शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Pitru Paksha 2021: पितृपक्षात जुळून येतोय दुर्मिळ गजछाया योग; पाहा, पुराण आणि शास्त्र काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:59 IST

Pitru Paksha 2021: सर्वपित्री अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग (Gajachchhaya Yoga) जुळून येत आहे.

मराठी वर्षातील अन्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांच्याप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या पितृ पंधरवड्यालाही (Pitru Paksha 2021) तेवढेच महत्त्व आहे. आता काहीच दिवसात पितृपक्षाची सांगता होऊन नवरात्राला सुरुवात होईल. मात्र, यंदाच्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी गजच्छायायोग (Gajachchhaya Yoga 2021 Date) जुळून येत आहे. याला गजछाया योग असेही म्हटले जाते. हा योग अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया... 

यंदाच्या वर्षी म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्वपित्री अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya 2021) दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग जुळून येत आहे. हा योग केवळ पितृपक्षात जुळून येतो, अशी मान्यता आहे. या योगाच्या कालावधीत पिंडदान, तर्पण, श्राद्ध विधी करणे उत्तम मानले जाते. यामुळे पितर तृप्त आणि प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हा योग प्रत्येक वर्षी येतोच असे नाही. नक्षत्र संयोग आणि ग्रहांचे नक्षत्रातील भ्रमण यामुळे गजच्छायायोग जुळून येतो. (Gajachaya Yog 2021 Date)

कोणत्या पुराणात काय उल्लेख?

सूर्य आणि चंद्र दोन्ही ज्यावेळेस हस्त नक्षत्रात असतात, तेव्हाच हा योग जुळून येतो. (Gajachaya Yog Importance) सूर्यावर राहु किंवा केतुची दृष्टी पडल्यावर हा योग येतो. पितृपक्षातील भाद्रपद वद्य त्रयोदशी किंवा अमावास्या या दरम्यान हा योग येतो. यावर्षी हा योग सर्वपित्री अमावास्येला येत आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये सर्वपित्री अमावास्येला अशा प्रकारचा योग जुळून आला होता. या योगाबाबत स्कंदपुराण, अग्निपुराण, मत्स्यपुराण, वराहपुराण यासह महाभारतात उल्लेख आढळून येतो. या योगावर पिंडदान, श्राद्ध, तर्पण विधी केल्यास कमीत कमी १३ वर्षांपर्यंत पितर किंवा पूर्वज तृप्त आणि प्रसन्न राहतात, अशी मान्यता आहे. (Significance of Gajachaya Yoga in Marathi)

सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व 

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते. गजच्छायायोगात गया, पुष्कर, हरिद्वार, बद्रीनाथ आणि प्रयागराज येथे श्राद्ध विधी, तर्पण, पिंडदान करणे उत्तम मानले जाते. तसेच या ठिकाणी देशभरातून पितृपक्षातील विधी करण्यासाठी श्रद्धाळू जात असतात.  

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष