शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

Ram Navami 2024: रामायणावर विपुल साहित्य उपलब्ध असल्याने नेमके कोणते रामायण वाचायला हवे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:33 IST

Ram Navami 2024: रामायणाला अवीट गोडी आहे, अनेक भाषांमध्ये ते उपलब्ध आहे, पण कळायला सोपं आणि शास्त्राधार असलेले रामायण कोणते ते पाहू. 

>> सर्वेश फडणवीस 

जेव्हा आपण म्हणतो की "या गोष्टीत काही 'राम' नाही" तेव्हा 'राम' हा शब्द 'तथ्य' शब्दाचा पर्याय झालेला असतो. 'रामबाण उपाय' हा वाक्प्रयोग मराठीतही आहे, हिन्दीतही आहे आणि बहुधा सर्वच भारतीय भाषात तो आढळतो. 'रामबाण' हे मुळात एक सामासिक नाम ! पण ते विशेषण बनून येतं आणि 'अचूक, अमोघ' हा अर्थ दर्शवितं. प्रात:काळचा शुद्ध, मंगल प्रहर आपल्या भाषेत 'रामप्रहर' होऊन उगवतो. हिन्दीत तर मिठाला 'रामरस' म्हणतात. किती समर्पक ! चिमूटभर मिठावाचून जसं ताटभर भोजन बेचव, तसंच सूक्ष्म रामतत्त्वावाचून दीर्घ जीवनही निरर्थक! इथे 'राम' शब्द रसवत्तेचं अधिष्ठान आहे. - भेटल्यावर 'नमस्ते' म्हणणं ही आधुनिक पद्धत. (आता तर good morning - good evening मुळे तीही लोपत चालली आहे!) पण खेड्यात अजूनही 'रामराम' म्हटलं जातं. दोन हिन्दीभाषी भेटले की 'जै (जय) रामजी की' हे शब्द उत्स्फूर्ततेनं निघतात. नमस्ते नमः ते = तुला नमस्कार) पेक्षा 'जय रामजी की'ची खुमारी काही वेगळीच ! ते नमन असतं अन्तर्यामी वसणाऱ्या 'आत्मा' रामाला ! म्हणजे अवघ्या जीवनातली सार्थकता ('राम' असणे) अचूकपणा (रामबाण), विशुद्धता (रामप्रहर), रसवत्ता (रामरस) आणि सर्वव्यापित्व (रामराम) ह्या सर्व भावना व्यक्तविण्याचं सामर्थ्य 'राम' ह्या एकाच शब्दात आहे! जीवनातला परमोच्च आदर्श म्हणजे राम!

प्रभु रामाचं चरित्र अनेकांनी गायिलेलं आहे. मराठीत भावार्थरामायण आहे, रामविजय आहे, हिन्दीत रामचरितमानस आहे, बंगालीत कृत्तिवास-रामायण, गुजरातीत गिरधरकृत रामायण, तेलुगु भाषेत रंगनाथ रामायण, उडियामध्ये कवि बलराम दाश यांनी रचलेले जगमोहन रामायण तर तमिळमध्ये कंबरामायण ! रामाची कथा प्रत्येक भाषेला 'आपली' वाटली,आणि प्रत्येक कवीनं आपापल्या कल्पनेनुसार त्यात अनेक उपकथानकं जोडून ती कथा अधिकाधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला! पण त्यामुळे एक गोंधळ झाला! स्थल-कालांच्या संदर्भात फरक दिसू लागला. कोणत्या रामकथेला खरं मानावं? उत्तर एकच ! रामाचा समकालीन असणाऱ्या महर्षि वाल्मीकींच्या लेखणीतून अवतरलेली मूळ रामकथाच प्रमाण मानायची !

मूळ वाल्मीकिरामायण, पं. सातवळेकरांचं भाष्य, वं. मावशींची (केळकर) प्रवचनं, श्रद्धेय गुरुचरण स्वामी गोविंददेवगिरि यांची प्रवचनं, या सर्वांतून मी 'राम' शोधत गेले. त्यातून मला जे आणि जितकं उमगलं, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात आहे. तटस्थ दृष्टीनं विचार केला तर राम हा एक क्षत्रिय राजकुमार. श्रीरामानं स्वतः कधीच म्हटलं नाही की मी ईश्वराचा अवतार आहे. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' हे त्याचं प्रांजळ वचन वाल्मीकीनं नोंदवलं आहे.

व्यक्तीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे हा विवेक श्रीरामाला क्षणभरही सोडून गेला नाही. त्यामुळेच तो नराचा नारायण झाला. प्रत्येकाच्या मुखी येऊ लागलं की,माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ॥प्रभु राम हा आदर्शाचा, मांगल्याचा, अचूकतेचा नि रसवत्तेचा पर्याय बनला, आणि सुजनांच्या मनात दाटून आलं की 'प्रभाते मनी राम चिन्तीत जावा'.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण