शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कृष्णाच्या मुकुटात मोरपीस का, याचे कारण सापडते रामकथेत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 14:44 IST

भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवून सर्वांशी कृतज्ञतेने वागले पाहिजे

कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत, असे म्हणतात. परमेश्वराने हा आदर्श त्याच्या कृतीतून घालून दिला आहे. जसे की कृष्णावतारात त्याच्या मुकुटात सदोदित खोवलेले मोरपीस! त्यात केवळ कृष्णाची रसिकता नाही, तर कृतज्ञ भाव दडलेला आहे. हा कृतज्ञ भाव कोणाप्रती? हे जाणून घेण्यासाठी वाचा ही छानशी गोष्ट...

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले. पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की, जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी  उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहचाल.

मोरपंख एका विशेष काळी व एका विशेष ऋतुमध्ये आपणहून तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यु होतो. रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता, पण प्रभू कार्यार्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा मृत्यूचा जवळ आला. जलाशयाजवळ प्रभू रामचंद्र पोहोचले  तेव्हा मोर म्हणाला की, 'मी किती भाग्यशाली आहे की, जो या सृष्टीची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.'

तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मोराला म्हटले की, माझ्यासाठी जे सुंदर मोरपंख तू अकाली काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहेत व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन. 

त्यानुसार पुढच्या अवतारात, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करुन दिलेल्या वचनानुसार मयुराचे ऋण व्यक्त केले. शिवाय त्याच्या ऋणात कायम राहण्यासाठी आहे त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही. 

भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागले पाहिजे. माता, पिता, गुरु, नातेवाईक, समाज, निसर्ग या सर्वांचाच आपल्या जडण घडणीत मोठा वाटा आहे. शिवाय ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, श्वास दिला, निरोगी, सुदृढ शरीर दिले, त्याच्या ऋणात कायम राहिले पाहिजे.