शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

तुमच्याही घरात मोरपिस आहे? व्हाल संकटमुक्त; सुख-समृद्धी वृद्धीस उपयुक्त; पाहा, फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:36 IST

श्रीकृष्णाने आजन्म धारण केलेल्या मोरपिसाचे ज्योतिषशास्त्रात काही उपाय, फायदे सांगितले जातात. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा असून, त्या त्या शाखेत संबंधित बाबींचा अभ्यास करून काही गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो. यामध्ये अंकशास्त्र, हस्तशास्त्र, समुद्रशास्त्र, वास्तूशास्त्र, स्वप्नशास्त्र या ज्योतिषशास्त्राच्या शाखांमधून मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याच्याशी निगडीत गोष्टींचा ऊहापोह केला जाऊ शकतो. जीवनात काही समस्या येत असतील, तर त्यासाठी काही उपाय सूचवले जातात. (peacock feather astrology remedies)

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची असते. कारण यामुळे व्यक्तीला जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाताना सुख-समृद्धी प्राप्त होते. दुसरीकडे, जर ग्रह अनुकूल नसतील तर तुम्हाला पैसा, नातेसंबंध, व्यवसाय, आरोग्य इत्यादींशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी असे मानले जाते की मोराच्या पिसांचे हे काही उपाय जीवनातील अडचणी दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यास मदत करतात. (mor pankh pisache fayde)

मोरपिसाचे काही फायदे आणि उपाय

- ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती वृद्धीसाठी किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी राधा-कृष्णाच्या मंदिरात जावे आणि मोरपिस अर्पण करावे. काही दिवसांनी ते मोरपिस काढून तुमच्या तिजोरीत ठेवा, असे केल्याने काहीसा दिलास मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

- तुम्हाला कार्यालयात वा कार्यक्षेत्रात हितशत्रू, विरोधकांचा त्रास सहन करावा लागत असेल आणि ते तुमच्यावर वरचढ होऊ नयेत, असे वाटत असेल, तर तर हनुमंतांना सिंदूर अर्पण करावे. तसेच मोरपिस वाहावे. दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. मंगळवार आणि शनिवारी हा उपाय करणे शुभ असल्याचे म्हटले जाते. 

- ज्योतिषशास्त्रानुसार घरातील पुजेच्या ठिकाणी धार्मिक ग्रंथांच्या पुस्तकांमध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि त्याचबरोबर घरातील कलहापासून मुक्ती मिळते.

- असे मानले जाते की, घरात असलेले वास्तू दोष तिथल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो. अशा वेळी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रासह दोन मोराची पिसे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो, अशी मान्यता आहे. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.