शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मच नव्हे, तर वास्तुशास्त्रही सांगते, रोज सायंकाळी दिवा लावावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:22 IST

दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. दिव्याची ज्योत देवाजवळच नाही, तर आपल्या मनातही प्रकाश पाडते. तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते. समईच्या ठेवणाऱ्या संथ ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले, तरी मन शांत होते. वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. 

दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते. आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पहावयास मिळतात, लहानपणापासूनच "दिवे लावा शंभर दारी, भाग्य येईल तुमच्या घरी" असे आपण शिकत आलो आहोत या दिव्याचे निरनिराळे उपयोग आता आपण पाहूयात. 

  • घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 
  • घराच्या आग्नेय दिशेला दिवा लावावा त्या मुळे घरात आजारपणे येत नाहीत (कर्पूर होम केला तर अत्युत्तम)
  • रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते.
  • घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाहीत.
  • गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो.
  • रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योती कडे दोन मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे) (यास अग्नी त्राटक म्हणतात) यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो.
  • देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते (हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो).
  • गाईच्या तुपाचा उपयोग करून कापूराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीही दूर होते (याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे) यात तुम्ही कापुराशिवाय, अत्तर, वाळलेली कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने सुद्धा टाकू शकता.