शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांचीही जन्मतिथी रामनवमीलाच; वाचा त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:29 IST

वयाच्या १२ व्या वर्षी टाकळी नावाच्या ठिकाणी त्यांनी १२ वर्षे प्रभू श्री रामाची कठोर साधना केली आणि रामाचे दास झाले. तेव्हापासून त्यांना रामदास स्वामी अशी ओळख मिळाली.

समर्थ रामदास यांचा जन्म सन १६०८ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात चैत्र शुक्ल नवमीला झाला. सूर्याजी पंत आणि राणूबाई यांचा मुलगा म्हणून जन्मलेल्या या महापुरुषाचे बालपणीचे नाव नारायण होते. असे म्हणतात की बाल हनुमानाप्रमाणेच ते बालपणी खूप खोडकर होते, पण एके दिवशी त्यांच्या आईच्या सूचक बोलण्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ते हनुमंताप्रमाणेच रामाचे महान भक्त बनले. वयाच्या १२ व्या वर्षी टाकळी नावाच्या ठिकाणी त्यांनी १२ वर्षे प्रभू श्री रामाची कठोर साधना केली आणि रामाचे दास झाले. तेव्हापासून त्यांना रामदास स्वामी अशी ओळख मिळाली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीरामांनी त्यांना दर्शन दिले. 

तपश्चर्या पूर्ण करून त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा संपूर्ण देश प्रवास बारा वर्षे केला. भारतभेटीत त्यांनी हिंदूंची दुर्दशा आणि त्यांच्यावर मुघलांचे अत्याचार जवळून पाहिले. हिंदूंना संघटित केल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही हे त्यांना समजले. त्यामुळे मुघल राज्यकर्त्यांच्या अत्याचारातून मुक्ती मिळवून त्यांनी देशात स्वराज्याची स्थापना हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. तेव्हापासून ते स्वामी रामदासच नाही तर समर्थ रामदास बनले. 

देशातील तरुणांमध्ये स्वराज्याची जाणीव रुजवण्यासाठी त्यांनी देशभरात असंख्य मठ आणि आखाडे उभारले. त्यांनी तरुणांच्या हृदयात शूर, वीर आणि रामभक्त हनुमानाची मूर्ती बसवली आणि तरुणांना व्यायामाची प्रेरणा दिली, जेणेकरून ते निरोगी, तंदुरुस्त आणि परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना तोंड देऊ शकतील. 'जय-जय श्री रघुवीर समर्थ' असा त्यांचा नारा होता. समर्थ गुरूंचा त्याग-तपश्चर्या जीवन-प्रवासातील अनुभवांचे सार त्यांच्या 'दासबोध' या मुख्य ग्रंथात संकलित केले आहे. 

सात दशकांच्या उद्दिष्टपूर्ण प्रवासानंतर त्यांनी आयुष्याच्या अखेरीस साताऱ्याजवळील सज्जनगड किल्ल्याला आपले निवासस्थान बनवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणाच्या वार्तेनंतर त्यांना अन्न पाणी गोड लागेनासे झाले. तमिळनाडूतील तंजावर येथे राहणाऱ्या अरणीकर नावाच्या कारागिराने राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती बनवून त्यांच्याकडे पाठवली. समर्थ रामदासांनी त्या रामपंचायतनाच्या समोर पाच दिवस निर्जल उपवास केल्यावर इ.स. १६८२ मध्ये पद्मासनात बसून रामनामाचा जप करत देह ठेवला. सज्जनगडावर आजही समर्थांच्या समाधीचे दर्शन घेता येते. त्यांनी सुरु करून दिलेले उपक्रम आणि रामदासी परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू आहे. त्यांनी लोकांना ताठ कण्याने, ताठ मानेने जगायला शिकवले आणि लोकांच्या मनात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वदेशाभिमान जागृत केला. अशा समर्थांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यानुसार कृती करणे हीच त्यांना शब्द सुमनांजली!