शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

"नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 11, 2020 07:30 IST

शिक्षण हा संस्काराचा एक भाग आहे. म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. आजचे विद्यार्थी उद्याचा समाज घडवणार आहेत. समाज सुसंस्कृत बनावा असे वाटत असेल, तर बालपणीच चांगल्या मुल्यांची पेरणी व्हायला हवी.

ज्योत्स्ना गाडगीळ 

मनुष्य केवळ सुशिक्षित असून उपयोगी नाही, तर तो सुसंस्कृतदेखील असायला हवा. शिक्षणामुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात, मात्र ते शिक्षण केवळ पुस्तकी असून चालणार नाही, तर ते सर्वांगीण शिक्षण असायला हवे. आज राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत शिक्षणाबद्दल काय मार्गदर्शन केले आहे, ते थोडक्यात पाहू.

पाठशाळा असावी सुंदर, जेथे मुले मुली होती साक्षर,काम करावयासि तत्पर, शिकती जेथे प्रत्यक्ष,

हे वर्णन त्यांनी ग्रामशिक्षणाला उद्देशून केले आहे. कारण, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार प्रसार कमी प्रमाणात झाला आहे. गावांचा विकास झाला, तर शहराचा विकास होईल आणि शहरांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल. या उद्देशाने त्यांनी ग्रामीण शाळा अद्यावत शिक्षण साधनांनी युक्त असाव्या, असे सुचवले आहे. तिथे मुले-मुली असा भेद न होता, दोहोंना शिक्षणाची समान संधी मिळू शकेल.

हेही वाचा : भगवान गौतम बुद्ध सांगतात, 'उक्तीला कृतीची जोड हवी!'

जो पुढे ज्यात असे निष्णात, त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत,होऊ द्यावे अभ्यासे संशोधनात, गर्क त्याला,

सर्व मुलांना एका पठडीतले शिक्षण न देता, मुलांचा अभ्यासातील, कलेतील, कामातील कल लक्षात घेऊन त्यांना विशेष शिक्षण दिले पाहिजे. असे शिक्षण, जे भविष्यात त्यांच्या रोजगाराचे आणि उत्कर्षाचे साधन बनू शकेल. केवळ परीक्षेतील गुणांवर मुलांची गुणवत्ता ठरवणे चुकीचे ठरेल. कोणी शिक्षणात तरबेज असेल, तर कोणी चित्रकलेत, कोणाला कलाकौशल्याची आवड असेल, तर कोणाला शिवणकामाची. ही आवड लक्षात घेऊन मुलांना शिक्षण दिले, तर त्यांचे आयुष्य मार्गी लागेल.

ऐसे जीवन आणि शिक्षण, यांचे साधावे गठबंधन,प्रथमपासुनि सर्वांगीण, शिक्षण द्यावे तारतम्ये,

या पद्धतीचे शिक्षण दहावी-बारावीनंतर न देता, प्राथमिक इयत्तेपासून दिले जावे. जेणेकरून माध्यमिक इयत्तेत प्रवेश करेपर्यंत मुलांची आवड लक्षात येईल आणि त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता येईल. 

जीवनाचे प्रत्येक अंग, शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग,काम करावयाची चांग, लाज नसावी विद्यार्थ्या

कोणतेही काम त्याज्य नाही. कोणतेही काम कमी नाही. हे मुलांवर बालपणापासून बिंबवले गेले पाहिजे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे अन्य क्षेत्रांनाही उठाव दिला पाहिजे. अन्यथा बेरोजगार पदवीधारकांच्या संख्येत भर पडत राहिल. याकरीता मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र पालकांनी निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवण्यासाठी प्रोत्साहित करावे.

मुलगा वरोनि दिसे शिक्षित, काम करतांदि दिसे निष्णात,कामाची लाजचि नाही ज्यांत, जन्मास आली

आपण निवडलेल्या कामाचा आपणास सार्थ अभिमान वाटायला हवा. शिवाय, तो अभिमान सार्थही ठरवता यायला हवा. 

जीवनाचे उज्ज्वल अंग, मुले शिकतील होवोनि दंग,वाढेल गावाचा रागरंग, म्हणाल तैसा।

शिक्षण ही काळाची गरज आहे. मुलांनी विद्यार्थी दशेत खूप अभ्यास करावा, नानाविध कला आत्मसात कराव्या, भाषा शिकाव्या आणि स्वत:बरोबर सकळांचा विकास करावा. तरच प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर बनेल आणि तिच्याबरोबर देशही आत्मनिर्भर होईल.

आजचे सान सान बाळ, उद्या तरुण कार्यकर्ते होतील,गावाचा पांग फेडतील, उत्तमोत्तम गुणांनी।

शिक्षण हा संस्काराचा एक भाग आहे. म्हणून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. आजचे विद्यार्थी उद्याचा समाज घडवणार आहेत. समाज सुसंस्कृत बनावा असे वाटत असेल, तर बालपणीच चांगल्या मुल्यांची पेरणी व्हायला हवी. या सर्वाबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही देशाप्रती प्रेम वाटले पाहिजे. यासाठी राष्ट्रीय शिक्षणही दिले पाहिजे. तरच, भारतभूमीच्या अंगाखांद्यावर मोठी झालेली चिमणीपाखरे प्रदेशात उडून न जाता, मायभूमीच्या विकासासाठी झटतील. 

पढेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया! जय हिंद!

हेही वाचा : खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!