शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:31 IST

Raksha Bandhan 2023: भद्रा काळ म्हणजे नेमके काय? रक्षाबंदनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते का? जाणून घ्या...

Raksha Bandhan 2023: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी श्रावणी पौर्णिमा आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात देशभरात साजरा केला जातो. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाला भद्र काळ येत आहे. भद्र काळ हा शुभ गोष्टी करण्यासाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे भद्रकालात राखी बांधावी का? भद्र काळ असताना रक्षाबंधन करणे अशुभ असते का? नेमके रक्षाबंधन कधी करावे? शास्त्रात नेमके काय सांगितले आहे? जाणून घेऊया...

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते. 

भद्र काळ म्हणजे नेमके काय?

पंचागाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच अंगे आहेत. सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादीचा बोध पंचागातून होतो. याच पाच अंगांशी 'करण' आणि 'भद्रा काळ' याचा संबंध आहे. ज्या दिवशी 'विष्टी' करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. ३० ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र 'विष्टी' करण आणि 'कुंभ' राशीत असणार आहे. याच अनुषंगाने या दिवशी भद्राकाल वर्तविला जात आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. 

भद्रकालात राखी बांधावी का?

देशभरात अनेक ठिकाणी विधीपूर्वक रक्षाबंधन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी बांधली जाते. शास्त्रानुसार, जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल, तर भद्रा करण असताना केला जात नाही. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत भद्रा करण आहे. परंत, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी?

यंदा रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा ? बुधवार, ३० ऑगस्ट की गुरुवार, ३१ ऑगस्टला? रक्षाबंधन बुधवार ३० ऑगस्ट रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या  दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजी आहे . म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करावा, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनReligious programmeधार्मिक कार्यक्रमShravan Specialश्रावण स्पेशल