शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'या' एका उपायाने तुमच्या अर्ध्याहून अधिक आरोग्य समस्या समूळ नष्ट होतील!- सद्गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 16:25 IST

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

भारतीय संस्कृतीतील एखादी गोष्ट पाश्चात्यांनी दुजोरा दिल्याशिवाय भारतीयांना पटत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. भारतीय ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनावर विश्वास न ठेवता अमेरिकन शास्त्रज्ञ हे विशेषण लागले, की लोकांचा चटकन विश्वास बसतो. सांगत आहेत अध्यात्मिक वक्ते सद्गुरू!

अलीकडच्या काळात उपास हा थट्टेचा विषय बनला आहे. परंतु, पाश्चात्य जगात भारतीय आहार पद्धतीला मान्यता मिळाली आहे. तिथले लोक आपली संस्कृती आत्मसात करू पाहत आहेत, निदान आता तरी आपण आपल्या संस्कृतीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. 

उपास हा थट्टेचा विषय नसून ती शरीरावर नियंत्रण मिळवणारी प्रभावी उपचार पद्धत आहे. लाखो रुपये खर्च करून औषध घेण्यापेक्षा, शस्त्रक्रिया करण्यापेक्षा योग्य आहारपद्धती, सवयी आत्मसात केल्या तर अध्र्याहून अधिक आरोग्यसमस्या दूर होतील.

शरीर हे यंत्र व्यवस्थित चालावे असे वाटत असेल, तर त्याला अधून मधून विश्रांती दिली पाहिजे. सतत खाण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या शरीराला रोगाचे माहेरघर बनवून ठेवले आहे. ते पुन्हा नियंत्रणात आणायचे असेल, तर तोंडावर नियंत्रण ठेवा. जेव्हा उपाशी राहाल, तेव्हाच आतल्या यंत्रणेला दुरुस्ती करण्यास संधी मिळेल. तुम्ही सतत खाऊन यंत्र सुरूच ठेवले, तर ते न सांगता बंद पडेल. 

सकाळी १० वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता जेवणाची शरीराला सवय लावून घ्या. अध्ये मध्ये भूक लागत असेल, तर भूकेवर नियंत्रण मिळवा. संयम ठेवा. रिकामे पोट तुम्हाला कामासाठी अतिरिक्त ऊर्जा देईल. सायंकाळी ७ वाजता जेवून घेतल्यामुळे पोट हलके राहील. झोपेवर ताण पडणार नाही. जडत्त्व येणार नाही. अन्न पचेल. जेवणात आणि झोपण्यात तीन तासांचे अंतर राहील. जेवल्या जेवल्या झोपण्याची सवय अतिशय घातक आहे. ती सवय आधी बदलून टाका. सूर्यास्ताआधी जेवून घ्या. दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात भूक लागत नाही. सवय होईपर्यंत खावेसे वाटत राहील, पण सवय लागली, की भूकेवर आणि रोगांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. 

एवढा वेळ पोट उपाशी ठेवल्याने अजिबात मृत्यू येत नाही. उलट आयुष्य चांगल्या ऊर्जेने, उत्साहाने तुम्ही जगू लागता. दोन घास अतिरिक्त खाण्याऐवजी दोन घास कमी खा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ही आहारशैली तुम्ही वापरात आणली, तर ५० टक्के आरोग्य समस्या दूर होतील. या आहारशैलीला पुरेशा व्यायामाची जोड दिली, तर ९० टक्के अधिक तुम्ही कार्यान्वित व्हाल. उरला प्रश्न १० टक्के दुर्धर आजारांचा, त्यासाठी लागणारे उपाय आपल्याला डॉक्टर देतील, परंतु ते आजार होऊच नयेत, यासाठी खबरदारी आपण आजपासून घेऊ शकतो, नाही का?