शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

धैर्य हा मानवाचा दागिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:01 IST

ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो. धैर्याने तो आपल्यावर येणाऱ्या संकटांना हसत-खेळत सामोरे जातो. तो मनुष्य यशाची प्रदीर्घ प्रतीक्षा करतो व साधना करत राहातो. कुठल्याही प्रसंगी तो आपले धैर्य सोडत नाही. आपल्या कार्यापासून जराही विचलित होत नाही. कठीणातल्या कठीण प्रसंगी आपले धैर्य टिकवून ठेवतो. कारण त्याच्यातला आत्मविश्वास कायम असतो. ज्याचा आत्मविश्वास बळकट आहे तो आपल्या यशस्वी साम्राज्याची गुढी उभारतो. आत्मविश्वासाने पराजयाचे विजयात रूपांतर करतो. नि:संदेहपणे जगतो. आत्मविश्वासाच्या बळावर मनुष्य महान कार्य करतो. तो कधीच आपला आत्मविश्वास गमावत नाही.आपला विवेकरूपी तोल कधी ढळू देत नाही. जीवनात मान-अपमान, धर्म-अधर्म, जीवन-मरण, लाभ-हानी या सर्वांना तो ओळखून असतो. त्या मनुष्याला त्याची परिपूर्ण जाणीव असते. त्याच्या जीवनात कुटिल राजकारण नसते. आपल्याकडून कुठलेही वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता घेतो. त्याच्या प्रत्येक कर्मात सरलता, सुबोधता आढळते. खोटेपणा, कृत्रिमता त्याच्या कार्यात नसते. तो मनुष्य साधनाशील असतो. जीवनमूल्यांचा प्रसार-प्रचार करतो. धर्माची प्रबलता वाढवतो. समाज, राष्ट्र घडविण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. सदाचार, श्रेष्ठाचार त्याच्या अंगी बाळगतो. भ्रष्टाचार शब्द त्याच्या मनाच्या नोंदवहीतसुद्धा सापडत नाही. तो मनुष्य नेहमी संयम-सदाचार याचा परिपाठ लोकांना सांगतो किंवा आपल्या आचरणातून दाखवतो. तो मनुष्य धैर्य-विवेक व आत्मविश्वासाच्या समन्वयातून आकाशात उडण्याचा प्रयत्न करेल किंवा उडेलही. म्हणून म्हणतो माणसाजवळ धैर्य-विवेक व आत्मविश्वास नसेल तर तो मनुष्य तरुण असूनही वृद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक