शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

धैर्य हा मानवाचा दागिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:01 IST

ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो. धैर्याने तो आपल्यावर येणाऱ्या संकटांना हसत-खेळत सामोरे जातो. तो मनुष्य यशाची प्रदीर्घ प्रतीक्षा करतो व साधना करत राहातो. कुठल्याही प्रसंगी तो आपले धैर्य सोडत नाही. आपल्या कार्यापासून जराही विचलित होत नाही. कठीणातल्या कठीण प्रसंगी आपले धैर्य टिकवून ठेवतो. कारण त्याच्यातला आत्मविश्वास कायम असतो. ज्याचा आत्मविश्वास बळकट आहे तो आपल्या यशस्वी साम्राज्याची गुढी उभारतो. आत्मविश्वासाने पराजयाचे विजयात रूपांतर करतो. नि:संदेहपणे जगतो. आत्मविश्वासाच्या बळावर मनुष्य महान कार्य करतो. तो कधीच आपला आत्मविश्वास गमावत नाही.आपला विवेकरूपी तोल कधी ढळू देत नाही. जीवनात मान-अपमान, धर्म-अधर्म, जीवन-मरण, लाभ-हानी या सर्वांना तो ओळखून असतो. त्या मनुष्याला त्याची परिपूर्ण जाणीव असते. त्याच्या जीवनात कुटिल राजकारण नसते. आपल्याकडून कुठलेही वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता घेतो. त्याच्या प्रत्येक कर्मात सरलता, सुबोधता आढळते. खोटेपणा, कृत्रिमता त्याच्या कार्यात नसते. तो मनुष्य साधनाशील असतो. जीवनमूल्यांचा प्रसार-प्रचार करतो. धर्माची प्रबलता वाढवतो. समाज, राष्ट्र घडविण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. सदाचार, श्रेष्ठाचार त्याच्या अंगी बाळगतो. भ्रष्टाचार शब्द त्याच्या मनाच्या नोंदवहीतसुद्धा सापडत नाही. तो मनुष्य नेहमी संयम-सदाचार याचा परिपाठ लोकांना सांगतो किंवा आपल्या आचरणातून दाखवतो. तो मनुष्य धैर्य-विवेक व आत्मविश्वासाच्या समन्वयातून आकाशात उडण्याचा प्रयत्न करेल किंवा उडेलही. म्हणून म्हणतो माणसाजवळ धैर्य-विवेक व आत्मविश्वास नसेल तर तो मनुष्य तरुण असूनही वृद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक