शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:39 IST

प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!

सुटीच्या काळात फेरफटका मारण्यासाठी एक माणूस समुद्रकिनारी गेला. हवामानाचा अंदाज घेत त्याने एकट्याने समुद्रसफारी करण्याचा निर्णय घेतला. एक नाव घेऊन तो समुद्रसफारीला निघाला. लाटांवरून नौका वर खाली डुचमळत होती. सुरुवातीला थोडी भीती वाटत हळू हळू तो सरावला. परंतु, समुद्रसफारीचा आनंद घेत आपण किनाऱ्यापासून बरेच दूर आलो आहोत, हे त्याच्या लक्षात येताच त्याने नाव परत नेण्यासाठी वळवली. अचानक पाण्यामध्ये भोवरा तयार झाला आणि पाहता पाहता लाटांचे वेटोळे नावेला गोल गोल घुमवू लागले.

नावेत बसलेला माणूस देवाचे नाव घेत जीव मुठीत घेऊन प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागला. त्या भोवऱ्यात नाव अशीकाही अडकली, की नावेचा चुराडा झाला. सुदैवाने तो वाचला आणि तो भोवरा शांत झाल्यावर लाटेसरशी दूर निर्जन बेटावर फेकला गेला. 

त्याची शुद्ध हरपली होती. तो शुद्धीवर आला तेव्हा सभोवताली कोणीच नाही पाहून खूप घाबरला. त्याला सगळा प्रसंग आठवला. आपण जिवंत आहोत, याचा त्याला आनंद वाटला. त्याने मनोमन देवाचे आभार मानले. देवाला सांगितले, `तू जगवले आहेस तर आता पुढे जाण्याचा मार्गही तूच दाखव!'

भूकेची वेळ झाली. तिथल्या जंगलात वणवण फिरून त्याने फळे गोळा केली आणि एक रात्र तिथल्या भयाण जंगलात वास्तव्य केले. पुढचा मार्ग दिसेपर्यंत तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु जंगली श्वापदांची भीती होतीच. म्हणून त्याने काट्याकुट्या गोळा करून झोपडी बांधली. बऱ्याच मेहनतीने झोपडी बांधल्यावर त्याने स्वत:चीच पाठ थोपटली, तेवढ्यात... वातावरणात एकाएक बदल झाला. निरभ्र आकाशात काळे ढग गोळा झाले आणि कडाड कडकड अशी वीज चमकली आणि क्षणार्धात वीज कोसळून झोपडीचा भूगा झाला. झोपडीला लागलेल्या आगीच्या ज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या.

तो माणूस देवाला आणि दैवाला दोष देत कपाळाला हात लावून आक्रोश करू लागला. देवाला वाट्टेल ते बोलू लागला. काही वेळात तिथे मोठा आवाज आला आणि वर आर्मीचे हेलिकॉप्टर दिसले. त्यातून दोन माणसं दुर्बिणीने झोपडीच्या दिशेने पाहत होती. तिथे माणूस दिसताच त्यांनी बचाव कार्य सुरू केले आणि अवघ्या काही मिनीटांत त्या माणसाला निर्जन बेटावरून सुखरूप त्याच्या जागी पोहोचवले. झोपडी जळली म्हणून देवाला दोष देणारा तो, जळत्या झोपडीकडे लक्ष वेधून देवदूतांना पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानू लागला.

म्हणून प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!