शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:31 IST

Raksha Bandhan 2023: भद्रा काळ म्हणजे नेमके काय? रक्षाबंदनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते का? जाणून घ्या...

Raksha Bandhan 2023: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी श्रावणी पौर्णिमा आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात देशभरात साजरा केला जातो. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाला भद्र काळ येत आहे. भद्र काळ हा शुभ गोष्टी करण्यासाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे भद्रकालात राखी बांधावी का? भद्र काळ असताना रक्षाबंधन करणे अशुभ असते का? नेमके रक्षाबंधन कधी करावे? शास्त्रात नेमके काय सांगितले आहे? जाणून घेऊया...

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते. 

भद्र काळ म्हणजे नेमके काय?

पंचागाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच अंगे आहेत. सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादीचा बोध पंचागातून होतो. याच पाच अंगांशी 'करण' आणि 'भद्रा काळ' याचा संबंध आहे. ज्या दिवशी 'विष्टी' करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. ३० ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र 'विष्टी' करण आणि 'कुंभ' राशीत असणार आहे. याच अनुषंगाने या दिवशी भद्राकाल वर्तविला जात आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. 

भद्रकालात राखी बांधावी का?

देशभरात अनेक ठिकाणी विधीपूर्वक रक्षाबंधन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी बांधली जाते. शास्त्रानुसार, जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल, तर भद्रा करण असताना केला जात नाही. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत भद्रा करण आहे. परंत, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी?

यंदा रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा ? बुधवार, ३० ऑगस्ट की गुरुवार, ३१ ऑगस्टला? रक्षाबंधन बुधवार ३० ऑगस्ट रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या  दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजी आहे . म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करावा, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनReligious programmeधार्मिक कार्यक्रमShravan Specialश्रावण स्पेशल