शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नवरा बायकोचे नाते खरोखरच जन्मोजन्मीचे असते का? सांगत आहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 11:21 IST

नवरा बायकोच्या नात्यात तर एवढी गुंतागुंत असते, की 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती असते. अशा नात्याला समजून घेण्यासाठी एक जन्मदेखील पुरणार नाही. म्हणून सात जन्माचा कालावधी दिला आहे. 

लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात, असे आपण ऐकत आलो आहोत. त्यानुसार आपला जोडीदार मिळण्याच्या प्रतिक्षेत आयुष्यातील कितीतरी काळ आपण घालवतो. जेव्हा स्थळं सांगून येतात, सुचवली जातात, तेव्हा त्यात उणिवा शोधत स्थळ योग्य नाही म्हणत नकार कळवतो आणि सरतेशेवटी लग्न झाले, की गेल्या जन्मातही याच जिवाशी आपली गाठ पडली होती का, याचा शोध घेत बसतो. 

सद्गुरु सांगतात, 'सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील सर्व विचार डोक्यातून काढून टाका. वास्तवात या. मागच्या जन्माचा शोध घेण्याआधी या जन्मात आपण काय कर्तृत्त्व गाजवले याचा विचार करा. आपल्या जोडीदाराशी जन्मोजन्मीच्या नात्यांचा शोध घेण्यापेक्षा या जन्मात त्याच्याशी आपले भावनिक बंध जुळले आहेत की नाही, आपण त्याला समजून घेत आहोत की नाही, आपले नाते सांभाळण्यासाठी आपण सक्षम आहोत की नाही, या गोष्टींचा विचार करा. 

या बाबतीत आजची पिढी वास्तवाला धरून असते. एखाद्या उत्पादनावरील निर्मिती तारीख आणि अंतिम तारीख ज्याप्रमाणे तपासून घेते, त्याचप्रमाणे नाते जोडताना आपण ते कितीकाळ निभावू  शकू याचाही विचार करते. अर्थात या धरसोड वृत्तीचा त्यांना त्रास होतो. परंतु, ते भूतकाळाचा विचार न करता वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करतात, ही बाब येथे अधोरेखित करायची आहे. 

नवरा बायकोचे नाते साता जन्माचे असते, असा विचार, संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्याला घालून दिला आहे. तो यासाठी, की नाते रुजण्यासाठी, मुरण्यासाठी आणि बहरण्यासाठी त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. नवरा बायकोच्या नात्यात तर एवढी गुंतागुंत असते, की 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती असते. अशा नात्याला समजून घेण्यासाठी एक जन्मदेखील पुरणार नाही. म्हणून सात जन्माचा कालावधी दिला आहे. 

तुर्तास हा हिशोब बाजूला राहू द्या. आपल्या सान्निध्यात चोवीस तास राहणारी, लग्नगाठ बांधून आपल्या जीवनात आलेली व्यक्ती आपण तिच्या गुणदोषांसकट स्वीकारली आहे का? आपण आपल्या नात्याचा आदर करतो का? आपले नाते बहरण्यासाठी आपण वेळ देतो का? एकदुऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचा विचार होणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपल्याला गतजन्माबद्दल माहीत नाही, भविष्यात काय घडणार तेही माहित नाही, मग आपल्या हातात उरतो तो केवळ वर्तमानकाळ. तो बहरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. नवरा बायकोचे नाते अतिशय सुंदर असते. इतर नात्यांपेक्षा हे नाते सर्वात जास्त परिचयाचे असते. म्हणून हे नाते पदोपदी जपण्याचा पूर्ण प्रयत्न करा. रोजचा दिवस हा नवीन जन्म असतो. या हिशोबाने नाते छान जपले, तर निदान या आयुष्यात जन्मोजन्मीच्या नात्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकेल.