शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

Pitru Paksha 2022: पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत श्राद्धविधी राहून गेले असतील तर सर्वपित्री अमावस्येला करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:24 IST

Sarva Pitru Amavasya 2022: कोणाला पितरांची तिथी माहीत नाही म्हणून तर कोणाला वेळ मिळाला नाही म्हणून श्राद्धकर्म राहून गेले असेल त्यांच्यासाठी पुढील उपाय दिले आहेत. 

भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावस्येला करण्याची प्रथा आहे. सर्व पितरांचे एकत्रितपणे श्राद्ध अमावस्येला केले जाऊ लागल्याने या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते. यंदा रविवारी २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. 

एरव्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीत करण्याएवढी फुरसद सर्वांकडे नसते. मात्र त्यांच्याबद्दलची आपुलकी, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दरवर्षी पितृपक्षाच्या रूपाने धर्माने आपल्याला प्राप्त करून दिली आहे. 

ज्यांना विविध सांसारिक अडचनींमुळे पितृपक्षातही श्राद्धकर्म यथाविधी करणे शक्य होत नाही, त्यांनी श्राद्धतिथीच्या दिवशी किंवा तिथी लक्षात नसल्यास सर्वपित्री अमावस्येला एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी द्यावी. एखाद्या वाचनालयाला ग्रंथ भेट द्यावेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे. भुकेलेल्यांना अन्न द्यावे. अथवा एक दिवसाचा, एक महिन्याचा, एक वर्षाचा शिधा अर्थात कोरडे धान्य दान करावे. गरजेनुसार वस्त्रदान करावे. हे सर्व करताना पितरांचे स्मरण करावे. त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना करावी. 

शहरी भागात लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने ते या मार्गांचा अवलंब करताना आढळतात. या गोष्टीदेखील धर्मशास्त्राला जोडून आहेत. एवढेच काय, तर दान करण्याची आपली क्षमता नसेल, श्राद्धविधीचा खर्च परवडत नसेल, तर मोकळ्या मैदानात किंवा गच्चीत जाऊन आपल्यासाठी रांधलेल्या स्वयंपाकाचा कावळ्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यांचे मनोभावे स्मरण करून, दोन्ही हात वर करून आपली अमर्थता पितरांसमोर व्यक्त करावी. ते मोठ्या मनाने आपली सेवा मान्य करून आपल्याला शुभाशिर्वाद देतात, असेही धर्मशास्त्रात म्हटले आहे. 

तात्पर्य, आपल्या धर्मात सर्व बाबींचा किती सखोल अभ्यास केला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर साधे सोपे पर्याय दिले आहेत, यावरून धर्माची विशालता लक्षात येते. त्याचाच लाभ घेऊन आपणही कर्तव्याला जागुया आणि धर्माचरण करूया.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष