शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2021: पितृपक्षात जुळून येतोय दुर्मिळ गजछाया योग; पाहा, पुराण आणि शास्त्र काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:59 IST

Pitru Paksha 2021: सर्वपित्री अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya) दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग (Gajachchhaya Yoga) जुळून येत आहे.

मराठी वर्षातील अन्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांच्याप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या पितृ पंधरवड्यालाही (Pitru Paksha 2021) तेवढेच महत्त्व आहे. आता काहीच दिवसात पितृपक्षाची सांगता होऊन नवरात्राला सुरुवात होईल. मात्र, यंदाच्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी गजच्छायायोग (Gajachchhaya Yoga 2021 Date) जुळून येत आहे. याला गजछाया योग असेही म्हटले जाते. हा योग अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया... 

यंदाच्या वर्षी म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्वपित्री अमावास्येच्या (Sarva Pitru Amavasya 2021) दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग जुळून येत आहे. हा योग केवळ पितृपक्षात जुळून येतो, अशी मान्यता आहे. या योगाच्या कालावधीत पिंडदान, तर्पण, श्राद्ध विधी करणे उत्तम मानले जाते. यामुळे पितर तृप्त आणि प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हा योग प्रत्येक वर्षी येतोच असे नाही. नक्षत्र संयोग आणि ग्रहांचे नक्षत्रातील भ्रमण यामुळे गजच्छायायोग जुळून येतो. (Gajachaya Yog 2021 Date)

कोणत्या पुराणात काय उल्लेख?

सूर्य आणि चंद्र दोन्ही ज्यावेळेस हस्त नक्षत्रात असतात, तेव्हाच हा योग जुळून येतो. (Gajachaya Yog Importance) सूर्यावर राहु किंवा केतुची दृष्टी पडल्यावर हा योग येतो. पितृपक्षातील भाद्रपद वद्य त्रयोदशी किंवा अमावास्या या दरम्यान हा योग येतो. यावर्षी हा योग सर्वपित्री अमावास्येला येत आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये सर्वपित्री अमावास्येला अशा प्रकारचा योग जुळून आला होता. या योगाबाबत स्कंदपुराण, अग्निपुराण, मत्स्यपुराण, वराहपुराण यासह महाभारतात उल्लेख आढळून येतो. या योगावर पिंडदान, श्राद्ध, तर्पण विधी केल्यास कमीत कमी १३ वर्षांपर्यंत पितर किंवा पूर्वज तृप्त आणि प्रसन्न राहतात, अशी मान्यता आहे. (Significance of Gajachaya Yoga in Marathi)

सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व 

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते. गजच्छायायोगात गया, पुष्कर, हरिद्वार, बद्रीनाथ आणि प्रयागराज येथे श्राद्ध विधी, तर्पण, पिंडदान करणे उत्तम मानले जाते. तसेच या ठिकाणी देशभरातून पितृपक्षातील विधी करण्यासाठी श्रद्धाळू जात असतात.  

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष