शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:26 IST

Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरु आहे, पितृदोष निवारणासाठी उत्तम काळ; पितृदोष किती काळ टिकतो आणि तो कसा नष्ट करता येतो, हे गरुड पुराणातून जाणून घेऊया. 

पितृ दोष(Pitru dosh 2025) हा एक दोष आहे जो पिढ्यानपिढ्या चालू राहतो आणि कुटुंबावर अनेक प्रकारे घातक परिणाम करतो. पितृ दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी गरुड पुराणात पितृ दोषाची लक्षणे आणि उपाय सांगितले आहेत. कोणते ते जाणून घेऊ. 

भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

पितृदोष हा असा दोष आहे जो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो असा दोष आहे जो पिढ्यानपिढ्या चालतो. काही मान्यतेनुसार, पितृदोष सात पिढ्यांपर्यंत राहतो. परंतु असाही एक समज आहे की जोपर्यंत पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तो संपूर्ण कुटुंबावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम करत राहतो. तथापि, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतोच असे नाही. त्यात त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम देखील समाविष्ट असतात. म्हणून, जर एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक मुले असतील तर कोणालाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. परंतु असे निश्चित मानले जाते की जर कुटुंबातील एका किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल, ज्याचे मागील जन्माचे संचित कर्म चांगले नसेल, तर तो या दोषाने प्रभावित होतो आणि या जन्मात भोग भोगावे लागतात. 

पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?

पितृदोषाची लक्षणे कोणती? 

>> पितृदोष असलेली व्यक्ती नेहमीच क्रोध, निराशा आणि नैराश्याने वेढलेली असते. तसेच, कुटुंब वाढवण्यात अडचणी येतात.

>> कुटुंबात काही ना काही अपघात घडत राहतात. तसेच, कुटुंबातील मुलांना यश मिळत नाही.

>> कुटुंबात सुख-समृद्धी नसते. कुटुंबात नेहमीच कलहाचे वातावरण असते. 

पितृपक्षामुळे महत्त्वाची खरेदी पुढे ढकलताय? थांबा! 'या' मुहूर्तावर केलेली खरेदी देईल दुप्पट लाभ!

पितृदोष कसा प्रभावित होतो?

गरुड पुराणानुसार, पितृदोष तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा घराचा कुटुंबप्रमुख कोणत्याही प्राण्याला, सापाला किंवा कोणत्याही असहाय्य माणसाला मारतो किंवा छळतो तर त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होतो. याशिवाय, ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्याच्या कुंडलीच्या दुसऱ्या, आठव्या आणि दहाव्या घरात सूर्यासोबत केतू किंवा राहू उपस्थित असेल तर पितृदोषाचा त्रास होतो. गरुड पुराणात असेही नमूद आहे की जोपर्यंत पितरांच्या शांतीसाठी जप तप केला जात नाही तोपर्यंत पितृदोषापासून मुक्तता मिळत नाही. त्यावर उपाय जाणून घेऊ. 

पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!

पितृदोष टाळण्यासाठी गरुड पुराणात दिलेले उपाय: 

>>पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्धविधी करा, पितरांना पाणी आणि तीळ अर्पण करा आणि ब्राह्मण, तसेच गरजूंना अन्न दान करा.

>> कुलदेवतेची पूजा करा आणि कुलदेवतेला नैवेद्य ठेवा. पितरांचा आणि कुलदेवतांचा आशीर्वाद असेल तरच पितृदोष नष्ट होतो. 

>> महामृत्युंजय मंत्राचा जप करून यज्ञ करा आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा करा. दीड लाख शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर नर्मदा घाटावर हा उपक्रम चालतो, तिथे दान करा. 

>> शुभ प्रसंगी कुलदेवतेचे आशीर्वाद घ्या आणि कुलदेवीची ओटी भरा. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण