शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्मासात लग्न का केले जात नाही, त्यामागे असलेले शास्त्रीय कारण वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:42 IST

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. 

'चातुर्मास' हा कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला जातो. केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, संस्कृती, सामाजिक वातावरण इत्यादी सर्वचदृष्ट्या तो अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. विशेष म्हणजे या काळात काही गोष्टी अवश्य पाळाव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे सांगितले आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. 

चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीस होऊन समाप्ती कार्तिक द्वादशीस होते. भौगालिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय स्थित्यंतराचा असतो. कारण पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप जसे बदललेले असते तसेच मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इ. खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत. 

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात आहे. रुपकात्मकदृष्ट्या ब्रह्मदेवाचे नवसृष्टीनिर्मितीचे कार्य जोमाने चालू असते, तर पालनकर्त्या विष्णूचे कार्य मंदावलेले असते. म्हणूनच चातुर्मासात `विष्णूशयन' म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. म्हणून चातुर्मासाच्या काळात विवाहाचा वा तत्सम अन्य कार्यांचा निषेध सांगितला आहे.

लग्नासारखा आयुष्याला कलाटणी देणारा विधी देवाब्राह्मणाच्या साक्षीने करावा, म्हणून देव विश्रांती घेत असतानाच्या काळात विवाह टाळला जातो. पण विवाहाचा निषेध असला तरी विवाहाची प्राथमिक तयारी, म्हणजे स्थळ पाहणे, प्राथमिक बोलणे करणे, साखरपुडा करणे या गोष्टींना हरकत नसते. त्यामुळे लग्न लांबणीवर गेले याचे दुःख न बाळगता चार महिन्यांनी खुद्द भगवंत दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील हा विचार आणि विश्वास आपण ठेवायला हवा.