शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पुनश्च पांडुरंग भेटीचा आनंद आणि वारकरी झाले भजनात दंग!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 18, 2020 12:44 IST

काळानुकाळची वारीची परंपरा, कधी नव्हे ती यावर्षी खंडित झाली. परंतु, भक्तांच्या मनीचा भाव किंवा भगवंताप्रती असलेली ओढ यत्किंचितही कमी झाली नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ

पंढरपूर हे सर्व संतांचे माहेर. माहेरचा आनंद हा शब्दांपलीकडचा. तो शब्दात वर्णन करताना संतांची वाणी कधीच थकली नाही. एकापेक्षा एक सरस आणि सुरस अभंगवाणी तयार झाली. अभंग अर्थात कधीही भंग पावणार नाही, असे काव्य. महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभली आणि त्याच अनुशंगाने मोठी काव्यपरंपराही लाभली. त्याचेच फलित म्हणून की काय, संतरचनांसारखी प्रासादिक काव्ये अलीकडच्या काळातही निर्माण झाली. त्यात पं.भीमसेन जोशी तसेच पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायकांनी त्या शब्दांचे सोने केले आणि ती गाणी अजरामर केली. असेच एक सुप्रसिद्ध चित्रपट गीत, जे ऐकल्यावर आपल्याला संतवाणीची आठवण होईल. भोळी भाबडी चित्रपटातील कवी जगदीश खेबुडकर लिखित गीत,

टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग,देवाजिच्या द्वारी आज, रंगला अभंग।।

काळानुकाळची वारीची परंपरा, कधी नव्हे ती यावर्षी खंडित झाली. परंतु, भक्तांच्या मनीचा भाव किंवा भगवंताप्रती असलेली ओढ यत्किंचितही कमी झाली नाही. मंदिराची दारे बंद असतानाही भाविक चंद्रभागेचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीवर मस्तक ठेवून समाधान मानत होती. आता, तर तोही अडसर दूर झाला आहे. पुन्हा एकदा आनंदाचा सुकाळू येईल आणि पंढरपुरच्या प्रांगणात टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा गजर होत विठुनामाने पंढरी दुमदुमून निघेल. त्याच भावावस्थेचे यथार्थ वर्णन खेबुडकरांनी प्रस्तुत काव्यात केले आहे. 

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज

अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो.

दरबारी आले रंक आणि राव,सारे एकरूप नाही भेदभावगाउ नाचू सारे होऊनि नि:संग।

विठ्ठलनामात रंगुन गेलेला वारकरी मैलोनमैलाचे अंतर पायी कापत कधी पायरीचे तर कधी कळसाचे दर्शन घेऊन परत जातो. एरव्ही कोणी पायी चालत जा म्हटले, तर जवळचे अंतरही नकोसे होते, मात्र भगवन्नाम घेत वारीला निघालेली पावले कधीच थकत नाहीत, असा भाविकांचा अनुभव आहे. याचे वर्णन करताना खेबुडकर लिहितात, 

जनसेवेपायी काया झिजवावी,घाव सोसुनिया मने रिझवावी,ताल देऊनी हा बोलतो मृदंग

या ओळींवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य आठवते, त्यांनी आपल्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 

अमर होय वंशलता, निर्वंश जिचा देशा करिता,दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची ।

जी फुले खुडली गेल्यावर रामचरणी वाहिली जातात, ती धन्य होतात. त्याप्रमाणे ज्यांचा वंश देशकार्यासाठी निर्वंश होतो, त्यांचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित होऊन, त्यांच्यापश्चातही परिमळ दरवळत राहतो. खेबुडकरांनीदेखील हाच धागा पकडून जनसेवेपायी काया झिजवावी, असे म्हटले आहे आणि त्याचा दाखला देताना मृदंगाचे उदाहरण दिले आहे. 

ब्रह्मानंदी देह बुडुनिया जाई,एक एक खांब वारकरी होई,कैलासाचा नाथ झाला पांडुरंग।

हा ब्रह्मानंद वेगळाच आहे. तो सांगून कळणारा नाही, त्याची अनुभूती घ्यायची असते. पंढरपुराच्या कणाकणातून विठ्ठल नाम उमटते. हे सांगताना खेबुडकरांची काव्यप्रतिभा उच्चांक गाठते. ते मंदिराच्या खांबालाही वारकऱ्याचे रूप देतात आणि हा सोहळा स्वर्गसुखाचा आनंद देणारा आहे, म्हणून पंढरपुराला कैलासाची उपमा देत, पांडुरंगाला कैलासपती संबोधतात. 

हेही वाचा : पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा