शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navami 2023: सर्वसामान्य लोक संघटित होऊन लढले तर रावणासारख्या दुष्प्रवृत्तीचा नाश करू शकतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:00 IST

Ram Navami 2023: नेतृत्व कुशल असेल तर असाध्यही होतं साध्य; सामान्यांकडूनही घडू शकतं असामान्य कार्य!

>>डॉ. भूषण फडके.

रावणाच्या अहंकारामुळे अंगदशिष्टाई असफल होते. असंख्य वानरवीर लंकेवर आक्रमण करून युद्धासाठी गर्जना देऊन आसमंत दणाणून सोडतात.युद्धाला सुरुवात होते.हनुमान, सुग्रीव, वाली पुत्र अंगद, नल नील, जांबुवंत हे श्रीरामाच्या सेनेतील वीर अतुलनीय पराक्रम गाजवतात. युद्धात रावणाचे सर्वबंधूसह महापराक्रमी कुंभकर्ण याचाही वध होतो. रावण पुत्र इंद्रजीताला लक्ष्मण यमसदनी धाडतो. आता रावण युद्धसाठी सज्ज होतो. रावण हा तपस्वी विश्राव्याचा याचा पुत्र, त्याने उग्र तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून, स्वतःला गरुड, यक्ष, दैत्य दानव, देव यांच्याकडून मृत्यू येणार नाही असा वर मागून घेतला होता. वराने उन्मत्त होऊन त्याने पृथ्वीवर हाहाकार माजविला. कुबेराचा पराजय करून त्याने सोन्याची लंका जिंकून घेतली. रावणाने अनेक स्त्रियांचे बलात्काराने अपहरण केले होते. अनेक राज्यांचा पराभव केला एवढेच नव्हे तर अनेक देवांचा पराजय करून त्यांना बंदी गेले होते.रावणाच्या नेतृत्वात राक्षस ऋषी-मुनीना त्रास देत. देवांचा राजा इंद्र यांचाही रावणाने पराभव केला होता. अनेक युद्धात जय मिळाल्यामुळे तो अहंकारी आणि गर्विष्ठ झाला होता. रावणाची पत्नी मंदोदरी सीतेला सन्मानाने श्रीराम कडे परत पाठवण्याचा वारंवार सल्ला देते पण अहंकारी रावण तिचा सल्ला नाकारतो. राम रावण युद्ध हे चांगल्या प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती या मधील युद्ध आहे. 

राम-रावणाचे घनघोर युद्ध होते प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करतात दृष्ट प्रवृत्ती वर सत प्रवृत्तींचा विजय होतो. अहंकारी रावणाचा शेवट होतो म्हणून आकाशातून देव पुष्प वृष्टी  करतात. “बोला सियावर रामचंद्र की जय”.

श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण बिभीषण यास  लंकेच्या राज्यपदाचा अभिषेक करतो. प्रभू रामचंद्र आणि सीतेची भेट झाल्यावर अग्निदिव्य करून ती महान पतिव्रता आपल्या पावित्र्याची प्रत्येक्ष अग्नीदेवाकडून खात्री पटवून देते. श्रीराम, लक्ष्मण, सीता पुष्पक विमानातून अयोध्येस परत येतात. अयोध्येची जनता अत्यानंदित  होते, डोळ्यात  प्राण आणून ते श्रीरामांना पाहतात तेव्हा  लक्षावधी डोळे श्रीरामांना ओवाळत आहेत  असे वाटते. श्रीरामांना राज्याभिषेक करण्यात येतो, रामराज्याची सुरुवात होते.

श्रीराम  विष्णूचा अवतार असले तरी मनुष्य रूपात असल्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटे आली पण दृढनिश्चयाने आयुष्यात आलेल्या संकटांवर विजय मिळवून, संकटे जीवनाचा भाग असतात, न डगमगता त्यांना तोंड  दिल्यास मार्ग सापडतोच याची शिकवण दिली. म्हणूनच श्रीराम अनुकरणीय आहेत. “आदर्शाचा आदर्श” म्हणजे “श्रीराम”. आपल्या भूभागावर रामराज्य यावं असं प्रत्येकाला वाटतं पण आपणही अयोध्यावासीयांसारखे होण्यास तयार नसतो. हक्काला कर्तव्याची जोड दिल्यास, समर्पण वृत्ती ठेवल्यास आपणही रामराज्याचा अनुभव घेऊ शकतो. आपणही श्रीरामासारखा “विवेक” अंगी रुजविण्याचा प्रयत्न करू. श्रीरामांसमोर नतमस्तक होऊन “जीवनोपयोगी रामायणाचे” हे दहावे पुष्प श्रीराम चरणी अर्पण करतो.

शब्दांच्या मर्यादेत महर्षी वाल्मिक यांचे महाकाव्य मांडण्याचे धाडस केले,काही चूक झाल्यास ती सर्वस्वी माझीच आहे उदार वाचक समजून घेतील. श्रीरामायण आपल्या सर्वाना “जीवनोपयोगी” ठरेल या खात्रीसह......

|| श्रीरामचंद्रार्पणमस्तू |||| बोला सियावर रामचंद्र की जय ||

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण