शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कामात यश मिळत नाहीये? मग कामाचे स्वरूप बदलून पहा, यश नक्की मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 18:18 IST

कामात सातत्य, मेहनत, चिकाटी आणि जिद्द मनुष्याला यशस्वी बनवते.

अभिनेत्री मुक्ता बर्वे एका चित्रपटात म्हणते, 'आयुष्यात काहीतरी बाप केले पाहिजे.' पण नक्की काय, हे आपल्याला कळत नाही. प्रत्येकाला वाटते, आपण यशस्वी व्हावे, प्रसिद्ध व्हावे. यासाठी सगळे जण मेहनतदेखील करतात. परंतु कोणाला यश येते, तर कोणाला अपशय! अशा वेळी नवनवे काम शोधण्यापेक्षा कामाचे नवनवे मार्ग शोधले, तर यशाचे दार उघडू शकते. यशस्वी लोक  वेगळे काही करत नसतात, फक्त त्यांची कार्यपद्धती आपल्यापेक्षा वेगळी असते. ती कशी, हे आपण या कथेतून पाहुया.

दोन समवयस्क तरुण. एक मुका असतो, दुसरा अंध. मुका तरुण एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करत असतो, तर अंध तरुण त्याच कंपनीच्या पायरीशी बसून भीक मागत असतो. जन्मत: अपंगत्व दोघांना आलेले असूनही एकाने त्यावर मात केलेली असते, तर दुसरा दैवावर हवाला टाकून बसलेला असतो. 

मुका तरुण आपल्या अपंगत्त्वावर मात करत महिन्याला लाखो रुपये कमावतो. ऐषोआरामी जीवन जगतो. आलिशान गाडीतून ये जा करतो. हे सारे काही त्याने आपल्या मेहनतीने, प्रयत्नाने कमावलेले असते. परंतु त्याच्याच वयाचा तरुण दुसऱ्यांसमोर हात पसरण्यात आपली धन्यता मानतो. 

अंध तरुणाने मिळकत वाढावी म्हणून एक पाटी आणून त्यावर कोणाकडून लिहून घेतलेले असते, `मी अंध आहे, मला मदत करा.' ती पाटी वाचून काही जण मदत करतात, तर काही जण करत नाहीत. मुका तरुण रोजच्या वेळेत ऑफिसला येतो. येताना त्या तरुणाला पाहतो आणि त्याची पाटीही वाचतो. तो त्याच्या जवळ जातो. पाटीवरचा मजकूर बदलतो आणि त्याच्या कटोरीत पैसे टाकून जातो. अंध तरुणाला हे लक्षात येते. पण तो काही बोलणार त्याच्या आत मुका तरुण निघून जातो. 

सायंकाळी ऑफिसमधून निघताना मुका तरुण अंध तरुणाकडे डोकावतो, तर त्याच्या पाटीजवळ बरीच माया गोळा झालेली असते. तो आनंदाने तिथे जातो आणि त्याच्या पाठीवर हात ठेवत आणखी काही पैशांची भर टाकतो. अंध तरुण लगेच ओळखतो आणि त्या तरुणाला थांबवून म्हणतो, `तुम्ही तेच आहात ना, ज्यांनी सकाळी माझ्या पाटीवर काहीतरी लिहिले. त्यामुळे काय जादू झाली माहित नाही, लोक थांबून थांबून पैसे देऊ लागले. तुम्ही काय लिहिलेत हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.'

मुका तरुण आपल्या सहकाNयाला बोलावून आपण केलेला बदल वाचायला सांगतो. त्याने पाटीवर लिहिलेले असते, `हे जग सुंदर आहे, आजचा दिवस सुंदर आहे, परंतु मी अंध असल्याने तो पाहू शकत नाही.'

अशा भावनिक संदेशामुळे लोकांना त्याची दया येते शिवाय देवाने आपल्याला ही सृष्टी दिसावी म्हणून ही दृृष्टी दिली, याची जाणीव होते. 

वाक्यातील या छोट्याशा बदलामुळे मोठा परिणाम साधला जातो. एवढी साधी गोष्ट आपल्याला सुचली नाही, याचे अंध तरुणाला वाईट वाटते आणि जाणीव होते, की आपण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत होतो आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. अंध तरुण दुसऱ्या तरुणाच्या मदतीने त्या कंपनीत सफाई कामगार म्हणून नोकरी पत्करतो आणि हळू हळू आत्मनिर्भर होतो. 

हे दोन तरुण अपंगत्वावर मात करून यशस्वी होऊ शकतात, तर आपण धडधाकट असूनही यशस्वी का होऊ शकत नाही? त्यामुळे काम बदलू नका, कामाचे स्वरूप बदला. यश नक्की मिळेल.