शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

...काय भुललासि वरलिया रंगा? वाचा एका आईची हृदयद्रावक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 08:00 IST

रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.

ही गोष्ट आहे एका लेखकाची. त्याने आपल्या पुस्तकात ही गोष्ट लिहून ठेवली आणि बालपणापासून आपल्याकडून घडलेल्या चुकीची जाहीर कबुलीसुद्धा दिली. काय होती ती चूक, जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत गोष्ट वाचा...

गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला. आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रुप आणि क्रूर दिसत असे. तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते. तिच्या भयावह दिसण्यामुळे तिला कामही मिळेना. बांधकाम मजूर म्हणून काबाड कष्ट करत तिने संसारगाडा ओढला. मुलाला शिक्षण दिले, मोठे केले.

आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मियता वाटली नाही. कारण ती इतर चाघचौघांच्या आईसारखी सुंदर नव्हती. उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोंबकळलेली त्वचा, निकामी झालेला डोळा, बेढब ओठ पाहणे मुलगा टाळत असे. त्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायचे ठरवले. तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला.

आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे. मुलाने आईशी नाते तोडले परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवित असे. अनेक वर्षे लोटली, परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण चौकशीचा साधा फोनही केला नाही.

एक दिवस मनीऑर्डर परत आली. त्याबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली. क्षणभर तो स्तब्ध झाला. आईला आयुष्यभर पाहिले नाहीच, शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही. या पश्चात्तापाने त्याने गावाकडे धाव घेतली. आईच्या झोपडीवजा घराला कुलूप होते. गावकरी कुत्सित नजरेने मुलाकडे पाहत होते. मुलगा शरमेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला, चावी घेतली आणि घरात शिरला. त्याला बालपणीचे दिवस आठवले. घरात मोजकेच सामान होते. एक ट्रंक होती आणि त्यात एका बरणीत पैसे साठवले होते. बरणीखाली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते, 

`बाळा, आज ना उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहित नाही. मी ही अशी अडाणी, तू मला भेटायला यावं, तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही. पण बNयाच गोष्टी तुला सांगायच्या होत्या, त्या न ऐकताच तू निघून गेलास. म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे. 

'तू ज्या रुपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली. तान्हा बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास. तुला वाचवण्यासाठी मी धावले, तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाले. पण तू वाचलास...हेच समाधान. तुझे बाबा सोडून गेले. कष्टात दिवस काढले. हे सगळं सांगायला सवड मिळाली नाही. जेव्हा हात पाय थकून जागी बसले, तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास. तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत. या बरणीत जमा करून ठेवले आहेत. तुझ्या मुलांना यातून खाऊ दे. तो तूच तुझ्या पैशांनी दिला आहे सांग, नाहीतर त्यांना चांडाळणीसारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही. नेहमी सुखी राहा. देव न करो, तुझ्यावर कधी असा प्रसंग येवो आणि कधी आलाच तर लक्षात ठेव, रंग, रूप, तारुण्य, वार्धक्य हे क्षणभंगूर आहे, जो माणसाचे मन जाणतो, तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो.'

पत्र वाचून मुलगा धाय मोकलून रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आली...!