शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

अध्यात्मच नव्हे, तर वास्तुशास्त्रही सांगते, रोज सायंकाळी दिवा लावावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:22 IST

दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. दिव्याची ज्योत देवाजवळच नाही, तर आपल्या मनातही प्रकाश पाडते. तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते. समईच्या ठेवणाऱ्या संथ ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले, तरी मन शांत होते. वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. 

दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते. आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पहावयास मिळतात, लहानपणापासूनच "दिवे लावा शंभर दारी, भाग्य येईल तुमच्या घरी" असे आपण शिकत आलो आहोत या दिव्याचे निरनिराळे उपयोग आता आपण पाहूयात. 

  • घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 
  • घराच्या आग्नेय दिशेला दिवा लावावा त्या मुळे घरात आजारपणे येत नाहीत (कर्पूर होम केला तर अत्युत्तम)
  • रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते.
  • घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाहीत.
  • गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो.
  • रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योती कडे दोन मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे) (यास अग्नी त्राटक म्हणतात) यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो.
  • देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते (हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो).
  • गाईच्या तुपाचा उपयोग करून कापूराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीही दूर होते (याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे) यात तुम्ही कापुराशिवाय, अत्तर, वाळलेली कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने सुद्धा टाकू शकता.