शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:24 IST

Sarva Pitru Amavasya 2022: कोणाला पितरांची तिथी माहीत नाही म्हणून तर कोणाला वेळ मिळाला नाही म्हणून श्राद्धकर्म राहून गेले असेल त्यांच्यासाठी पुढील उपाय दिले आहेत. 

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावस्येला करण्याची प्रथा आहे. सर्व पितरांचे एकत्रितपणे श्राद्ध अमावस्येला केले जाऊ लागल्याने या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते. यंदा रविवारी २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. 

एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रूपाने धर्माने आपल्याला प्राप्त करून दिली आहे. 

ज्यांना विविध सांसारिक अडचनींमुळे पितृपक्षातही श्राद्धकर्म यथाविधी करणे शक्य होत नाही, त्यांनी श्राद्धतिथीच्या दिवशी किंवा तिथी लक्षात नसल्यास सर्वपित्री अमावस्येला एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी द्यावी. एखाद्या वाचनालयाला ग्रंथ भेट द्यावेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे. भुकेलेल्यांना अन्न द्यावे. अथवा एक दिवसाचा, एक महिन्याचा, एक वर्षाचा शिधा अर्थात कोरडे धान्य दान करावे. गरजेनुसार वस्त्रदान करावे. हे सर्व करताना पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना करावी. 

शहरी भागात लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने ते या मार्गांचा अवलंब करताना आढळतात. या गोष्टीदेखील धर्मशास्त्राला जोडून आहेत. एवढेच काय, तर दान करण्याची आपली क्षमता नसेल, श्राद्धविधीचा खर्च परवडत नसेल, तर मोकळ्या मैदानात किंवा गच्चीत जाऊन आपल्यासाठी रांधलेल्या स्वयंपाकाचा कावळ्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यांचे मनोभावे स्मरण करून, दोन्ही हात वर करून आपली अमर्थता पितरांसमोर व्यक्त करावी. ते मोठ्या मनाने आपली सेवा मान्य करून आपल्याला शुभाशिर्वाद देतात, असेही धर्मशास्त्रात म्हटले आहे. 

तात्पर्य, आपल्या धर्मात सर्व बाबींचा किती सखोल अभ्यास केला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर साधे सोपे पर्याय दिले आहेत, यावरून धर्माची विशालता लक्षात येते. त्याचाच लाभ घेऊन आपणही कर्तव्याला जागुया आणि धर्माचरण करूया.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष