शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Ram Navmi 2021: रामचरित्राची मोठी शिकवण... संकटं जीवनाचा भाग; त्यांना न डगमगता तोंड दिल्यास मार्ग सापडतोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 13:00 IST

Ram Navmi 2021: सामान्यांनी  मनात आणले तर असामान्य कार्ये करू शकतात हे जगाला दाखवून दिले, हे श्रीरामांनी आपल्या नेतृत्त्वातून दाखवून दिले.

>>डॉ. भूषण फडके

हनुमान विशाल रुप धारण करुन उड्डाण करतात. वाटेत अडचणी येतात. त्यावर कधी लिनतेने तर कधी सामर्थ्याने मात करत समुद्र उल्लंघून हनुमान लंकेत पोहचतात. हनुमानास सीता अशोकवनात दिसते. हनुमान  रामस्तुती करुन श्रीरामांनी दिलेली मुद्रिका देवून आपण श्रीरामाचे दुत आहोत हे सीतेस सांगतात. बलशाली हनुमान आपल्या पाठीवरुन सीतेस श्रीरामांकडे घेऊन जाण्याचा प्रस्ताव ठेवतो पण परपुरुषाच्या पाठीवरुन जाणे अयोग्य असे सीता म्हणते आणि प्रभू रामांचे  कार्य राक्षसांचा संहार करुन धर्मसंस्थापना करणे तेही पूर्ण होणे आवश्यक असते म्हणून सीता या प्रस्तावास नकार देते. 

Ram Navami 2021 : स्व-सामर्थ्याची जाणीव करून देणारा जांबुवंतासारखा गुरु आयुष्यात हवाच; सांगते रामकथा!

शत्रुंचे बलाबल काय? हे पाहण्यासाठी हनुमान अशोकवनाचा विध्वंस करतो. रावणपुत्र अक्षयकुमाराचा वध करतो. इंद्रजिताच्या ब्रम्हास्त्रात स्वत:स हनुमान बंदी करुन घेतो. रावण हनुमानाचा वध करण्याची आज्ञा देतो पण दुतास मारणे योग्य नाही या  बिभीषणाच्या सुचनेस मान्य करुन रावण  हनुमानाची शेपटी पेटविण्यात सांगतो. पण हनुमान त्याच शेपटीने लंकादहन करतो आणि समुद्र ओलांडून परत येतो. किष्कींधेस परतल्यावर हनुमान सीतेचा चुडामणी रामांना देतो. सीता आपली चातकासारखी वाट पाहते आहे हे कळताच श्रीरामांचे डोळे भरुन येतात. दूत म्हणून लंकेत गेलेल्या हनुमानाने लंकादहन करून राक्षस सेनेचे मनोधैर्य खच्ची करण्याचे कार्य चोख बजावले आणि सीताशोधाचे  असामान्य कार्य पार पाडले म्हणून  हनुमान श्रीरामांचा “दासोत्तम” होतो.

विशाल वानरसेनेसह श्रीराम-लक्ष्मण समुद्रकिनारी पोहचतात. लंकेमध्ये रावणाचे मंत्री आपण इंद्रजिताच्या मदतीने सहज जिंकू अशा वल्गना करतात तेव्हा एका वानरवीराने लंकेचा केलेल्या नाशाची रावणाचा भाऊ बिभीषण आठवण करुन देतो. इंद्रजित बिभीषणाचा धिक्कार करतो तेव्हा बिभीषण श्रीरामांकडे शरणागत होऊन येतो. श्रीरामांसमोर वानरसेनेसह समुद्र उल्लंघन कसे करायचे हा यक्षप्रश्न उभा राहतो तीन दिवसांच्या   प्रार्थनेनंतर  सागर प्रसन्न होत नाही हे पाहून श्रीराम धनुष्यावर बाण सोडायला प्रत्यंचा ताणतात, तो सागरातील जीव तळमळू लागतात. धरणीकंपायमान होते आणि सागर देवता प्रत्यक्ष प्रगट होते. श्रीरामांच्या वानरसेनेत नल आणि निल हे विश्वकर्मांचे पुत्र असतात. ते सेतू बंधन करतील असे सागर श्रीरामांना सांगतो. असंख्य वानरवीर सेतुबंधनाच्या कामात मदत करतात. 100 योजने लांबीचा सेतु तयार होतो.

सर्व वानरवीर रणगर्जना करुन आसमंत दणाणून सोडतात. सर्व सेना सुवेल पर्वताच्या पायथ्याशी येते. शत्रुचे बलाबल पाहण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, बिभीषण, हनुमान आणि इतर वानरवीर सुवेल  पर्वतावर चढतात. लंकेत रावणही श्रीरामाच्या सैन्याचे बल पाहण्यासाठी प्रासादावर असतो. रावणाला पाहताच सुग्रीव उड्डाण घेऊन रावणाशी द्वंद्व सुरु करतो. रावण सुग्रीवाचे तुंबळ युध्द होते. रावणाला पराजय दिसु लागताच तो मायावी शक्ती दाखवतो तेन्ह्वा  सुग्रीव श्रीरामांकडे परत येतो. सुग्रीवाच्या या आततायी कृतीबद्दल श्रीराम सुग्रीवाची कानउघडणी करतात. सुग्रीव हा श्रीरामांच्या सेनेचा सेनापती. सेनापतीची कृती विचारी हवी. सेनानायकाने कसे वागावे हे श्रीराम सुग्रीवास सांगतात. 

श्रीराम नेते होते.आपल्या नेतृत्वात त्यांनी सामान्य वानरांकडून सेतुबंधन,राक्षसांचा पराभव हे असामान्य कार्ये करून घेतली आणि सामान्यांनी  मनात आणले तर असामान्य कार्ये करू शकतात हे जगाला दाखवून दिले. युध्दापूर्वी शांततेचा प्रयत्न म्हणून श्रीराम वालीपूत्र अंगदाला रावणाकडे शिष्टाई करण्यासाठी पाठवतात.  

|| बोला सियावर रामचंद्र की जय ||

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

Ram Navmi 2021: उपद्रवी व्यक्तींना आधी समजावून बघा, अन्यथा शासन करा; रामायणाचा धडा 

टॅग्स :ramayanरामायणRam Navamiराम नवमी