शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्य आले आहे, असे वाटत असेल तेव्हा ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 14:50 IST

तुलना करायचीच असेल तर लोकांच्या सुखाशी तुलना करू नका, तर दुःखाशी करा म्हणजे आपण किती सुखात आहोत हे कळेल.

एक संसारी माणूस गेले अनेक दिवस घरी चिडचिड करत होता. ऑफिस कामातही त्याचे लक्ष लागेना. कोणाशी बोलावेसे वाटेना. रोेजचे काम, डोक्यावरचे कर्ज, भविष्यातले प्रश्न यासर्वांनी तो पिचून गेला होता. बाहेरचा सगळा राग तो घरच्यांवर काढत असे. 

एक दिवस तो घरी आल्यावर बायकोने शांतपणे त्याला रागराग होण्याचे कारण विचारले. त्याच्याजवळ उत्तर नव्हते. तो एवढेच म्हणाला, की 'मला ही नैराश्याची सुरुवात आहे असे वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही असे सतत वाटून निरुत्साहीपणा जाणवत राहतो.'

बायको म्हणाली, `माझ्या ओळखीत एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते भविष्यही पाहतात. त्यांच्याशी बोलून पाहता का? ते तुमचे मानसिक प्रश्न आणि त्याचबरोबर तुमची ग्रहदशा पाहून उकल सांगतील.'

नवऱ्याला उपाय पटला. त्याने तज्ञांची भेट घेतली व आपली पत्रिका दाखवली. तज्ञांनी पत्रिकेवरून नजर टाकत म्हटले, ग्रहदशा व्यवस्थित आहे. तुमचे प्रश्न मानसिक स्थितीशी जोडले आहेत असे वाटते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी काही विचारतो, ते सांगा.'

असे म्हणत तज्ञांनी त्या माणसाला त्यांच्या शालेय मित्रांशी संपर्क आहे का असे विचारले. त्यांच्याशी भेटीगाठी करण्याचा सल्ला दिला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटा असे सांगितले. त्या माणसाने तसे केले. जुन्या ओळखी शोधून शालेय मित्रांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात तो पुन्हा तज्ञांना जाऊन भेटला. 

तज्ञांनी विचारले, 'शालेय मित्रांना भेटून कसे वाटले?'तो म्हणाला, 'सर, तुमचा उपाय खूपच परिणामकारक ठरला. माझ्या शालेय मित्रांपैकी अनेक जण चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. काही जण वैयक्तिक आयुष्यात सुखी आहेत तर काही दु:खी! काही जणांनी लग्नच केले नाही, तर काही जणांचे दोनदा लग्न होऊन मोडले. काही जण आजारांनी ग्रासले आहेत, तर काही जण आजाराच्या भितीने जगत आहेत. या सर्वांशी तुलना केली असता माझ्या वाट्याला यापैकी काहीच नाही. तरी मी उगीचच दु:खी होतो. पण का? हे मात्र मला कळले नाही! कृपया सांगा.'

तज्ञ म्हणाले, 'अनेकदा सुख टोचते म्हणतात, ते हेच. आपण अकारण छोटी मोठी दु:खं उगाळत बसतो. परंतु, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्यावर कळते, की त्यांच्या तुलनेत आपले दु:खं काहीच नाही. मूळात हे कोणतेही दु:खं नसून काही काळासाठी मनावर आलेले मळभ आहे, ते दूर करणे आपल्या हाती आहे. त्याला नैराश्याचे लेबल लावून मिरवण्यापेक्षा लोकांशी भेटून, बोलून त्यांच्या सुखाऐवजी दु:खाशी तुलना करावी, म्हणजे आपण किती सुस्थितीत आहोत याची आपल्याला जाणीव होईल. 

म्हणतात ना, पायात चप्पल नाही याचे दु:खं करू नका, अनेकांना चप्पच दूरच, पण पायही नाहीत! म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि मनावरचे मळभ दूर सारून नैराश्य झटकून नव्या दमाने कामाला लागा. जमलेच, तर दुसऱ्यांनाही नैराश्याच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत करा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी