शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...काय भुललासि वरलिया रंगा? वाचा एका आईची हृदयद्रावक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 08:00 IST

रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.

ही गोष्ट आहे एका लेखकाची. त्याने आपल्या पुस्तकात ही गोष्ट लिहून ठेवली आणि बालपणापासून आपल्याकडून घडलेल्या चुकीची जाहीर कबुलीसुद्धा दिली. काय होती ती चूक, जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत गोष्ट वाचा...

गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला. आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रुप आणि क्रूर दिसत असे. तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते. तिच्या भयावह दिसण्यामुळे तिला कामही मिळेना. बांधकाम मजूर म्हणून काबाड कष्ट करत तिने संसारगाडा ओढला. मुलाला शिक्षण दिले, मोठे केले.

आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मियता वाटली नाही. कारण ती इतर चाघचौघांच्या आईसारखी सुंदर नव्हती. उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोंबकळलेली त्वचा, निकामी झालेला डोळा, बेढब ओठ पाहणे मुलगा टाळत असे. त्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायचे ठरवले. तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला.

आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे. मुलाने आईशी नाते तोडले परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवित असे. अनेक वर्षे लोटली, परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण चौकशीचा साधा फोनही केला नाही.

एक दिवस मनीऑर्डर परत आली. त्याबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली. क्षणभर तो स्तब्ध झाला. आईला आयुष्यभर पाहिले नाहीच, शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही. या पश्चात्तापाने त्याने गावाकडे धाव घेतली. आईच्या झोपडीवजा घराला कुलूप होते. गावकरी कुत्सित नजरेने मुलाकडे पाहत होते. मुलगा शरमेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला, चावी घेतली आणि घरात शिरला. त्याला बालपणीचे दिवस आठवले. घरात मोजकेच सामान होते. एक ट्रंक होती आणि त्यात एका बरणीत पैसे साठवले होते. बरणीखाली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते, 

`बाळा, आज ना उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहित नाही. मी ही अशी अडाणी, तू मला भेटायला यावं, तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही. पण बNयाच गोष्टी तुला सांगायच्या होत्या, त्या न ऐकताच तू निघून गेलास. म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे. 

'तू ज्या रुपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली. तान्हा बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास. तुला वाचवण्यासाठी मी धावले, तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाले. पण तू वाचलास...हेच समाधान. तुझे बाबा सोडून गेले. कष्टात दिवस काढले. हे सगळं सांगायला सवड मिळाली नाही. जेव्हा हात पाय थकून जागी बसले, तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास. तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत. या बरणीत जमा करून ठेवले आहेत. तुझ्या मुलांना यातून खाऊ दे. तो तूच तुझ्या पैशांनी दिला आहे सांग, नाहीतर त्यांना चांडाळणीसारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही. नेहमी सुखी राहा. देव न करो, तुझ्यावर कधी असा प्रसंग येवो आणि कधी आलाच तर लक्षात ठेव, रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.'

पत्र वाचून मुलगा धाय मोकलून रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आली...!