शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वारंवार अपयश येतेय? भूतकाळात मिळालेले यश आठवा, त्यातच तुमचे भविष्य दडले आहे; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 07:00 IST

दुःखी, कष्टी असताना आपण दुःख उगाळून आणखी दुःखी होतो, मात्र हीच वेळ असते भूतकाळातील यश आठवून भविष्य घडवण्याची...

एका राजाकडे त्याचा खास हत्ती होता. त्याचे नाव होते बाला. धिप्पाड देहाचा बाला, युद्धभूमीवर गेला की शत्रूला धडकी भरे, अशी त्याची ऐट होती. आजवर त्याच्यामुळे राजाने अनेक युद्धात, तहात यश मिळवले होते. विजयश्री मिळाल्यावरदेखील राजा बालावर चढवलेल्या अंबारीवर बसून राज्यात प्रवेश करत असे. 

वयपरत्वे बाला थोडा थकत चालला होता. परंतु, राजाचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्याला आधीसारखाच मानसन्मान आणि राजेशाही थाट मिळत असे.

एक दिवस बालाला फिरवण्यासाठी सैनिक त्याला तळ्याकाठी घेऊन गेले. पाण्यात आंघोळ घालण्याच्या हेतूने त्यांना बालाला पुढे नेले, पण तळ्याकाठी भरपूर चिखल साचल्याने बालाचा पाय चिखलावरून सरकत खोल रुतून बसला. सैनिक त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते. स्वत: बाला देखील प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नव्हता.

ही बातमी राजाला कळली तर आपली काही खैर नाही. म्हणून घाबरलेले सैनिक प्रधानाकडे गेले. त्यांना विनंती केली आणि वाचवा असे म्हणाले. चतुर प्रधानाने तळ्याच्या चहुबाजूंनी रणवाद्ये वाजवायला सांगितली. ढोल, नगारे, दुदुंभी अशा रणवाद्यांनी जंगलाचा परिसर दुमदूमुन गेला. प्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे रणवाद्यांचा असर झाला आणि बाला उसळी मारून सर्वशक्तीनिशी चिखलातून बाहेर पडला. सैनिकांनी त्याला स्वच्छ धुवून काढले. झुल पांघरली आणि राजेशाही थाटात परत आणले.

राजाला ही वार्ता कळली. त्याने प्रधानाचे आभार मानले व रणवाद्यांचे प्रयोजन विचारले. त्यावर प्रधान म्हणाला, `राजेसाहेब बाला सामान्य हत्ती नाही, तर तो योध्दा आहे. त्याला रणवाद्य ऐकण्याची सवय असल्याने तो आवाज ऐकून त्याचे बाहू स्फुरण पावले आणि गर्भगळीत झालेला बाला सुखरूप बाहेर आला.'

बालासारखेच आपणही अनेकदा संकटाच्या चिखलात रुतून बसतो, गर्भगळीत होतो. अशावेळी आपण भूतकाळातील जिंकलेल्या युद्धप्रसंगांचा आढावा घेतला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी