शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 11, 2020 07:30 IST

शिक्षण हा संस्काराचा एक भाग आहे. म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. आजचे विद्यार्थी उद्याचा समाज घडवणार आहेत. समाज सुसंस्कृत बनावा असे वाटत असेल, तर बालपणीच चांगल्या मुल्यांची पेरणी व्हायला हवी.

ज्योत्स्ना गाडगीळ 

मनुष्य केवळ सुशिक्षित असून उपयोगी नाही, तर तो सुसंस्कृतदेखील असायला हवा. शिक्षणामुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात, मात्र ते शिक्षण केवळ पुस्तकी असून चालणार नाही, तर ते सर्वांगीण शिक्षण असायला हवे. आज राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत शिक्षणाबद्दल काय मार्गदर्शन केले आहे, ते थोडक्यात पाहू.

पाठशाळा असावी सुंदर, जेथे मुले मुली होती साक्षर,काम करावयासि तत्पर, शिकती जेथे प्रत्यक्ष,

हे वर्णन त्यांनी ग्रामशिक्षणाला उद्देशून केले आहे. कारण, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार प्रसार कमी प्रमाणात झाला आहे. गावांचा विकास झाला, तर शहराचा विकास होईल आणि शहरांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल. या उद्देशाने त्यांनी ग्रामीण शाळा अद्यावत शिक्षण साधनांनी युक्त असाव्या, असे सुचवले आहे. तिथे मुले-मुली असा भेद न होता, दोहोंना शिक्षणाची समान संधी मिळू शकेल.

हेही वाचा : भगवान गौतम बुद्ध सांगतात, 'उक्तीला कृतीची जोड हवी!'

जो पुढे ज्यात असे निष्णात, त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत,होऊ द्यावे अभ्यासे संशोधनात, गर्क त्याला,

सर्व मुलांना एका पठडीतले शिक्षण न देता, मुलांचा अभ्यासातील, कलेतील, कामातील कल लक्षात घेऊन त्यांना विशेष शिक्षण दिले पाहिजे. असे शिक्षण, जे भविष्यात त्यांच्या रोजगाराचे आणि उत्कर्षाचे साधन बनू शकेल. केवळ परीक्षेतील गुणांवर मुलांची गुणवत्ता ठरवणे चुकीचे ठरेल. कोणी शिक्षणात तरबेज असेल, तर कोणी चित्रकलेत, कोणाला कलाकौशल्याची आवड असेल, तर कोणाला शिवणकामाची. ही आवड लक्षात घेऊन मुलांना शिक्षण दिले, तर त्यांचे आयुष्य मार्गी लागेल.

ऐसे जीवन आणि शिक्षण, यांचे साधावे गठबंधन,प्रथमपासुनि सर्वांगीण, शिक्षण द्यावे तारतम्ये,

या पद्धतीचे शिक्षण दहावी-बारावीनंतर न देता, प्राथमिक इयत्तेपासून दिले जावे. जेणेकरून माध्यमिक इयत्तेत प्रवेश करेपर्यंत मुलांची आवड लक्षात येईल आणि त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता येईल. 

जीवनाचे प्रत्येक अंग, शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग,काम करावयाची चांग, लाज नसावी विद्यार्थ्या

कोणतेही काम त्याज्य नाही. कोणतेही काम कमी नाही. हे मुलांवर बालपणापासून बिंबवले गेले पाहिजे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे अन्य क्षेत्रांनाही उठाव दिला पाहिजे. अन्यथा बेरोजगार पदवीधारकांच्या संख्येत भर पडत राहिल. याकरीता मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र पालकांनी निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवण्यासाठी प्रोत्साहित करावे.

मुलगा वरोनि दिसे शिक्षित, काम करतांदि दिसे निष्णात,कामाची लाजचि नाही ज्यांत, जन्मास आली

आपण निवडलेल्या कामाचा आपणास सार्थ अभिमान वाटायला हवा. शिवाय, तो अभिमान सार्थही ठरवता यायला हवा. 

जीवनाचे उज्ज्वल अंग, मुले शिकतील होवोनि दंग,वाढेल गावाचा रागरंग, म्हणाल तैसा।

शिक्षण ही काळाची गरज आहे. मुलांनी विद्यार्थी दशेत खूप अभ्यास करावा, नानाविध कला आत्मसात कराव्या, भाषा शिकाव्या आणि स्वत:बरोबर सकळांचा विकास करावा. तरच प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर बनेल आणि तिच्याबरोबर देशही आत्मनिर्भर होईल.

आजचे सान सान बाळ, उद्या तरुण कार्यकर्ते होतील,गावाचा पांग फेडतील, उत्तमोत्तम गुणांनी।

शिक्षण हा संस्काराचा एक भाग आहे. म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. आजचे विद्यार्थी उद्याचा समाज घडवणार आहेत. समाज सुसंस्कृत बनावा असे वाटत असेल, तर बालपणीच चांगल्या मुल्यांची पेरणी व्हायला हवी. या सर्वाबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही देशाप्रती प्रेम वाटले पाहिजे. यासाठी राष्ट्रीय शिक्षणही दिले पाहिजे. तरच, भारतभूमीच्या अंगाखांद्यावर मोठी झालेली चिमणीपाखरे प्रदेशात उडून न जाता, मायभूमीच्या विकासासाठी झटतील. 

पढेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया! जय हिंद!

हेही वाचा : खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!