शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तुमच्याही घरात मोरपिस आहे? व्हाल संकटमुक्त; सुख-समृद्धी वृद्धीस उपयुक्त; पाहा, फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:36 IST

श्रीकृष्णाने आजन्म धारण केलेल्या मोरपिसाचे ज्योतिषशास्त्रात काही उपाय, फायदे सांगितले जातात. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा असून, त्या त्या शाखेत संबंधित बाबींचा अभ्यास करून काही गोष्टींचा अंदाज बांधता येऊ शकतो. यामध्ये अंकशास्त्र, हस्तशास्त्र, समुद्रशास्त्र, वास्तूशास्त्र, स्वप्नशास्त्र या ज्योतिषशास्त्राच्या शाखांमधून मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याच्याशी निगडीत गोष्टींचा ऊहापोह केला जाऊ शकतो. जीवनात काही समस्या येत असतील, तर त्यासाठी काही उपाय सूचवले जातात. (peacock feather astrology remedies)

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची असते. कारण यामुळे व्यक्तीला जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाताना सुख-समृद्धी प्राप्त होते. दुसरीकडे, जर ग्रह अनुकूल नसतील तर तुम्हाला पैसा, नातेसंबंध, व्यवसाय, आरोग्य इत्यादींशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी असे मानले जाते की मोराच्या पिसांचे हे काही उपाय जीवनातील अडचणी दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यास मदत करतात. (mor pankh pisache fayde)

मोरपिसाचे काही फायदे आणि उपाय

- ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती वृद्धीसाठी किंवा तुमची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी राधा-कृष्णाच्या मंदिरात जावे आणि मोरपिस अर्पण करावे. काही दिवसांनी ते मोरपिस काढून तुमच्या तिजोरीत ठेवा, असे केल्याने काहीसा दिलास मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

- तुम्हाला कार्यालयात वा कार्यक्षेत्रात हितशत्रू, विरोधकांचा त्रास सहन करावा लागत असेल आणि ते तुमच्यावर वरचढ होऊ नयेत, असे वाटत असेल, तर तर हनुमंतांना सिंदूर अर्पण करावे. तसेच मोरपिस वाहावे. दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. मंगळवार आणि शनिवारी हा उपाय करणे शुभ असल्याचे म्हटले जाते. 

- ज्योतिषशास्त्रानुसार घरातील पुजेच्या ठिकाणी धार्मिक ग्रंथांच्या पुस्तकांमध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि त्याचबरोबर घरातील कलहापासून मुक्ती मिळते.

- असे मानले जाते की, घरात असलेले वास्तू दोष तिथल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो. अशा वेळी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रासह दोन मोराची पिसे लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो, अशी मान्यता आहे. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.