शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

'या' एका उपायाने तुमच्या अर्ध्याहून अधिक आरोग्य समस्या समूळ नष्ट होतील!- सद्गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:25 IST

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

भारतीय संस्कृतीतील एखादी गोष्ट पाश्चात्यांनी दुजोरा दिल्याशिवाय भारतीयांना पटत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. भारतीय ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनावर विश्वास न ठेवता अमेरिकन शास्त्रज्ञ हे विशेषण लागले, की लोकांचा चटकन विश्वास बसतो. सांगत आहेत अध्यात्मिक वक्ते सद्गुरू!

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

उपास हा थट्टेचा विषय नसून ती शरीरावर नियंत्रण मिळवणारी प्रभावी उपचार पद्धत आहे. लाखो रुपये खर्च करून औषध घेण्यापेक्षा, शस्त्रक्रिया करण्यापेक्षा योग्य आहारपद्धती, सवयी आत्मसात केल्या तर अध्र्याहून अधिक आरोग्यसमस्या दूर होतील.

शरीर हे यंत्र व्यवस्थित चालावे असे वाटत असेल, तर त्याला अधून मधून विश्रांती दिली पाहिजे. सतत खाण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या शरीराला रोगाचे माहेरघर बनवून ठेवले आहे. ते पुन्हा नियंत्रणात आणायचे असेल, तर तोंडावर नियंत्रण ठेवा. जेव्हा उपाशी राहाल, तेव्हाच आतल्या यंत्रणेला दुरुस्ती करण्यास संधी मिळेल. तुम्ही सतत खाऊन यंत्र सुरूच ठेवले, तर ते न सांगता बंद पडेल. 

सकाळी १० वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता जेवणाची शरीराला सवय लावून घ्या. अध्ये मध्ये भूक लागत असेल, तर भूकेवर नियंत्रण मिळवा. संयम ठेवा. रिकामे पोट तुम्हाला कामासाठी अतिरिक्त ऊर्जा देईल. सायंकाळी ७ वाजता जेवून घेतल्यामुळे पोट हलके राहील. झोपेवर ताण पडणार नाही. जडत्त्व येणार नाही. अन्न पचेल. जेवणात आणि झोपण्यात तीन तासांचे अंतर राहील. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय अतिशय घातक आहे. ती सवय आधी बदलून टाका. सूर्यास्ताआधी जेवून घ्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात भूक लागत नाही. सवय होईपर्यंत खावेसे वाटत राहील, पण सवय लागली, की भूकेवर आणि रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. 

एवढा वेळ पोट उपाशी ठेवल्याने अजिबात मृत्यू येत नाही. उलट आयुष्य चांगल्या ऊर्जेने, उत्साहाने तुम्ही जगू लागता. दोन घास अतिरिक्त खाण्याऐवजी दोन घास कमी खा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ही आहारशैली तुम्ही वापरात आणली, तर ५० टक्के आरोग्य समस्या दूर होतील. या आहारशैलीला पुरेशा व्यायामाची जोड दिली, तर ९० टक्के अधिक तुम्ही कार्यान्वित व्हाल. उरला प्रश्न १० टक्के दुर्धर आजारांचा, त्यासाठी लागणारे उपाय आपल्याला डॉक्टर देतील, परंतु ते आजार होऊच नयेत, यासाठी खबरदारी आपण आजपासून घेऊ शकतो, नाही का?