शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रपंच सोडून परमार्थ करणे आजवर कोणालाच जमले नाही; मग दोन्हीची सांगड कशी घालायची?जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 07:00 IST

सर्व संतांनीदेखील प्रपंच केला आणि परमार्थ केला, त्यामुळे प्रपंच सोडण्याचा विचार करू नका! संसार प्रपंच सुटला तरी देह प्रपंच मरेपर्यंत करावाच लागतो!

आध्यात्माची वाट सोपी आहे, तेवढीच कठीण. सोपी कोणासाठी? ज्यांनी आध्यात्म म्हणजे काय, हे समजून घेतले, त्यांच्यासाठी आणि कठीण इतरांसाठी! कर्मकांड, उपास-तापास, रुढी, पूजापाठ, यज्ञयाग या गोष्टींमध्ये जे अडकतात, त्यांच्यासाठी आध्यात्माची वाट बिकट होत जाते. कारण, या गोष्टींमध्ये काही कमतरता राहिली, की त्याचाच विचार करत, ते स्वत:ला दोष देत बसतात. मग या गोष्टी निरर्थक आहेत का? तर नाही! त्यादेखील भगवंत प्राप्तीचे साधन आहे. परंतु, साधनाचा वापर साध्य मिळेपर्यंतच करायचा असतो. साधनाला साध्य समजण्याची चूक करू नये. जीन्याचा वापर खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी किंवा वरून खाली येण्यासाठी होतो. मग जीना हे आपले ध्येय आहे का? तिथेच आपल्याला थांबायचे आहे का? नाही. त्याचा वापर करून पुढच्या मार्गाला लागायचे आहे. पण लक्षात कोण घेतो? 

अनेकांना वाटते, प्रपंच सोडला तर परमार्थ होतो. अशाच विचाराने एक मनुष्य घर दार सोडून अरण्यात गेला. दिवसभर रानफळे खाऊन राहिला. नदीचे झुळूझुळू वाहणारे पाणी प्यायला. रात्री निवाऱ्याची गरज भासू लागली. श्वापदांची भीती वाटू लागली. अंधार गडद होऊ लागला. रात्र झाडावर काढली. दुसऱ्या दिवशी झावळ्या गोळा करून राहुटी बांधली. शेकोटी रचली. कंदमुळांवर गुजराण केली. रोज रोज फळे तोडायचा कंटाळा , म्हणून त्याने एकाच वेळी जास्त फळे गोळा करून राहुटीत ठेवली. उंदिर मामांना पत्ता लागला. त्यांचा बंदोबस्त करायला एक मांजर पाळली. मांजरीला रोज उंदिर कसे पुरवणार? तिला दूध मिळावे म्हणून गाय पाळली. गायीला चारा खाल्याशिवाय दूध कसे येणार? म्हणून तिला चरायला नेण्यासाठी जवळच्या गावातला माणूस नेमला. माणसाला मीठ भाकरीची सोय लावून देण्यासाठी त्याचे लग्न लावून दिले. या व्यापात परमार्थ बाजूला राहून प्रपंच पुन्हा मागे लागला. तो गृहस्थ पुन्हा घरी परतला. तात्पर्य, प्रपंच सोडून परमार्थ करता येत नाही. प्रपंचातील जबाबदाऱ्या झटकल्या, तरी देहाचा प्रपंच करावाच लागतो.

म्हणून संतांनी स्वत:च्या उदाहरणातून प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून दिली. खुद्द माऊलीसुद्ध म्हणते,

म्हणोनि योगाचिया वाटा, जे निघाले गा सुभटा,तया दु:खाचिया वाटा, भागा आला।

योगसाधना ही सामान्य लोकांसाठी नाही. ती खडतर तपश्चर्या आहे. ती योगी, हटयोगीच करू जाणे. सामान्य माणसाने तो मार्ग अवलंबिला, तर त्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागतील. मग त्याने परमार्थ कसा साधावा? तर केवळ नाम:स्मरणाने, सत्कार्याने, सेवेने! प्रपंचात राहून परमार्थ करायचा असता़े देवाला शोधायला अरण्यात जाऊ नका. तो आपल्यात आहे, आपल्या सभोवती आहे. त्याला ओळखा. 

तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, `नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण!' परमार्थ मार्गातील आजवरील उदाहरणे पहा, संत सेना न्हावी, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी यांनीसुद्धा प्रपंचातील जबाबदाऱ्या सांभाळून देवाला आपलेसे केलेच ना? अगदी समर्थ रामदासांनीदेखील संसार केला, तोही विश्वाचा! म्हणून आपणही प्रपंचात परमार्थ कसा साधता येईल, याचा प्रयत्न करूया.