शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'या' एका उपायाने तुमच्या अर्ध्याहून अधिक आरोग्य समस्या समूळ नष्ट होतील!- सद्गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:25 IST

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

भारतीय संस्कृतीतील एखादी गोष्ट पाश्चात्यांनी दुजोरा दिल्याशिवाय भारतीयांना पटत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. भारतीय ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनावर विश्वास न ठेवता अमेरिकन शास्त्रज्ञ हे विशेषण लागले, की लोकांचा चटकन विश्वास बसतो. सांगत आहेत अध्यात्मिक वक्ते सद्गुरू!

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

उपास हा थट्टेचा विषय नसून ती शरीरावर नियंत्रण मिळवणारी प्रभावी उपचार पद्धत आहे. लाखो रुपये खर्च करून औषध घेण्यापेक्षा, शस्त्रक्रिया करण्यापेक्षा योग्य आहारपद्धती, सवयी आत्मसात केल्या तर अध्र्याहून अधिक आरोग्यसमस्या दूर होतील.

शरीर हे यंत्र व्यवस्थित चालावे असे वाटत असेल, तर त्याला अधून मधून विश्रांती दिली पाहिजे. सतत खाण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या शरीराला रोगाचे माहेरघर बनवून ठेवले आहे. ते पुन्हा नियंत्रणात आणायचे असेल, तर तोंडावर नियंत्रण ठेवा. जेव्हा उपाशी राहाल, तेव्हाच आतल्या यंत्रणेला दुरुस्ती करण्यास संधी मिळेल. तुम्ही सतत खाऊन यंत्र सुरूच ठेवले, तर ते न सांगता बंद पडेल. 

सकाळी १० वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता जेवणाची शरीराला सवय लावून घ्या. अध्ये मध्ये भूक लागत असेल, तर भूकेवर नियंत्रण मिळवा. संयम ठेवा. रिकामे पोट तुम्हाला कामासाठी अतिरिक्त ऊर्जा देईल. सायंकाळी ७ वाजता जेवून घेतल्यामुळे पोट हलके राहील. झोपेवर ताण पडणार नाही. जडत्त्व येणार नाही. अन्न पचेल. जेवणात आणि झोपण्यात तीन तासांचे अंतर राहील. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय अतिशय घातक आहे. ती सवय आधी बदलून टाका. सूर्यास्ताआधी जेवून घ्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात भूक लागत नाही. सवय होईपर्यंत खावेसे वाटत राहील, पण सवय लागली, की भूकेवर आणि रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. 

एवढा वेळ पोट उपाशी ठेवल्याने अजिबात मृत्यू येत नाही. उलट आयुष्य चांगल्या ऊर्जेने, उत्साहाने तुम्ही जगू लागता. दोन घास अतिरिक्त खाण्याऐवजी दोन घास कमी खा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ही आहारशैली तुम्ही वापरात आणली, तर ५० टक्के आरोग्य समस्या दूर होतील. या आहारशैलीला पुरेशा व्यायामाची जोड दिली, तर ९० टक्के अधिक तुम्ही कार्यान्वित व्हाल. उरला प्रश्न १० टक्के दुर्धर आजारांचा, त्यासाठी लागणारे उपाय आपल्याला डॉक्टर देतील, परंतु ते आजार होऊच नयेत, यासाठी खबरदारी आपण आजपासून घेऊ शकतो, नाही का?