शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

या जगात पूर्ण सुखी कोणीच नाही, तरी दुसऱ्याचे सुख आपल्यापेक्षा जास्त का वाटते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 07:00 IST

'जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधून पाहे' असे समर्थ रामदास स्वामी सांगतात, त्याचा प्रत्यय या गोष्टीतुन येतो. 

एक राजा फार आजारी पडला. त्याला बरा करण्यासाठी लांबून-लांबून उपचार करणारे आले, पण त्याचा त्याला उपयोग झाला नाही. लोक दु:खी झाले. आता काय करावे?

अचानक एक साधू आला. त्याने राजाची तब्येत पाहिली. तो म्हणाला, `महाराज अगदी अल्पावधीत बरे होतील. मात्र, त्यांना घालायला एखादा अशा माणसाचा सदरा आणा, जो सुखी असेल.'

राजाचा दिवाण म्हणाला, 'महाराज, ही तर अतिशय सोपी गोष्ट आही.'

राजमहालातून थोड्या अंतरावर एक शेठजी राहत होता. दिवाण स्वत: तिकडे गेला. म्हणाला, `शेठजी, महाराजांना बरे करण्यासाठी एखाद्या सुखी माणसाचा सदरा हवा आहे. म्हणून आपला एखादा सदरा आम्हाला देता का?'

शेठजी म्हणाला, `दिवाण, एक काय, चार घेऊन जा. पण, एक गोष्ट सांगतो, दुनियेला सुखी दिसत असलो, तरी मी सुखी नाही.'

दिवाण दुसऱ्या शेठजींकडे गेला. त्यांच्याकडेही त्यांनी सदरा मागितला. ते शेठजी म्हणाले, `मी कसला सुखी, रोज धंद्यात चढ-उतार सुरू असतात. आता तर देवी लक्ष्मीसुद्धा माझ्यावर रागावली आहे की काय असे वाटू लागले आहे. माझे नशीब माझ्यावर रुसले आहे, मग मी कसा काय सुखी? उलट तुम्हालाच एका वेळी दोन जण सुखी दिसले, तर मझ्यासाठीही एक सदरा घेऊन या.

दिवाण चकित झाला. खाऊनपिऊन सुखी असलेले सधन कुटुंबातले लोक असे रडगगाणे गाऊ लागले, तर मध्यमवर्गीय आणि गरीबांनी काय बोलावे? आपल्याला वाटले होते, तेवढे हे सोपे काम नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, त्याप्रमाणे `जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मन तूचि शोधून पाहे.' त्याप्रमाणे दिवाणजींनी आपला शोध सुरू ठेवला.

गावभर भटकंती करूनही एकही व्यक्ती सुखी असू नये, याचे दिवाणजींना आश्चर्य वाटले. खिन्न होऊन नदीमार्गे राजमहालाची वाट चालत येत असता, नदीच्या पैलतीरावरून बासरीचे मंजूळ सूर ऐकू आले. दिवाणाने विचार केला, शांत, आनंदी, सुखी माणसूच गाणी गाऊ शकतो, वाजवू शकतो, आनंद व्यक्त करू शकतो. याचा अर्थ आपला शोध संपला.

दिवाणजी एका नाविकाला सोबत घेऊन नदीच्या पैलतीरी जाऊ लागे. सायंकाळची वेळ, नदीचा शांत डोह, वल्हवाबरोबर पाण्यात उठणारे तरंग, पक्ष्यांनी धरलेली परतीची वाट, डोंगराआड झालेला सूर्यास्त आणि या सगळ्यात कानावर पडत असलेले बासरीचे मंजळ सूर ऐकून दिवाणजींचा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. त्या व्यक्तीला भेटण्यास उत्सुक झालेले दिवाणजी पैलतीरावर जाऊन पोहोचले. एक तरुण स्वत:मध्ये मग्न होऊन बासरीवादन करत होता. 

तो तरुण एका झाडाच्या आडोशाला बसला होता. चहूकडे अंधार होता. दिवाण तिथे गेले आणि त्याची स्वरसमाधी भंग करत म्हणाले. `युवका, तू भेटलास ते फार बरे झाले. तुझ्यासारखा सुखी माणूस आपल्या गावात कुठेच नाही. अशाच सुखी माणसाचा सदरा आपल्या राजाला मिळाला, तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, असे एका साधु महाराजांनी सांगितले आहे. देतोस का रे तुझा सदरा?'

तो युवक नम्रपणे म्हणाला, `महाराज नक्कीच दिला असता, परंतु माझ्याकडे सदराच काय, तर लज्जारक्षणापुरतेही कपडे नाहीत. मी एक भणंग कलाकार आहे. स्वांतसुखाय जगतोय. हा आत्मानंदाचा सदरा मी कमावला आहे, तो देता येण्यासारखा नाही. राजेसाहेबांना तो प्रयत्नपूर्वक मिळवावा लागेल.'

युवकाच्या बोलण्यामुळे दिवाणजींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि डोळ्यासमोर चिंतातूर राजाचा चेहरा उभा राहिला. अतिविचाराने ग्रासलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करते आणि त्याच सोडवत बसते. याउलट, ज्याला सुखी व्हायचे, ती व्यक्ती आपल्या आवाक्यात आहेत, तेवढे प्रयत्न करते आणि बाकीचा भार देवावर सोपवून मोकळी होते. ही वृत्ती म्हणजेच सुखी माणसाचा सदरा. दिवाणजींना साधूंच्या बोलण्याचा रोख कळला. सुखी माणसाचा सदरा उसना मिळत नाही, तो कमवावा लागतो. 

तुम्हीदेखील दु:खी असाल, तर दसऱ्यापासून केदार शिंदे दिग्दर्शित 'सुखी माणसाचा सदरा' या आगामी मालिकेत तुम्हाला सुखी माणसाचा सदरा गवसतो, का ते पहा!