शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वयाची चाळीशी ओलांडलीत? सावधान! आता 'ही' पथ्य पाळा; सांगताहेत तरुण सागर महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 14:37 IST

काही गोष्टी योग्य वयात केल्या तर भविष्यात पश्चात्ताप करावा लागत नाही; चाळीशी नंतरच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचे हे शिकवले जाते. त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचे ओझे वाहत असतो. मात्र योग्य वेळी हे ओझे उतरवून ठेवायलासुद्धा शिकले पाहिजे. हे ज्ञान आपल्याला संत, महंत आणि अध्यात्मिक गुरूंकडून मिळते. तरुण सागर महाराज हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. 

सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराज यांची ओळख होती. 'कडवे प्रवचन' ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध आहे. आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल त्यांनी मांडलेले विचार अनुकरणीय होते. अशातच त्यांनी चाळीशी ओलांडलेल्या तसे त्यापेक्षा मोठ्या आणि छोट्या वयाच्या लोकांना संदेश दिला आहे-

  • दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट सोडून चालणे सोडा. 
  • विसाव्या वर्षी खेळण्यांसाठी भांडणे सोडा. 
  • तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणे सोडा. 
  • चाळीसाव्या वर्षी रात्रीचे जेवण सोडा. 
  • पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे सोडा. 
  • साठाव्या वर्षी व्यवसाय तसेच नोकरी सोडा. 
  • सत्तराव्या वर्षी पलंगावर झोपणे सोडा. 
  • ऐंशीव्या वर्षी तामसी भोजन सोडा. 
  • नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा. 
  • शंभराव्या वर्षी हे जग सोडा. 

साधू मुनी कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसे जगू शकतात, याचे गुपितच जणू काही तरुण सागर महाराजांनी आपल्याला वरील संदेशातून सांगितले आहे. त्यावर नीट विचार केला असता लक्षात येईल, की आपण आता वयाच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर आपल्याला कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि निस्पृहतेचा मार्ग धुंडाळायला शिकायचे आहे. एखाद्या गोष्टीचा मोह सोडणे सोपे नाही, परंतु मोहाचा क्षण सोडला तर मोक्षही दूर नाही! 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स