शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Ramayana: मॉरिशसला ओळख मिळाली ती रामायणातील मारीच राक्षसावरून; वाचा अन्वयार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:05 IST

Ramayana: रामायणातील मारीचाचं मॉरिशस 'कनेक्शन'?; थेट गूगल अर्थच्या आधारे मांडलं लॉजिक जाणून घेऊ. 

रामायण महाभारत हे दोन असे महान ग्रंथ आहेत, की हजारो वर्षांनंतरही त्यावर अभ्यासकांचा सातत्याने अभ्यास सुरु आहे. त्यातून दर दिवशी नवनवीन माहिती ऐकायला वाचायला मिळते. अशातच अलीकडे एक व्हिडीओ पाहण्यात आला, त्यात तत्परा अहोरात्रा नामक युवतीने एक युक्तिवाद मांडला आहे. त्यानुसार आजचा नामांकित व तारांकित देश मॉरिशस हा रामायणातील मारीच राक्षसाच्या नावावरून ओळखला जातो असा दावा तिने केला आहे. यासाठी तिने भौगोलिक माहितीचा आधार घेतला आहे, तो कसा ते पहा!

वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, सीता माई आणि लक्ष्मण दंडकारण्यातून जात असताना नाशिकमधील पंचवटी येथे मुक्कामी होते. त्यावेळेस सीतेला एक सुवर्णमृग दिसले. ते सोन्याचे हरीण आपल्या जवळ असावे, आपण त्याचा सांभाळ करावा असे तिला वाटले म्हणून तिने रामाला त्याला पकडून आणण्यास सांगितले. सुवर्ण मृग हा प्रकारच मुळात अस्तित्वात नसतो, हे माहीत असूनही सीतेचे मन राखण्यासाठी राम जाऊ लागले असता, लक्ष्मणाने त्यांना सावध करत म्हटले, 'हा नक्कीच कोणी राक्षस असावा. त्याचा पाठलाग करत फार दूर जाऊ नका.' 

हे ऐकून राम म्हणाले, 'हो मी लक्षात ठेवतो तू सीतेची काळजी घे मी आलोच!' असे म्हणून राम त्याला पकडण्यास निघाले. ते हरीण म्हणजे प्रत्यक्षात रावणाचा दूत मारीच राक्षस होता. तो रामाची ख्याती ओळखून होता. रावणाच्या जाचाला कंटाळून त्याने रामाच्या हाती मरण पत्करावे या हेतूने हे सोंग धारण केले. तो रामाला आपल्या पाठोपाठ दूर घेऊन गेला आणि तिथून लक्ष्मण आणि सीतेला आवाज देऊ लागला. ती हाक ऐकलल्यावर रामाची खात्री पटली की हा प्रत्यक्षात कोणी राक्षस आहे. त्याला ठार मारण्यासाठी रामाने धनुष्यावर बाण चढवला आणि क्षणार्धात मारीच घायाळ होऊन रामांच्या चरणाशी आला. त्याने रामाकडे मुक्ती मागितली. त्याने प्राण सोडले.

त्याच वेळेस सीतेच्या सांगण्यावरून लक्ष्मण रामाचा शोध घेत तिथे पोहोचला. मारिचला यमलोकी पाठवण्यासाठी रामाने मारीचचा उचललेला देह दूरवर फेकताना, सीता एकटी आणि संकटात असेल या काळजीने दक्षिण दिशेला यमलोकी जाऊन पडण्याऐवजी अलीकडच्या देशात पडला. तो देह रामाच्या बाणाने पवित्र झाला आणि त्या मृत देहावरून त्या देशाला मारीच देश अर्थात आजचा मॉरिशस देश अशी ओळख मिळाली. 

हे सर्व कथन करताना तत्परा अहोपात्रा यांनी गुगल अर्थची मदत घेतली व भौगोलिक दृष्ट्या नाशिक वरून फेकलेला मारीचचा मृतदेह मॉरिशसच्या दिशेने कसा जाऊन पडला, हे सांगितले आहे.  

यात तथ्य किती आणि कसे याचा अभ्यास जाणकार करतीलच, परंतु अशा चर्चेमुळे धर्मग्रंथांचा अभ्यास होत राहतो आणि नव्या पिढीचे कुतूहल जागृत होते, ही जमेची बाजू!

टॅग्स :ramayanरामायण