शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:31 IST

Raksha Bandhan 2023: भद्रा काळ म्हणजे नेमके काय? रक्षाबंदनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते का? जाणून घ्या...

Raksha Bandhan 2023: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी श्रावणी पौर्णिमा आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात देशभरात साजरा केला जातो. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाला भद्र काळ येत आहे. भद्र काळ हा शुभ गोष्टी करण्यासाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे भद्रकालात राखी बांधावी का? भद्र काळ असताना रक्षाबंधन करणे अशुभ असते का? नेमके रक्षाबंधन कधी करावे? शास्त्रात नेमके काय सांगितले आहे? जाणून घेऊया...

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते. 

भद्र काळ म्हणजे नेमके काय?

पंचागाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच अंगे आहेत. सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादीचा बोध पंचागातून होतो. याच पाच अंगांशी 'करण' आणि 'भद्रा काळ' याचा संबंध आहे. ज्या दिवशी 'विष्टी' करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. ३० ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र 'विष्टी' करण आणि 'कुंभ' राशीत असणार आहे. याच अनुषंगाने या दिवशी भद्राकाल वर्तविला जात आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. 

भद्रकालात राखी बांधावी का?

देशभरात अनेक ठिकाणी विधीपूर्वक रक्षाबंधन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने राखी बांधली जाते. शास्त्रानुसार, जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल, तर भद्रा करण असताना केला जात नाही. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत भद्रा करण आहे. परंत, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी?

यंदा रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा ? बुधवार, ३० ऑगस्ट की गुरुवार, ३१ ऑगस्टला? रक्षाबंधन बुधवार ३० ऑगस्ट रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या  दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजी आहे . म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करावा, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनReligious programmeधार्मिक कार्यक्रमShravan Specialश्रावण स्पेशल