शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:39 IST

प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!

सुटीच्या काळात फेरफटका मारण्यासाठी एक माणूस समुद्रकिनारी गेला. हवामानाचा अंदाज घेत त्याने एकट्याने समुद्रसफारी करण्याचा निर्णय घेतला. एक नाव घेऊन तो समुद्रसफारीला निघाला. लाटांवरून नौका वर खाली डुचमळत होती. सुरुवातीला थोडी भीती वाटत हळू हळू तो सरावला. परंतु, समुद्रसफारीचा आनंद घेत आपण किनाऱ्यापासून बरेच दूर आलो आहोत, हे त्याच्या लक्षात येताच त्याने नाव परत नेण्यासाठी वळवली. अचानक पाण्यामध्ये भोवरा तयार झाला आणि पाहता पाहता लाटांचे वेटोळे नावेला गोल गोल घुमवू लागले.

नावेत बसलेला माणूस देवाचे नाव घेत जीव मुठीत घेऊन प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागला. त्या भोवऱ्यात नाव अशीकाही अडकली, की नावेचा चुराडा झाला. सुदैवाने तो वाचला आणि तो भोवरा शांत झाल्यावर लाटेसरशी दूर निर्जन बेटावर फेकला गेला. 

त्याची शुद्ध हरपली होती. तो शुद्धीवर आला तेव्हा सभोवताली कोणीच नाही पाहून खूप घाबरला. त्याला सगळा प्रसंग आठवला. आपण जिवंत आहोत, याचा त्याला आनंद वाटला. त्याने मनोमन देवाचे आभार मानले. देवाला सांगितले, `तू जगवले आहेस तर आता पुढे जाण्याचा मार्गही तूच दाखव!'

भूकेची वेळ झाली. तिथल्या जंगलात वणवण फिरून त्याने फळे गोळा केली आणि एक रात्र तिथल्या भयाण जंगलात वास्तव्य केले. पुढचा मार्ग दिसेपर्यंत तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु जंगली श्वापदांची भीती होतीच. म्हणून त्याने काट्याकुट्या गोळा करून झोपडी बांधली. बऱ्याच मेहनतीने झोपडी बांधल्यावर त्याने स्वत:चीच पाठ थोपटली, तेवढ्यात... वातावरणात एकाएक बदल झाला. निरभ्र आकाशात काळे ढग गोळा झाले आणि कडाड कडकड अशी वीज चमकली आणि क्षणार्धात वीज कोसळून झोपडीचा भूगा झाला. झोपडीला लागलेल्या आगीच्या ज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या.

तो माणूस देवाला आणि दैवाला दोष देत कपाळाला हात लावून आक्रोश करू लागला. देवाला वाट्टेल ते बोलू लागला. काही वेळात तिथे मोठा आवाज आला आणि वर आर्मीचे हेलिकॉप्टर दिसले. त्यातून दोन माणसं दुर्बिणीने झोपडीच्या दिशेने पाहत होती. तिथे माणूस दिसताच त्यांनी बचाव कार्य सुरू केले आणि अवघ्या काही मिनीटांत त्या माणसाला निर्जन बेटावरून सुखरूप त्याच्या जागी पोहोचवले. झोपडी जळली म्हणून देवाला दोष देणारा तो, जळत्या झोपडीकडे लक्ष वेधून देवदूतांना पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानू लागला.

म्हणून प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!