंपरा, विश्वास याचा ज्योतिष शास्त्र आणि आरोग्याशीही संबंध आहे. म्हणून तुम्ही देखील पुढच्या वेळी महत्त्वाच्या कामाला निघताना दही साखर खाऊनच निघा!

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यscienceविज्ञान