शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधीबरोबरच गरुड पुराणाचे वाचन करा, पितृदोषातून मुक्ती मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 10:21 IST

Pitru Paksha 2024: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून जसे गरुड पुराणाचे वाचन केले जाते, तसेच पितृपक्षातही करतात; वाचा लाभ!

हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्याच्या घरात मरण येते तेव्हा त्या घरात १३ दिवस गरुड पुराणाचे वाचन केले जाते. शास्त्रांनुसार एखादा देह मृत्यू पावल्यावर आत्मा त्वरित दुसऱ्या देहात प्रवेश करतो आणि नवा जन्म घेतो. काहींना 3 दिवस लागतात, काहींना १०-१३ दिवस लागतात. हा प्रवास त्रासदायक होऊ नये आणि आत्म्याला योग्य गती मिळावी म्हणून मृतात्म्यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते. हे वाचन केवळ मृतात्म्यासाठी नाही, तर आपणा सर्वांना मृत्यपश्चात ताप सहन करावा लागू नये, यासाठी तो वस्तुपाठ आहे. यावरून आपल्या पूर्वजांचा दूरदृष्टीकोन किती वाखाणण्यासारखा आहे ते पहा. गर्भधारणा होण्यापासून अर्थात नवीन जीव निर्माण होण्यापासून त्याच्या अंतिम प्रवासापर्यंतचा, नव्हे तर पुढच्या जन्माचाही विचार आणि कृती पूर्वजांनी करून ठेवली आहे. आपल्याला केवळ त्यानुसार आचरण करायचे आहे. पितृपक्षाचा काळ हा पितरांच्या स्मरणाचा तसेच त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्धविधी करण्याचा! या काळातही गरुड पुराण वाचण्याची प्रथा आहे, त्याचे लाभ जाणून घेऊ. यंदा १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पितृपक्ष (Pitru Paksha 2024) असणार आहे!

गरुड पुराण म्हणजे काय, हे आधी जाणून घेऊ (What is Gaurud Purana)

एकदा गरुडाने भगवान विष्णूंना प्राणांच्या मृत्यूविषयी यमलोक यात्रा, नरक-योनी आणि मोक्ष याविषयी अनेक गूढ आणि रहस्यमय प्रश्न विचारले. भगवान विष्णूंनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. त्या प्रश्न आणि उत्तरांची मालिका म्हणजे गरुड पुराण!

हे एखाद्याच्या मृत्यूपश्चातच का वाचावे? तर... (Why, when and how to read Garud Purana)

१. गरुड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरची परिस्थिती वर्णन केली आहे. म्हणूनच हे मृतात्म्याला गती मिळावी म्हणून वाचले जाते. 

२. मृत्यूनंतरही १३ दिवस मृतात्मा आपल्या प्रियजनांमध्ये राहतो अशी श्रद्धा आहे. त्या आत्म्याला पुढची दिशा कळावी यासाठी गरुड पुराणानुसार स्वर्ग-नरक, वेग, मोक्ष, गती, अधोगति इत्यादी गोष्टींची माहिती वाचली जाते. 

३. पुढील प्रवासात त्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, याची माहिती त्यात दिलेली असते. 

४. मृत्यूनंतर घरात जेव्हा गरुड पुराणाचे पठण होते तेव्हा मृतात्म्याच्या निमित्ताने जिवंत असलेले की काय वाईट आहे आणि कोणत्या प्रकारच्या नातेवाईक, आप्तजन यांनाही पुढच्या प्रवासाची कल्पना येते. पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा, यादृष्टीनेही गरुड पुराणाचे वाचन केले जाते. चांगले कर्म केले तर मोक्ष मिळतो अन्यथा पुढचा खडतर प्रवास भोगावा लागतो. 

५. गरुड पुराण आपल्याला सत्कर्मासाठी प्रेरणा देते. मोक्ष केवळ सत्कर्म आणि सुमतीने प्राप्त होतो.

६. गरुड पुराणात व्यक्तीच्या कर्माच्या आधारे शिक्षेच्या रूपात विविध गोष्टी आढळतात. गरुड पुराणानुसार भगवान विष्णूंनी कोणत्या गोष्टी व्यक्तीला कशा पद्धतीने तारुन नेतील, याचे सविस्तर वर्णन त्यात दिले आहे. 

७. गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सखोलतेने सांगितल्या आहेत. प्रत्येकाला याबद्दल माहित असणे आवश्यक आहे. गरुड पुराणातील आत्म-ज्ञानाचे प्रवचन हा मुख्य भाग आहे. गरुड पुराणातील एकोणीस हजार श्लोकांपैकी सात हजार श्लोकामध्ये ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, स्वत: स्वर्ग, नरक आणि इतर जगाचे वर्णन केले आहे.

८. त्यामध्ये भक्ती, ज्ञान, विस्मृती, पुण्य, निश्चम कर्माच्या वैभवाने, अनेक वैश्विक आणि इतर जगातील फळ यज्ञ, दान, तप तीर्थ अशा शुभ कर्मांमध्ये सर्व सामान्य लोकांना जागृत करण्याचे वर्णन केले गेले आहेत. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यामुळे मृतात्मा आणि त्याचे कुटुंब यातून बोध घेऊ शकतात, अशी त्यामागे भावना असते. 

९. याव्यतिरिक्त, आयुर्वेद, नितारसारा इत्यादी विषयांच्या वर्णनासह मृत जीवाच्या शेवटच्या वेळी केलेल्या क्रियांचा तपशील त्यात वर्णन केलेला असतो.

१०. असे म्हटले जाते की केवळ गरुड पुराणाचे पठण ऐकून मृत आत्म्यास शांती मिळते आणि तारणाचा मार्ग माहित मिळतो. आपल्या सर्व वेदना विसरल्यानंतर, तो प्रभूच्या मार्गावर चालतो आणि मोक्ष प्राप्त करतो, एकतर पितृलोकाकडे जातो किंवा एखाद्या योनीत  पुन्हा जन्माला येतो. त्याला भूत म्हणून भटकण्याची गरज नाही, यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिष