शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

नैराश्य आले आहे, असे वाटत असेल तेव्हा ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 14:50 IST

तुलना करायचीच असेल तर लोकांच्या सुखाशी तुलना करू नका, तर दुःखाशी करा म्हणजे आपण किती सुखात आहोत हे कळेल.

एक संसारी माणूस गेले अनेक दिवस घरी चिडचिड करत होता. ऑफिस कामातही त्याचे लक्ष लागेना. कोणाशी बोलावेसे वाटेना. रोेजचे काम, डोक्यावरचे कर्ज, भविष्यातले प्रश्न यासर्वांनी तो पिचून गेला होता. बाहेरचा सगळा राग तो घरच्यांवर काढत असे. 

एक दिवस तो घरी आल्यावर बायकोने शांतपणे त्याला रागराग होण्याचे कारण विचारले. त्याच्याजवळ उत्तर नव्हते. तो एवढेच म्हणाला, की 'मला ही नैराश्याची सुरुवात आहे असे वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही असे सतत वाटून निरुत्साहीपणा जाणवत राहतो.'

बायको म्हणाली, `माझ्या ओळखीत एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते भविष्यही पाहतात. त्यांच्याशी बोलून पाहता का? ते तुमचे मानसिक प्रश्न आणि त्याचबरोबर तुमची ग्रहदशा पाहून उकल सांगतील.'

नवऱ्याला उपाय पटला. त्याने तज्ञांची भेट घेतली व आपली पत्रिका दाखवली. तज्ञांनी पत्रिकेवरून नजर टाकत म्हटले, ग्रहदशा व्यवस्थित आहे. तुमचे प्रश्न मानसिक स्थितीशी जोडले आहेत असे वाटते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी काही विचारतो, ते सांगा.'

असे म्हणत तज्ञांनी त्या माणसाला त्यांच्या शालेय मित्रांशी संपर्क आहे का असे विचारले. त्यांच्याशी भेटीगाठी करण्याचा सल्ला दिला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटा असे सांगितले. त्या माणसाने तसे केले. जुन्या ओळखी शोधून शालेय मित्रांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तज्ञांना जाऊन भेटला. 

तज्ञांनी विचारले, 'शालेय मित्रांना भेटून कसे वाटले?'तो म्हणाला, 'सर, तुमचा उपाय खूपच परिणामकारक ठरला. माझ्या शालेय मित्रांपैकी अनेक जण चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. काही जण वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत तर काही दु:खी! काही जणांनी लग्नच केले नाही, तर काही जणांचे दोनदा लग्न होऊन मोडले. काही जण आजारांनी ग्रासले आहेत, तर काही जण आजाराच्या भितीने जगत आहेत. या सर्वांशी तुलना केली असता माझ्या वाट्याला यापैकी काहीच नाही. तरी मी उगीचच दु:खी होतो. पण का? हे मात्र मला कळले नाही! कृपया सांगा.'

तज्ञ म्हणाले, 'अनेकदा सुख टोचते म्हणतात, ते हेच. आपण अकारण छोटी मोठी दु:खं उगाळत बसतो. परंतु, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्यावर कळते, की त्यांच्या तुलनेत आपले दु:खं काहीच नाही. मूळात हे कोणतेही दु:खं नसून काही काळासाठी मनावर आलेले मळभ आहे, ते दूर करणे आपल्या हाती आहे. त्याला नैराश्याचे लेबल लावून मिरवण्यापेक्षा लोकांशी भेटून, बोलून त्यांच्या सुखाऐवजी दु:खाशी तुलना करावी, म्हणजे आपण किती सुस्थितीत आहोत याची आपल्याला जाणीव होईल. 

म्हणतात ना, पायात चप्पल नाही याचे दु:खं करू नका, अनेकांना चप्पच दूरच, पण पायही नाहीत! म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि मनावरचे मळभ दूर सारून नैराश्य झटकून नव्या दमाने कामाला लागा. जमलेच, तर दुसऱ्यांनाही नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत करा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी