शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

RathaSaptami 2024: रथसप्तमीच्या मुहूर्तावर केलेले वास्तुबदल कायमस्वरूपी उजळवतील तुमचे घर आणि भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:01 IST

RathaSaptami 2024: १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, या दिवशी सूर्यपुजा केली जाते, त्यादृष्टीने दिलेले वास्तु बदल नक्कीच शुभ ठरतील.

वास्तू उभारताना पूर्व दिशा पाहिली जाते. जेणेकरून वास्तूमध्ये पुरेपूर सूर्यप्रकाश व्यापून राहावा. जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून आनंद आणि शांतता नांदते. यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार घरातील कोणत्या खोलीची जागा कुठे असावी हे जाणून घ्या!

वास्तुशास्त्राच्या पुढील नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये बदल केले, तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला काही काळातच दिसून येईल. घरातील आर्थिक, मानसिक, शारीरिक परिस्थितीतही बदल घडताना दिसतील. त्यासाठी या किरकोळ बदलांनी सुरुवात करा. 

>> सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे पहाटे ३-६ हा ब्रह्म मुहूर्त. यावेळी सूर्य घराच्या उत्तर-पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजागृह बनवावे.

>> सकाळी ६-९ या वेळेत सूर्य घराच्या पूर्व दिशेलाच असतो, त्यामुळे त्या दिशेने घरात सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करा. त्या दिशेला खिडकी असणे उत्तम, मात्र त्याच्या समोर काही वस्तू ठेवून सूर्यप्रकाशाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवू नका. मोकळी हवा, सूर्यप्रकाश घरात खेळू द्या. त्यामुळे आजार पसरवणारे सूक्ष्म जीव नाहीसे होऊन कुटुंब स्वास्थ्य जपले जाईल. 

>> सकाळी ९-१२ पर्यंत सूर्य घराच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाकासाठी योग्य आहे. ज्याप्रमाणे पोटाती>> ल अग्नी प्रज्वलित झाल्यावर आपण जेवतो, तसे स्वयंपाक बनवतानाही सूर्यप्रकाशाच्या उजेडात बनवलेला स्वयंपाक आरोग्यासाठी पोषक ठरेल आणि तो बनवताना गृहिणीलाही प्रसन्न वाटेल. 

>> दुपारी १२-३ ही आपल्या विश्रांतीची वेळ असते. अशा वेळी सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि त्यावेळेस सूर्याची प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतात, त्यामुळे विश्रांती दरम्यान खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून ती किरणं घरात येण्यापासून आळा घालावा. 

>> अभ्यास व कामाची वेळ दुपारी ३-६ अशी असून त्यावेळेस सूर्य नैऋत्य भागात असतो. त्यामुळे स्टडी रूम किंवा लायब्ररीसाठी ही दिशा उत्तम ठरते. 

>> सूर्यास्ताची वेळ न्याहारी किंवा काही जणांसाठी जेवणाची वेळ असते. सूर्यास्ताचा प्रकाश, वेळ थोडी हुरहूर लावणारी असल्याने ती वेळ टाळून किंवा त्याच्या पूर्वी आहार घेणे सोयीचे ठरते. पश्चिम दिशेला तुमच्या घराची खिडकी येत असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मंद संगीत आणि चहाचा आस्वाद घेऊ शकता, फक्त पदार्थाचे सेवन टाळा. सूर्यास्तामुळे आजार पसरवणाऱ्या कीटकांचे प्राबल्य वाढते. म्हणून पूर्वी ७ च्या आत रात्रीचे जेवण उरकले जात असे. 

>> झोपेच्या वेळी सूर्य अनुपस्थित असतो, परंतु सकाळ सूर्याच्या किरणांनी होणार असल्यामुळे बेडरूमची दिशा पश्चिमेला असेल तर सूर्यकिरणे थेट बेडरूममध्ये शिरकाव करतील आणि आपली मॉर्निंग आपोआप गुड होईल. 

>> घरातील मौल्यवान वस्तू, पैसे ठेवण्याची जागा अर्थात तिजोरी गुप्त राहावी या हेतूने कपाटाची दिशा उत्तरेला ठेवा. 

वास्तूमध्ये केलेले हे किरकोळ बदल तुम्हाला नवीन ऊर्जा देतील हे नक्की!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र