शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Ram Navami 2024: रामायणावर विपुल साहित्य उपलब्ध असल्याने नेमके कोणते रामायण वाचायला हवे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:33 IST

Ram Navami 2024: रामायणाला अवीट गोडी आहे, अनेक भाषांमध्ये ते उपलब्ध आहे, पण कळायला सोपं आणि शास्त्राधार असलेले रामायण कोणते ते पाहू. 

>> सर्वेश फडणवीस 

जेव्हा आपण म्हणतो की "या गोष्टीत काही 'राम' नाही" तेव्हा 'राम' हा शब्द 'तथ्य' शब्दाचा पर्याय झालेला असतो. 'रामबाण उपाय' हा वाक्प्रयोग मराठीतही आहे, हिन्दीतही आहे आणि बहुधा सर्वच भारतीय भाषात तो आढळतो. 'रामबाण' हे मुळात एक सामासिक नाम ! पण ते विशेषण बनून येतं आणि 'अचूक, अमोघ' हा अर्थ दर्शवितं. प्रात:काळचा शुद्ध, मंगल प्रहर आपल्या भाषेत 'रामप्रहर' होऊन उगवतो. हिन्दीत तर मिठाला 'रामरस' म्हणतात. किती समर्पक ! चिमूटभर मिठावाचून जसं ताटभर भोजन बेचव, तसंच सूक्ष्म रामतत्त्वावाचून दीर्घ जीवनही निरर्थक! इथे 'राम' शब्द रसवत्तेचं अधिष्ठान आहे. - भेटल्यावर 'नमस्ते' म्हणणं ही आधुनिक पद्धत. (आता तर good morning - good evening मुळे तीही लोपत चालली आहे!) पण खेड्यात अजूनही 'रामराम' म्हटलं जातं. दोन हिन्दीभाषी भेटले की 'जै (जय) रामजी की' हे शब्द उत्स्फूर्ततेनं निघतात. नमस्ते नमः ते = तुला नमस्कार) पेक्षा 'जय रामजी की'ची खुमारी काही वेगळीच ! ते नमन असतं अन्तर्यामी वसणाऱ्या 'आत्मा' रामाला ! म्हणजे अवघ्या जीवनातली सार्थकता ('राम' असणे) अचूकपणा (रामबाण), विशुद्धता (रामप्रहर), रसवत्ता (रामरस) आणि सर्वव्यापित्व (रामराम) ह्या सर्व भावना व्यक्तविण्याचं सामर्थ्य 'राम' ह्या एकाच शब्दात आहे! जीवनातला परमोच्च आदर्श म्हणजे राम!

प्रभु रामाचं चरित्र अनेकांनी गायिलेलं आहे. मराठीत भावार्थरामायण आहे, रामविजय आहे, हिन्दीत रामचरितमानस आहे, बंगालीत कृत्तिवास-रामायण, गुजरातीत गिरधरकृत रामायण, तेलुगु भाषेत रंगनाथ रामायण, उडियामध्ये कवि बलराम दाश यांनी रचलेले जगमोहन रामायण तर तमिळमध्ये कंबरामायण ! रामाची कथा प्रत्येक भाषेला 'आपली' वाटली,आणि प्रत्येक कवीनं आपापल्या कल्पनेनुसार त्यात अनेक उपकथानकं जोडून ती कथा अधिकाधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला! पण त्यामुळे एक गोंधळ झाला! स्थल-कालांच्या संदर्भात फरक दिसू लागला. कोणत्या रामकथेला खरं मानावं? उत्तर एकच ! रामाचा समकालीन असणाऱ्या महर्षि वाल्मीकींच्या लेखणीतून अवतरलेली मूळ रामकथाच प्रमाण मानायची !

मूळ वाल्मीकिरामायण, पं. सातवळेकरांचं भाष्य, वं. मावशींची (केळकर) प्रवचनं, श्रद्धेय गुरुचरण स्वामी गोविंददेवगिरि यांची प्रवचनं, या सर्वांतून मी 'राम' शोधत गेले. त्यातून मला जे आणि जितकं उमगलं, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात आहे. तटस्थ दृष्टीनं विचार केला तर राम हा एक क्षत्रिय राजकुमार. श्रीरामानं स्वतः कधीच म्हटलं नाही की मी ईश्वराचा अवतार आहे. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' हे त्याचं प्रांजळ वचन वाल्मीकीनं नोंदवलं आहे.

व्यक्तीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे हा विवेक श्रीरामाला क्षणभरही सोडून गेला नाही. त्यामुळेच तो नराचा नारायण झाला. प्रत्येकाच्या मुखी येऊ लागलं की,माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ॥प्रभु राम हा आदर्शाचा, मांगल्याचा, अचूकतेचा नि रसवत्तेचा पर्याय बनला, आणि सुजनांच्या मनात दाटून आलं की 'प्रभाते मनी राम चिन्तीत जावा'.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण