शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

Prabodhini Ekadashi 2022: देवाला देवपण सहज मिळत नाही, त्यासाठी त्याला काय काय सहन करावे लागते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:42 IST

Prabodhini Ekadashi 2022: 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देव, त्याच्याही यातना समजून घेऊया. 

डेरेदार वृक्षावर आवळा का? आणि नाजूक वेलीवर भोपळा का? असे प्रश्न विचारून देवाच्या योजनेवर शंका घेणे सोडून द्या! या उदाहरणाशी संबंधित गोष्ट तुम्हाला माहीत असेलच, पण आणखी एक गोष्ट जी थेट भगवंताने आपल्या भक्ताला सांगितली, ती थेट तुमच्यापर्यंत! आता ही गोष्ट समजा नाहीतर देवाचा निरोप समजा, पण कथा शेवट्पर्यंत नक्की वाचा!

एकदा विठोबाला त्याचा भक्त म्हणाला, देवा युगे अठ्ठावीस तू इथे उभा आहेस. दमला असशील. तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या जागी उभा राहतो, तू थोड्या वेळ विश्रांती घे नाहीतर कुठे फिरून ये. एक दिवस तुझे कामकाज मी सांभाळतो! 

देवाला हायसे वाटले. आजवर असा प्रस्ताव कोणीच मांडला नव्हता. विठोबा खुश झाला. त्याला आपली जागा दिली. पोशाख दिला आणि ताकीद दिली. दिवसभर जे घडेल ते निमूटपणे बघायचं, ढवळाढवळ करायची नाही. आपण मूर्ती आहोत हे भान विसरायचे नाही. भक्ताने मान डोलवली. तो विठोबाच्या विटेवर उभा राहिला. दिवसभर लोक दर्शनाला येत होते. आपली गाऱ्हाणी सांगत होते. समोर प्रसाद येत होता पण काहीच खाता येणार नव्हते. 

दिवस मावळतीला झुकला. एक शेठजी आले. त्यांनी आपली बरकत होऊ दे असे मागणे मागितले आणि नमस्कार करून निघून गेले. जाता जाता त्यांचे पाकीट खिशातून मंदिरात पडले. भक्ताला ते दिसले पण थांबवता येईना. थोड्या वेळाने एक गरीब माणूस आला. देवाला म्हणाला, माझी मुलं बायको उपाशी आहेत, त्यांच्या पोटापाण्याची सोय होऊ शकेल असं काहीतरी कर देवा... असे म्हणत तो नमस्कार करू लागला, तर त्याला शेटजींचे पाकीट मिळाले. त्यात पैसे होते. देवानेच आपली सोय केली अशा विचारात त्याने इथे तिथे बघितले आणि पाकीट सदऱ्यात लपवून तो नमस्कार करत निघून गेला. काही वेळाने एक नावाडी आला, म्हणाला 'देवा मोठ्या प्रवासाला निघतोय. कृपा ठेवा. प्रवास सुखरूप होऊ द्या.'  

नावाडी देवाची करुणा भाकत असताना शेठजी पाकीट शोधत मंदिरात आले आणि त्या नावाड्याने पाकीट चोरले अशा संशयावरून त्याला मारझोड करत पाकिटाची चौकशी करू लागले. भक्ताला नावाड्याचे हाल पाहवेना. त्याने मूर्तीच्या मागच्या बाजूने पळ काढला आणि शेठजींना थांबवून गरीब माणसाचा पत्ता दिला. शेठजींनी नाविकाला सोडले आणि ते गरीब माणसाचा शोध घेत त्याच्या घरी गेले. 

तेवढ्यात विठोबा आले. भक्त म्हणाला देवा, मी तुमचे काम केले. सगळी हकीकत सांगितली. विठोबाने कपाळाला हात लावला आणि म्हणाले, 'तू माझं सगळं काम बिघडवून टाकलंस! मी तुला फक्त निमूटपणे उभा राहा म्हणालो होतो. पण तू भलाई करायला गेलास आणि सगळ्यांची गैरसोय केलीस!'

भक्त काकुळतीला आला व म्हणाला, माझे काय चुकले देवा? त्यावर विठोबा म्हणाले, 'शेठजींना कसलीही कमी नाही. त्यांचे पाकीट पडले त्यातून मी गरीब माणसाची सोय लावून दिली होती. शेठजींना ज्या नावाड्यावर संशय आला त्याचा प्रवासात अपघात होणार होता. शेठजींमुळे तो तुरुंगात गेला असता. त्याचा मृत्यू टळला असता आणि गरीब पोटभर जेवला असता. एवढेसे पैसे गेल्याने शेटजींचे काहीच नुकसान होणार नव्हते. पण तू सगळी गडबड केलीस आणि आता त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार!' 

भक्ताने देवाचे पाय धरले आणि म्हणाला, 'देवा तुमच्या कामात ढवळाढवळ करून मी मोठी चूक केली. आम्ही ज्या योजना करतो त्यापेक्षा तुम्ही केलेल्या योजना सर्वांचा विचार करून केलेल्या असतात हे लक्षात आलं!' 

म्हणून गीतेचे सार देताना श्रीकृष्ण म्हणतात, 

जो हुआ वह अच्छा हुआ है, जो होगा वह अच्छा होगा!