शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Chaitra Navratra 2021 : चैत्रात गौरी माहेरी येते आणि अक्षय्यतृतीयेला सासरी परत जाते; वाचा हा आनंदसोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 10:02 IST

Chaitra Navratra 2021 : पूर्वी हळदीकुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना विरंगुळा मिळावा,ओळखी व्हाव्यात, ताणतणावातून थोडा विसावा मिळावा, घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आजही त्याच हेतूने हा समारंभ केला जातो.

महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळे आसन देऊन स्थापना करतात व  महिनाभर तिची पूजा करतात. त्यानिमित्ताने सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदीकुंकू समारंभ करतात. त्यावेळी घरी आलेल्या लेकी सुनांचे पाय धुतात. त्यांच्या हातांना थंडाव्याचे प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावून मग त्यावरून शिंपल्याचा वरचा शिरांचा भाग फिरवतात. यावेळी भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळासह ओटी भरतात. वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे हा या समारंभातील आतिथ्याचा एक भाग असतो. यावेळी 'गौरीचे माहेर' नावाचे एक गाणे आरतीत म्हटले जाते. चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते. सगळे कौतुकसोहळे करवून घेते आणि अक्षय्यतृतीयेला परत सासरी जाते, असे मानून सारे विधी केले जातात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर या सोहळ्याचे सुंदर वर्णन करतात...

चैत्रांगण : गौरीसमोर अथवा गौरीसाठथी घराबाहेरील अंगणात एका चौकोनात वेगवेगळ्या सुबक रांगोळ्या काढणे हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट असते. या रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात. या रांगोळ्या चंद्र, सूर्य, गोपद्म, कासव, हत्ती, तुळशीवृंदावन, फेर धरून नाचणाऱ्या मुली, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावले, राधाकृष्ण अशासारखे ठराविक विषय, प्रतीक म्हणून रेखाटल्या जातात. रोज सकाळी अंगण सारवून अशा रांगोळ्या काढून त्यांना हळद, कुंकू, फुले वाहतात.

चैत्रांगणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढण्याच्या प्रथेमुळे मुलींमधील, स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना प्रकट होण्यास वाव मिळतो. रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते. नेत्रदीपक रांगोळी रेखाटल्याचे स्त्रीमनाला समाधान मिळते. चैत्रांगण रेखाटताना तोच आनंद मनाला व्यापून टाकतो. वसंत ऋतूबरोबर बहरणारी चैत्रपालवी चैत्रांगणाच्या निमित्ताने स्त्रीमनालादेखील उल्हसित करावी, हा त्यामागता हेतू!

पूर्वी हळदीकुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना विरंगुळा मिळावा, समाजातील, गावातील इतर स्त्रियांशी परिचय व्हावा, ताणतणावातून थोडा विसावा मिळावा, नित्याच्या कामातून घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आता स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेरच्या जगात वावरत असल्या, तरी त्यांनाही अनेक व्याप ताप असतात. चिंता, काळजी असते. या चिंता, विवंचना काही काळ विसता याव्यात, तणाव हलके व्हावेत म्हणून आजही असे हळदीकुंकू समारंभ आवश्यक आहेत. अशा समारंभात सर्व स्तरातील स्त्रियांनी एकत्र आले पाहिजे. सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी देणारा हा चैत्र नवरात्रीचा आनंदसोहळा आहे.

चैत्रपालवी, चैत्रगौर, चैत्रांगण आणखीही बरेच काही दडले आहे या आल्हाददायी चैत्र मासात!

टॅग्स :Navratriनवरात्री