शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पौराणिक काळापासून!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 15, 2020 21:59 IST

आई हि आपली जन्मदात्री, आपल्या कर्तृत्वाने तिच्या नावाचा केलेला गौरव, हीच खरी मातृवंदना.

ज्योत्स्ना गाडगीळ 

गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रगती पुस्तकावर, प्रशस्तीपत्रकावर, जन्मदाखल्यावर वडिलांबरोबरच आईचेही नाव लिहिण्याचा कायदा सुरू झाला. परंतु, पौराणिक कथा शोधल्या, तर असे अनेक दाखले मिळतील, जिथे आईच्या नावावरून पुत्राला ओळख मिळत असे. अशीच एक कथा, सत्यकाम जाबालची...

एकदा गौतम ऋषी आपल्या आश्रमात शिष्यांना शिकवत होते. त्यावेळी फाटकी वस्त्रे नेसलेला एक मुलगा मोठ्या धैर्याने ऋषींना सामोरा गेला आणि म्हणाला, 'गुरुदेव, आपल्यासारख्या ज्ञानी व उदात्त गुरुदेवांचे शिष्य व्हावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे.' 

त्याची उत्सुकता, ज्ञानार्जनाची ओढ आणि विनम्र भाव पाहून ऋषींनी त्याला सौम्यपणे विचारले, 'पुत्र, तुझे पूर्ण नाव काय? तुझे कुळ कोणते? तुझा पूर्वइतिहास काय? मला तुझा सविस्तर परिचय दे.'

हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट

यावर तो नम्रपणे म्हणाला, `गुरुदेव, माझ्याकडे तुमच्या एकही प्रश्नाचे उत्तर नाही. उलट स्वत:ची ओळख कमवावी, म्हणून तर मी आपल्याकडे आलो आहे.' 

स्वत:बद्दल ज्याला काही माहित नाही, असा मुलगा विश्वाचे ज्ञान करून घ्यायला गुरुदेवांकडे आला आहे, हे पाहून इतर शिष्य  तिरस्काराने त्याच्याकडे बघून हसू लागले. गौतम ऋषींनी त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला आणि त्यांना गप केले. गुरुदेव म्हणाले, 'तू अनाथ आहेस का?' 

'नाही गुरुदेव, मला आई आहे. तीच मोठ्या कष्टाने माझा सांभाळ करते.' - मुलगा उत्तरला. 

गुरुदेव म्हणाले, `ठीक आहे. मग तुला मी जे प्रश्न विचारले, ते जाऊन तू तुझ्या आईला विचार. स्वत:ची ओळख करून घे, मग मला येऊन तुझी ओळख करून दे. मग आपण ज्ञानार्जनाला सुरुवात करू.'

छोटासा मुलगा वायूवेगाने धावत घरी आला. त्याने आपल्या आईला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. आईने त्याला शांत केले. मुलगा किशोरवयीन होता. म्हटले तर समजूतदार आणि म्हटले तर अल्लड, असे त्याचे वय. परंतु आता त्याच्या प्रश्नांना उत्तर देणे भाग होते. म्हणून आईने त्याच्या बालबुद्धीला पटेल असे, परंतु सत्यपरिस्थितीवर आधारित उत्तर देऊन त्याचे कुतुहल शमवले. आई म्हणाली,

'बाळा, इतर मुलांना असतात, तसे तुला वडील नाहीत, कारण मी एक दासी आहे. तुझी जबाबदारी पूर्णपणे माझ्या एकटीवर येऊन पडली. त्यामुळे तुला वडील नाहीत, फक्त आई आहे, ही जाबाली. मात्र, यात वैशम्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, कोणी विचारले, तर ठणकावून सांग, मी जाबालीपुत्र जाबाल आहे.'

आपली ओळख कळल्यावर, पटल्यावर जाबालला खूप आनंद झाला. त्याने आईला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, 'आई, सगळे जण वडिलांचे नाव लावतात, पण खरी ओळख देणारी तर आईच असते ना आणि माझे भाग्य असे की मला तुझे नाव लावण्याची संधी मिळाली. तुझे नाव मी खूप मोठे करेन.' 

जाबालने पण केला आणि तो आश्रमात परत आला. गुरुंसमोर त्याने सर्व हकिकत कथन केली. बाकीच्या मुलांना टिंगल टवाळी करायला नवा विषय मिळाला. गौतम ऋषींनी पुन्हा एकदा मुलांना गप्प केले आणि जाबालकडे बघत म्हणाले, 

'जाबाल, तू धन्य आहेस, तुझी माताही धन्य आहे. आपल्या आयुष्याचे सत्य स्वीकारण्याची तू तयारी दाखवलीस. यामुळे तुझा नक्कीच उत्कर्ष होईल. तू मोठा ऋषी होशील. आपल्या कर्तृत्त्वाने तू आईचेही नाव मोठे करशील. तुझे सत्यावरील प्रेम पाहून तुला मी 'सत्यकाम जाबाल' असे नाव प्रदान करतो.'

गुरुमुखातून निघालेले आशीर्वाद आणि आईने दाखवलेला विश्वास जाबालने खरा करून दाखवला आणि इतिहासात त्याने जबालीपुत्र जाबाल याच नावाने, थोर ऋषी होऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा: प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज