शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2024: पितृदोष असलाच तर तो किती पिढ्यांना त्रासदायक ठरतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 10:30 IST

Pitru Paksha 2024: पितृदोषाचे निवारण व्हावे म्हणून पितृपक्षात आपण श्राद्धविधी करतो, मात्र ज्यांच्या पितृदोषाचे निवारण होत नाही, त्यांच्या पुढल्या पिढ्यांनाही त्रास होतो!

पितृदोष (Pitru Dosha) म्हणजे तरी काय? तर घरात अकारण होणारे वाद, चांगल्या कार्यात येणारी विघ्न, यशाच्या मार्गावर अपयशाशी सामना, लांबलेली शुभकार्य, आर्थिक अडचणी या गोष्टी सर्वसामान्यांच्याही आयुष्यात घडतात, पण पितृदोष असलेल्या ठिकाणी या गोष्टी अकारण होत असल्याचे लक्षात येते. ते अकारण घडत नसून पितृदोष हे त्यामागचे कारण असते. पितरांना आपल्यामुळे झालेली पीडा, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, त्यांच्या आत्म्याला सद्गती न मिळाल्याने पितृदोष निर्माण होतात. म्हणून पितृपक्षात (Pitru Paksha 2024) श्राद्धविधी करून त्याचे निवारण करायचे असते. मात्र ज्यांच्याकडून ते होत नाही त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, ते जाणून घेऊ.  

पितृदोषाशी संबंधित कारणे आणि उपाय गरुड पुराणात सांगितले आहेत. पितृदोषामुळे व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत. तसेच पितृदोषाने पीडित व्यक्तीची कष्ट करूनही प्रगती होत नाही. गरुड पुराणात पितृदोषापासून मुक्तीचा मार्ग म्हणून पितरांचे श्राद्ध आणि तर्पण हे विधी दिले आहेत. पितृदोष एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर वेळीच त्याचे निवारण केले नाहीतर पुढच्या पिढयांनाही त्रासदायक ठरतो. गरुड पुराणात यासंबंधी दिलेली माहिती आणि उपाय जाणून घेऊया. 

पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. गरुड पुराणानुसार पितृपक्षात १५ दिवस पितर यमलोकातून पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत पितरांना तृप्त  करण्यासाठी वंशजांनी श्राद्धविधी करावेत असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. याशिवाय श्राद्ध करणाऱ्याला पुण्यही मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळत असल्याने पितरांचे श्राद्ध करणेही महत्त्वाचे आहे. 

गरुड पुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही पडतो. कुटुंबावर पितृदोष आल्यामुळे इतर सदस्यांनाही कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. पितृदोष दूर केला नाही तर तो ७ पिढ्या चालू राहतो. म्हणून पिढी दर पिढी पितृदोषाचे निवारण करणे गरजेचे असते. पितृदोष सात पिढ्या चालू राहिल्यास वंश पुढे नेण्यात अडचणी निर्माण होतात. यासोबतच पितृदोषाने ग्रासलेल्या घरात लहान मुलांचा आकस्मिक मृत्यूही होऊ शकतो. 

मनुष्याच्या आशा आकांक्षा मरणोत्तरही शिल्लक राहतात. देह सुटतो पण आशा, अपेक्षा बाकी राहतात. त्या पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म मिळतो. त्या जन्मात नवीन अपेक्षा, इच्छा जोडल्या जातात. अशी साखळी सुरु राहते. म्हणून संत म्हणतात, मानव देह ही मोक्षाची वाट आहे, इथले भोग, प्रारब्ध, दुःख, संकटं सामोरं जाऊन संपवा. आयुष्य संपायच्या आधी इच्छा संपवा, जेणेकरून तुम्हाला तर मोक्ष मिळेलच, शिवाय पुढच्या पिढयांना पितृदोषाला सामोरे जावे लागणार नाही. 

(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAstrologyफलज्योतिष