शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:26 IST

Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरु आहे, पितृदोष निवारणासाठी उत्तम काळ; पितृदोष किती काळ टिकतो आणि तो कसा नष्ट करता येतो, हे गरुड पुराणातून जाणून घेऊया. 

पितृ दोष(Pitru dosh 2025) हा एक दोष आहे जो पिढ्यानपिढ्या चालू राहतो आणि कुटुंबावर अनेक प्रकारे घातक परिणाम करतो. पितृ दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी गरुड पुराणात पितृ दोषाची लक्षणे आणि उपाय सांगितले आहेत. कोणते ते जाणून घेऊ. 

भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

पितृदोष हा असा दोष आहे जो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो असा दोष आहे जो पिढ्यानपिढ्या चालतो. काही मान्यतेनुसार, पितृदोष सात पिढ्यांपर्यंत राहतो. परंतु असाही एक समज आहे की जोपर्यंत पितृदोष शांत होत नाही तोपर्यंत तो संपूर्ण कुटुंबावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम करत राहतो. तथापि, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होतोच असे नाही. त्यात त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम देखील समाविष्ट असतात. म्हणून, जर एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक मुले असतील तर कोणालाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. परंतु असे निश्चित मानले जाते की जर कुटुंबातील एका किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल, ज्याचे मागील जन्माचे संचित कर्म चांगले नसेल, तर तो या दोषाने प्रभावित होतो आणि या जन्मात भोग भोगावे लागतात. 

पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?

पितृदोषाची लक्षणे कोणती? 

>> पितृदोष असलेली व्यक्ती नेहमीच क्रोध, निराशा आणि नैराश्याने वेढलेली असते. तसेच, कुटुंब वाढवण्यात अडचणी येतात.

>> कुटुंबात काही ना काही अपघात घडत राहतात. तसेच, कुटुंबातील मुलांना यश मिळत नाही.

>> कुटुंबात सुख-समृद्धी नसते. कुटुंबात नेहमीच कलहाचे वातावरण असते. 

पितृपक्षामुळे महत्त्वाची खरेदी पुढे ढकलताय? थांबा! 'या' मुहूर्तावर केलेली खरेदी देईल दुप्पट लाभ!

पितृदोष कसा प्रभावित होतो?

गरुड पुराणानुसार, पितृदोष तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा घराचा कुटुंबप्रमुख कोणत्याही प्राण्याला, सापाला किंवा कोणत्याही असहाय्य माणसाला मारतो किंवा छळतो तर त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होतो. याशिवाय, ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्याच्या कुंडलीच्या दुसऱ्या, आठव्या आणि दहाव्या घरात सूर्यासोबत केतू किंवा राहू उपस्थित असेल तर पितृदोषाचा त्रास होतो. गरुड पुराणात असेही नमूद आहे की जोपर्यंत पितरांच्या शांतीसाठी जप तप केला जात नाही तोपर्यंत पितृदोषापासून मुक्तता मिळत नाही. त्यावर उपाय जाणून घेऊ. 

पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!

पितृदोष टाळण्यासाठी गरुड पुराणात दिलेले उपाय: 

>>पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्धविधी करा, पितरांना पाणी आणि तीळ अर्पण करा आणि ब्राह्मण, तसेच गरजूंना अन्न दान करा.

>> कुलदेवतेची पूजा करा आणि कुलदेवतेला नैवेद्य ठेवा. पितरांचा आणि कुलदेवतांचा आशीर्वाद असेल तरच पितृदोष नष्ट होतो. 

>> महामृत्युंजय मंत्राचा जप करून यज्ञ करा आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा करा. दीड लाख शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर नर्मदा घाटावर हा उपक्रम चालतो, तिथे दान करा. 

>> शुभ प्रसंगी कुलदेवतेचे आशीर्वाद घ्या आणि कुलदेवीची ओटी भरा. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण