शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्मासात लग्न का केले जात नाही, त्यामागे असलेले शास्त्रीय कारण वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:42 IST

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. 

'चातुर्मास' हा कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला जातो. केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, संस्कृती, सामाजिक वातावरण इत्यादी सर्वचदृष्ट्या तो अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. विशेष म्हणजे या काळात काही गोष्टी अवश्य पाळाव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे सांगितले आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. 

चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीस होऊन समाप्ती कार्तिक द्वादशीस होते. भौगालिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय स्थित्यंतराचा असतो. कारण पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप जसे बदललेले असते तसेच मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इ. खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत. 

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात आहे. रुपकात्मकदृष्ट्या ब्रह्मदेवाचे नवसृष्टीनिर्मितीचे कार्य जोमाने चालू असते, तर पालनकर्त्या विष्णूचे कार्य मंदावलेले असते. म्हणूनच चातुर्मासात `विष्णूशयन' म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. म्हणून चातुर्मासाच्या काळात विवाहाचा वा तत्सम अन्य कार्यांचा निषेध सांगितला आहे.

लग्नासारखा आयुष्याला कलाटणी देणारा विधी देवाब्राह्मणाच्या साक्षीने करावा, म्हणून देव विश्रांती घेत असतानाच्या काळात विवाह टाळला जातो. पण विवाहाचा निषेध असला तरी विवाहाची प्राथमिक तयारी, म्हणजे स्थळ पाहणे, प्राथमिक बोलणे करणे, साखरपुडा करणे या गोष्टींना हरकत नसते. त्यामुळे लग्न लांबणीवर गेले याचे दुःख न बाळगता चार महिन्यांनी खुद्द भगवंत दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील हा विचार आणि विश्वास आपण ठेवायला हवा.