शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:24 IST

Sarva Pitru Amavasya 2022: कोणाला पितरांची तिथी माहीत नाही म्हणून तर कोणाला वेळ मिळाला नाही म्हणून श्राद्धकर्म राहून गेले असेल त्यांच्यासाठी पुढील उपाय दिले आहेत. 

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावस्येला करण्याची प्रथा आहे. सर्व पितरांचे एकत्रितपणे श्राद्ध अमावस्येला केले जाऊ लागल्याने या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते. यंदा रविवारी २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. 

एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रूपाने धर्माने आपल्याला प्राप्त करून दिली आहे. 

ज्यांना विविध सांसारिक अडचनींमुळे पितृपक्षातही श्राद्धकर्म यथाविधी करणे शक्य होत नाही, त्यांनी श्राद्धतिथीच्या दिवशी किंवा तिथी लक्षात नसल्यास सर्वपित्री अमावस्येला एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी द्यावी. एखाद्या वाचनालयाला ग्रंथ भेट द्यावेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे. भुकेलेल्यांना अन्न द्यावे. अथवा एक दिवसाचा, एक महिन्याचा, एक वर्षाचा शिधा अर्थात कोरडे धान्य दान करावे. गरजेनुसार वस्त्रदान करावे. हे सर्व करताना पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना करावी. 

शहरी भागात लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने ते या मार्गांचा अवलंब करताना आढळतात. या गोष्टीदेखील धर्मशास्त्राला जोडून आहेत. एवढेच काय, तर दान करण्याची आपली क्षमता नसेल, श्राद्धविधीचा खर्च परवडत नसेल, तर मोकळ्या मैदानात किंवा गच्चीत जाऊन आपल्यासाठी रांधलेल्या स्वयंपाकाचा कावळ्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यांचे मनोभावे स्मरण करून, दोन्ही हात वर करून आपली अमर्थता पितरांसमोर व्यक्त करावी. ते मोठ्या मनाने आपली सेवा मान्य करून आपल्याला शुभाशिर्वाद देतात, असेही धर्मशास्त्रात म्हटले आहे. 

तात्पर्य, आपल्या धर्मात सर्व बाबींचा किती सखोल अभ्यास केला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर साधे सोपे पर्याय दिले आहेत, यावरून धर्माची विशालता लक्षात येते. त्याचाच लाभ घेऊन आपणही कर्तव्याला जागुया आणि धर्माचरण करूया.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष