शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Pandav Panchami 2022: कुरुक्षेत्रात विजय मिळाल्यावर श्रीकृष्णाने पांडवांना शांतीयज्ञ का करायला सांगितला? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 14:33 IST

Pandav Panchami 2022: कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांना विजय मिळाला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती, त्यांचे मन विषण्ण झाले होते. त्यावर कृष्ण म्हणाले... 

संसाराकडे, जीवनाकडे कर्मभोग म्हणून पाहणारी अर्थातच स्वहिताकडे लहानपणापासून लक्ष ठेवून असणारी महामाता कुंती, भगवान श्रीकृष्णांना एकदा म्हणाली, 'भगवान कृष्ण, हा अहंकार आत्मोन्नतीसाठी घातक ठरतो. याला बाजूला सारण्याचा हुकुमी उपाय म्हणजे तुझे सतत नामस्मरण माझ्या मनाला हे वारंवार बजावीत असतानाही हे नाठाळ मन या अहंकाराच्या आहारी जाऊन कधीकधी मला तुझे विस्मरण होण्यास भाग पाडते. म्हणून भगवंता, तुझ्याजवळ एकच मागणे आहे, ते म्हणजे जगातील दु:खे आशीर्वाद म्हणून माझ्या पदरी टाक, जेणे करून 'भगवंता सोडव' त्यापलीकडे माझ्या मुखातून काहीही येणार नाही.'

महाभारत युद्धानंतर झालेली जीवितहानी पाहून पांडवांचे मन विषण्ण झाले. दोन कुटुंबांच्या वादात, अहंकारात अकारण निष्पाप जीवांचा बळी गेला. विजय मिळूनही त्याचा आनंद उपभोगावा अशी परिस्थिती नव्हती. आपल्या हातून घडलेल्या पातकाची टोचणी त्यांना अस्वस्थ करत होती. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना एक यज्ञ करावयास सांगितला व त्याच्या मुख्य अधिकारपदासाठी जगातील घडामोडींचा संपर्कही नसलेल्या आणि निर्जन ठिकाणी आश्रम स्थापून राहिलेल्या वकदालभ्य मुनींना बोलवा, अशी आज्ञा केली. 

अनुक्रमे पाच पांडव त्यांना बोलवण्यास गेले. परंतु त्यांनी येण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे एकच! शंभर यज्ञ झाले असतील तरच त्या ठिकाणी मी जातो. अर्जुनाने तर महाभारत युद्धाचा विषय काढताच वीज कडाडावी तसे ते ओरडले, 'कसले युद्ध? आम्हाला असली भाषाच माहीत नाही. हा शांतिआश्रम आहे, चल नीघ इथून!' शेवटी कुंतिमातेने द्रौपदीच्या कानामध्ये काही सांगितले. शेवटचा उपाय म्हणून द्रौपदी त्यांना बोलवण्यास गेली. 

अहंकाररहित नम्र अशी ती पांचाली आश्रमात पोहोचताच त्यांना म्हणाली, 'मुनिवर्य, आपली शिष्या पांचाली आपणास अभिवादन करीत आहे. पांडवपत्नी द्रौपदी, आपण शांतियज्ञाला यावे अशी विनंती करत आहे. प्रत्येक जीवात्म्याला शांतता मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून शांतीयज्ञाचे आयोजन करत आहोत. अन्यथा गत जीवात्म्यांना मुक्ती मिळणार नाही. आजवर पांडवांनी धर्माला अनुसरूनच प्रत्येक कार्य केले आणि ते कार्य श्रीकृष्णाला समर्पित केले.  मुनिराज, लहानपणापासून महामाता कुंतीदेवींनी स्वत:ला व पांडवांना प्रत्येक कर्म भगवान स्मरणात करण्याची सवय लावून घेतली आहे. इतकेच नव्हे, तर आपणापुढे उभा असलेला हा नश्वर देहसुद्धा सतत नामचिंतन करीत असतो आणि मुनिवर्य, 'नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली' हे तर आपलेच वचन. यामुळे महामाता कुंतीच्या व त्यांच्या पुत्रसुनेच्या यज्ञांची संख्या कशी मोजणार?' एवढ्या संभाषणात 'मी' चा चुकूनसुद्धा उच्चार न झालेल्या व असंख्यात यज्ञ झाल्याची खात्री देणाऱ्या द्रौपदीला हसून मुनींनी होकार दिला.

पांचालीच्या नम्र आचरणाने आणि मधुर संभाषणाने शांतियज्ञ व्यवस्थितरित्या पार पडला. सर्व जीवात्म्यांना सदगती मिळाली. पांचालीच्या पुढाकाराने हे साध्य झाले. तिच्या ठायी एवढी विनम्रता आली, ती नामस्मरणामुळे आणि भगवंत भक्तीमुळे!  नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर नेते. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये लिहितात, 

रघुनायकावीण वाया शिणावे,जनासारिखे व्यर्थ का वोसणावे,सदा सर्वदा नाम वाचे वसो दे,अहंता मनी पापिणी ते नसो दे ।।श्रीराम।।

टॅग्स :Mahabharatमहाभारत