शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

...काय भुललासि वरलिया रंगा? वाचा एका आईची हृदयद्रावक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 08:00 IST

रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.

ही गोष्ट आहे एका लेखकाची. त्याने आपल्या पुस्तकात ही गोष्ट लिहून ठेवली आणि बालपणापासून आपल्याकडून घडलेल्या चुकीची जाहीर कबुलीसुद्धा दिली. काय होती ती चूक, जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत गोष्ट वाचा...

गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला. आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रुप आणि क्रूर दिसत असे. तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते. तिच्या भयावह दिसण्यामुळे तिला कामही मिळेना. बांधकाम मजूर म्हणून काबाड कष्ट करत तिने संसारगाडा ओढला. मुलाला शिक्षण दिले, मोठे केले.

आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मियता वाटली नाही. कारण ती इतर चाघचौघांच्या आईसारखी सुंदर नव्हती. उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोंबकळलेली त्वचा, निकामी झालेला डोळा, बेढब ओठ पाहणे मुलगा टाळत असे. त्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायचे ठरवले. तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला.

आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे. मुलाने आईशी नाते तोडले परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवित असे. अनेक वर्षे लोटली, परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण चौकशीचा साधा फोनही केला नाही.

एक दिवस मनीऑर्डर परत आली. त्याबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली. क्षणभर तो स्तब्ध झाला. आईला आयुष्यभर पाहिले नाहीच, शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही. या पश्चात्तापाने त्याने गावाकडे धाव घेतली. आईच्या झोपडीवजा घराला कुलूप होते. गावकरी कुत्सित नजरेने मुलाकडे पाहत होते. मुलगा शरमेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला, चावी घेतली आणि घरात शिरला. त्याला बालपणीचे दिवस आठवले. घरात मोजकेच सामान होते. एक ट्रंक होती आणि त्यात एका बरणीत पैसे साठवले होते. बरणीखाली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते, 

`बाळा, आज ना उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहित नाही. मी ही अशी अडाणी, तू मला भेटायला यावं, तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही. पण बNयाच गोष्टी तुला सांगायच्या होत्या, त्या न ऐकताच तू निघून गेलास. म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे. 

'तू ज्या रुपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली. तान्हा बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास. तुला वाचवण्यासाठी मी धावले, तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाले. पण तू वाचलास...हेच समाधान. तुझे बाबा सोडून गेले. कष्टात दिवस काढले. हे सगळं सांगायला सवड मिळाली नाही. जेव्हा हात पाय थकून जागी बसले, तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास. तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत. या बरणीत जमा करून ठेवले आहेत. तुझ्या मुलांना यातून खाऊ दे. तो तूच तुझ्या पैशांनी दिला आहे सांग, नाहीतर त्यांना चांडाळणीसारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही. नेहमी सुखी राहा. देव न करो, तुझ्यावर कधी असा प्रसंग येवो आणि कधी आलाच तर लक्षात ठेव, रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.'

पत्र वाचून मुलगा धाय मोकलून रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आली...!