शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

'या' एका उपायाने तुमच्या अर्ध्याहून अधिक आरोग्य समस्या समूळ नष्ट होतील!- सद्गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:25 IST

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

भारतीय संस्कृतीतील एखादी गोष्ट पाश्चात्यांनी दुजोरा दिल्याशिवाय भारतीयांना पटत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. भारतीय ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनावर विश्वास न ठेवता अमेरिकन शास्त्रज्ञ हे विशेषण लागले, की लोकांचा चटकन विश्वास बसतो. सांगत आहेत अध्यात्मिक वक्ते सद्गुरू!

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

उपास हा थट्टेचा विषय नसून ती शरीरावर नियंत्रण मिळवणारी प्रभावी उपचार पद्धत आहे. लाखो रुपये खर्च करून औषध घेण्यापेक्षा, शस्त्रक्रिया करण्यापेक्षा योग्य आहारपद्धती, सवयी आत्मसात केल्या तर अध्र्याहून अधिक आरोग्यसमस्या दूर होतील.

शरीर हे यंत्र व्यवस्थित चालावे असे वाटत असेल, तर त्याला अधून मधून विश्रांती दिली पाहिजे. सतत खाण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या शरीराला रोगाचे माहेरघर बनवून ठेवले आहे. ते पुन्हा नियंत्रणात आणायचे असेल, तर तोंडावर नियंत्रण ठेवा. जेव्हा उपाशी राहाल, तेव्हाच आतल्या यंत्रणेला दुरुस्ती करण्यास संधी मिळेल. तुम्ही सतत खाऊन यंत्र सुरूच ठेवले, तर ते न सांगता बंद पडेल. 

सकाळी १० वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता जेवणाची शरीराला सवय लावून घ्या. अध्ये मध्ये भूक लागत असेल, तर भूकेवर नियंत्रण मिळवा. संयम ठेवा. रिकामे पोट तुम्हाला कामासाठी अतिरिक्त ऊर्जा देईल. सायंकाळी ७ वाजता जेवून घेतल्यामुळे पोट हलके राहील. झोपेवर ताण पडणार नाही. जडत्त्व येणार नाही. अन्न पचेल. जेवणात आणि झोपण्यात तीन तासांचे अंतर राहील. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय अतिशय घातक आहे. ती सवय आधी बदलून टाका. सूर्यास्ताआधी जेवून घ्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात भूक लागत नाही. सवय होईपर्यंत खावेसे वाटत राहील, पण सवय लागली, की भूकेवर आणि रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. 

एवढा वेळ पोट उपाशी ठेवल्याने अजिबात मृत्यू येत नाही. उलट आयुष्य चांगल्या ऊर्जेने, उत्साहाने तुम्ही जगू लागता. दोन घास अतिरिक्त खाण्याऐवजी दोन घास कमी खा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ही आहारशैली तुम्ही वापरात आणली, तर ५० टक्के आरोग्य समस्या दूर होतील. या आहारशैलीला पुरेशा व्यायामाची जोड दिली, तर ९० टक्के अधिक तुम्ही कार्यान्वित व्हाल. उरला प्रश्न १० टक्के दुर्धर आजारांचा, त्यासाठी लागणारे उपाय आपल्याला डॉक्टर देतील, परंतु ते आजार होऊच नयेत, यासाठी खबरदारी आपण आजपासून घेऊ शकतो, नाही का?