शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधीबरोबरच गरुड पुराणाचे वाचन करा, पितृदोषातून मुक्ती मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 10:21 IST

Pitru Paksha 2024: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून जसे गरुड पुराणाचे वाचन केले जाते, तसेच पितृपक्षातही करतात; वाचा लाभ!

हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्याच्या घरात मरण येते तेव्हा त्या घरात १३ दिवस गरुड पुराणाचे वाचन केले जाते. शास्त्रांनुसार एखादा देह मृत्यू पावल्यावर आत्मा त्वरित दुसऱ्या देहात प्रवेश करतो आणि नवा जन्म घेतो. काहींना 3 दिवस लागतात, काहींना १०-१३ दिवस लागतात. हा प्रवास त्रासदायक होऊ नये आणि आत्म्याला योग्य गती मिळावी म्हणून मृतात्म्यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते. हे वाचन केवळ मृतात्म्यासाठी नाही, तर आपणा सर्वांना मृत्यपश्चात ताप सहन करावा लागू नये, यासाठी तो वस्तुपाठ आहे. यावरून आपल्या पूर्वजांचा दूरदृष्टीकोन किती वाखाणण्यासारखा आहे ते पहा. गर्भधारणा होण्यापासून अर्थात नवीन जीव निर्माण होण्यापासून त्याच्या अंतिम प्रवासापर्यंतचा, नव्हे तर पुढच्या जन्माचाही विचार आणि कृती पूर्वजांनी करून ठेवली आहे. आपल्याला केवळ त्यानुसार आचरण करायचे आहे. पितृपक्षाचा काळ हा पितरांच्या स्मरणाचा तसेच त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्धविधी करण्याचा! या काळातही गरुड पुराण वाचण्याची प्रथा आहे, त्याचे लाभ जाणून घेऊ. यंदा १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पितृपक्ष (Pitru Paksha 2024) असणार आहे!

गरुड पुराण म्हणजे काय, हे आधी जाणून घेऊ (What is Gaurud Purana)

एकदा गरुडाने भगवान विष्णूंना प्राणांच्या मृत्यूविषयी यमलोक यात्रा, नरक-योनी आणि मोक्ष याविषयी अनेक गूढ आणि रहस्यमय प्रश्न विचारले. भगवान विष्णूंनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. त्या प्रश्न आणि उत्तरांची मालिका म्हणजे गरुड पुराण!

हे एखाद्याच्या मृत्यूपश्चातच का वाचावे? तर... (Why, when and how to read Garud Purana)

१. गरुड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरची परिस्थिती वर्णन केली आहे. म्हणूनच हे मृतात्म्याला गती मिळावी म्हणून वाचले जाते. 

२. मृत्यूनंतरही १३ दिवस मृतात्मा आपल्या प्रियजनांमध्ये राहतो अशी श्रद्धा आहे. त्या आत्म्याला पुढची दिशा कळावी यासाठी गरुड पुराणानुसार स्वर्ग-नरक, वेग, मोक्ष, गती, अधोगति इत्यादी गोष्टींची माहिती वाचली जाते. 

३. पुढील प्रवासात त्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, याची माहिती त्यात दिलेली असते. 

४. मृत्यूनंतर घरात जेव्हा गरुड पुराणाचे पठण होते तेव्हा मृतात्म्याच्या निमित्ताने जिवंत असलेले की काय वाईट आहे आणि कोणत्या प्रकारच्या नातेवाईक, आप्तजन यांनाही पुढच्या प्रवासाची कल्पना येते. पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा, यादृष्टीनेही गरुड पुराणाचे वाचन केले जाते. चांगले कर्म केले तर मोक्ष मिळतो अन्यथा पुढचा खडतर प्रवास भोगावा लागतो. 

५. गरुड पुराण आपल्याला सत्कर्मासाठी प्रेरणा देते. मोक्ष केवळ सत्कर्म आणि सुमतीने प्राप्त होतो.

६. गरुड पुराणात व्यक्तीच्या कर्माच्या आधारे शिक्षेच्या रूपात विविध गोष्टी आढळतात. गरुड पुराणानुसार भगवान विष्णूंनी कोणत्या गोष्टी व्यक्तीला कशा पद्धतीने तारुन नेतील, याचे सविस्तर वर्णन त्यात दिले आहे. 

७. गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सखोलतेने सांगितल्या आहेत. प्रत्येकाला याबद्दल माहित असणे आवश्यक आहे. गरुड पुराणातील आत्म-ज्ञानाचे प्रवचन हा मुख्य भाग आहे. गरुड पुराणातील एकोणीस हजार श्लोकांपैकी सात हजार श्लोकामध्ये ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, स्वत: स्वर्ग, नरक आणि इतर जगाचे वर्णन केले आहे.

८. त्यामध्ये भक्ती, ज्ञान, विस्मृती, पुण्य, निश्चम कर्माच्या वैभवाने, अनेक वैश्विक आणि इतर जगातील फळ यज्ञ, दान, तप तीर्थ अशा शुभ कर्मांमध्ये सर्व सामान्य लोकांना जागृत करण्याचे वर्णन केले गेले आहेत. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यामुळे मृतात्मा आणि त्याचे कुटुंब यातून बोध घेऊ शकतात, अशी त्यामागे भावना असते. 

९. याव्यतिरिक्त, आयुर्वेद, नितारसारा इत्यादी विषयांच्या वर्णनासह मृत जीवाच्या शेवटच्या वेळी केलेल्या क्रियांचा तपशील त्यात वर्णन केलेला असतो.

१०. असे म्हटले जाते की केवळ गरुड पुराणाचे पठण ऐकून मृत आत्म्यास शांती मिळते आणि तारणाचा मार्ग माहित मिळतो. आपल्या सर्व वेदना विसरल्यानंतर, तो प्रभूच्या मार्गावर चालतो आणि मोक्ष प्राप्त करतो, एकतर पितृलोकाकडे जातो किंवा एखाद्या योनीत  पुन्हा जन्माला येतो. त्याला भूत म्हणून भटकण्याची गरज नाही, यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिष