शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

केवळ 'या' शापामुळे रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही, उत्तरकांडमध्ये सापडते कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 16:53 IST

रावणाचा उदो उदो करण्याआधी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा. 

अलीकडच्या काळात अनेक जण रावणाचे समर्थन करताना आढळतात. रावण महान विद्वान, पंडित, शूर, वीर, सर्व कलांमध्ये निपुण होता, परंतु त्याने या सर्व गुणांचा गैरवापर केल्यामुळे त्याचा उदो उदो करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही, असा चुकीचा समज करून घेतला जातो. परंतु त्यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे कारण उत्तरकांड मध्ये सापडते. 

वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडमध्ये २६ व्या अध्यायात ३९ व्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळते. त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार, रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला. तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला. स्वर्ग लोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती. 

रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकले. त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली, तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आणि मी तुमची भावी सून आहे.  तसे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही. म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका. परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती आजमावू लागला. रंभेने तिथून पळ काढला आणि तिने नलकुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली. त्यावर रागाच्या भरात नलकुबेराने आपल्या सख्ख्या काकाला म्हणजेच रावणाला शाप दिला, 'तू कोणत्याही परस्त्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शीर धडापासून वेगळे होईल. तू दशानन राहणार नाहीस. तुझा लौकिक पुसला जाईल.' 

या शापामुळे रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही. म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता. परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना भुलली नाही. तिचे रामावर आणि रामाचे सीतेवर निस्सीम प्रेम होते. याच गोष्टीची रावणाला मनस्वी चीड होती. म्हणून त्याने रामाला संपवण्याचा निश्चय केला होता. परंतु झाले वेगळेच! रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय आणि रामाचा विजय झाला. 

म्हणून यापुढे कधीही रावणाचा उदो उदो करण्याआधी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा. 

टॅग्स :ramayanरामायण