शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शरीरावर नव्हे, तर मनावर आघात करणारा, शाहीर अनंत फंदी यांचा 'फटका!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:13 IST

अनंत फंदींच्या फटक्यात फार मोठा तात्विक उपदेश आहे असे नव्हे, पण पेशवाईच्या अखेरच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी उलाढाल झाली होती. शाहीरांच्या लावण्यांमुळे आणि रावबाजीमुळे इष्काची चटक सर्वांना लागली होती. नीतीचे बंधन फारसे उरले नव्हते. या पार्श्वभूमीवर अनंद फंदी यांचा हा फटका महत्त्वाचा मानावा लागेल.

कीर्तन, प्रवचन, शाहिरी, लावण्या, वगनाट्य या लोककलांनी आजवर समाज प्रबोधनाच्या दृष्टीने भरीव कामगिरी केली आहे. आताच्या काळात लोककलांना पूर्वीसारखे सुगीचे दिवस नसले, तरीदेखील त्या आपले अस्तित्व टिकवून आहेत. याचे श्रेय जाते, लोक कलाकारांना! आताचे लोककलाकार आपली इतर व्यावसायिक व्यवधाने सांभाळून लोककला सादर करतात, परंतु पूर्वी लोककला, याच लोककलाकारांच्या चरितार्थाचे साधन होत्या. पूर्णवेळ व्यवसाय म्हणून कलाकार त्यावर अवलंबून राहू शकत होते. कारण, त्याकाळात लोककलांचे कार्यक्रम हेच मनोरंजनाचे माध्यम होते. 

मनोरंजनातून प्रबोधन तसेच राष्ट्रकार्याचे काम लोककलाकारांनी केले. त्यातील एक नाव शाहीर अनंत फंदी. त्यांचा काव्यप्रवास विस्मयकारक आहे. त्यांच्या शब्दांना लालित्य होते, तशीच मार्मिक घाव करणारी धारही होती. म्हणून त्यांनी लिहिलेल्या अनेक काव्यरचना `फटका' म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हा फटका शरीरावर नव्हे, तर ऐकणाऱ्याच्या मनावर बसे. अशा लेखणीची आजही समाजाला गरज आहे. 

हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!

पेशवाईच्या अखेरीस राम जोशी, प्रभाकर दातार, अनंत फंदी इ. शाहिरांनी लावण्या व पोवाडे लिहून मराठी मनाची करमणूक केली. यातील बहुतेक शाहीर आपल्या अखेरच्या काळात ईशचिंतनाकडे वा परमार्थाकडे वळलेले दिसतात. परंतु हे शाहीर प्रथमत: प्रतिभावान कवी आहेत आणि नंतर त्यांनी डफ, तुणतुणे हातात घेऊन त्या कवीतांना पोवाड्याच्या ढंगात पेश केले.

अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते[१]. शंकराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.

अठराव्या शतकातील अनंत फंदी हा एक रसिकतेने शृंगारिक लावण्या लिहिणारा शाहीर होता. पण देवी अहिल्याबाई यांच्या सांगण्यावरून अनंत फंदी परमार्थाकडे वळले. देवधर्माची पदे ते जुळवू लागले. पण त्यांची प्रवृत्ती उपदेशपर फटके लिहिण्याची होती. त्यांनी लिहिलेले अनेक फटके प्रसिद्ध आहे. पैकी एका फटक्यातील ओळी सर्वांच्याच परिचयाच्या आहेत.

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको,संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको।चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलू नको,अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको,नास्तिकपणात शिरुनि जगाचा बोल आपणा घेऊ नको,मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको, दो दिवसाची जाइल काया अपेश माथा घेऊ नको,स्नोहासाठी पदरमोड कर परि जामिन कोणा राहू नको।

अनंत फंदींच्या फटक्यात फार मोठा तात्विक उपदेश आहे असे नव्हे, पण पेशवाईच्या अखेरच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी उलाढाल झाली होती. शाहीरांच्या लावण्यांमुळे आणि रावबाजीमुळे इष्काची चटक सर्वांना लागली होती. नीतीचे बंधन फारसे उरले नव्हते. या पार्श्वभूमीवर अनंद फंदी यांचा हा फटका महत्त्वाचा मानावा लागेल.

या कवनात कवी म्हणतो, की मनुष्या, उगाच भलत्यासलत्या फंदात पडून आयुष्य वाया घालवू नकोस. सुखाने घरीच आपला संसार कर. खोटे कधी बोलू नकोस. परस्त्री व परधन यांचा लोभ धरू नकोस. तू सदा नम्र वृत्ती धारण कर. नास्तिक बनू नकोस. आईवडिलांवर रागवू नकोस. पोटासाठी भलत्यासलत्या उठाठेवी करू नकोस. कोणास वर्म काढून बोलू नकोस. मी मोठा शहाणा असा गर्व करू नकोस. गरिबावर व्यर्थ गुरकावू नकोस. सत्ता आज असेल, पण उद्या नाही. चुकीच्या व्यक्तींसाठी जामीन राहू नकोस. पैजेचा विडा उचलू नकोस. उगीच भीक मागू नकोस. कष्टाची तयारी ठेव.

असे हे शाहिरांचे मार्मिक बोल स्मरणात ठेवूया आणि धोपट मार्गाचा प्रवास करूया. 

हेही वाचा : प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास