शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कृष्णाच्या मुकुटात मोरपीस का, याचे कारण सापडते रामकथेत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 14:44 IST

भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवून सर्वांशी कृतज्ञतेने वागले पाहिजे

कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत, असे म्हणतात. परमेश्वराने हा आदर्श त्याच्या कृतीतून घालून दिला आहे. जसे की कृष्णावतारात त्याच्या मुकुटात सदोदित खोवलेले मोरपीस! त्यात केवळ कृष्णाची रसिकता नाही, तर कृतज्ञ भाव दडलेला आहे. हा कृतज्ञ भाव कोणाप्रती? हे जाणून घेण्यासाठी वाचा ही छानशी गोष्ट...

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले. पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की, जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी  उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहचाल.

मोरपंख एका विशेष काळी व एका विशेष ऋतुमध्ये आपणहून तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यु होतो. रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता, पण प्रभू कार्यार्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा मृत्यूचा जवळ आला. जलाशयाजवळ प्रभू रामचंद्र पोहोचले  तेव्हा मोर म्हणाला की, 'मी किती भाग्यशाली आहे की, जो या सृष्टीची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.'

तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मोराला म्हटले की, माझ्यासाठी जे सुंदर मोरपंख तू अकाली काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहेत व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन. 

त्यानुसार पुढच्या अवतारात, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करुन दिलेल्या वचनानुसार मयुराचे ऋण व्यक्त केले. शिवाय त्याच्या ऋणात कायम राहण्यासाठी आहे त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही. 

भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागले पाहिजे. माता, पिता, गुरु, नातेवाईक, समाज, निसर्ग या सर्वांचाच आपल्या जडण घडणीत मोठा वाटा आहे. शिवाय ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, श्वास दिला, निरोगी, सुदृढ शरीर दिले, त्याच्या ऋणात कायम राहिले पाहिजे.