शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

वय वाढले तरी हरकत नाही, मनाला तरुण ठेवायचे असेल तर 'हा' एक उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:00 IST

वयोमानानुसार शरीरात होणारे बदल स्वीकारावेच लागतात, पण मनाचा उत्साह कायम असेल तरच जगण्याची उमेद कायम राहते. ती टिकवण्यासाठी हा सोपा उपाय...!

वय वाढत जाते तसे आपण केवळ शरीराने नाही तर मनानेही पोक्त होत जातो. किंबहुना आपण जितक्या लवकर मनाने पोक्त होतो, तितक्या वेगाने शरीराने पोक्त होत जातो. जे लोक मनाने तरुण राहतात ते ऐंशीच्या घरात पोहोचले तरी वृद्ध वाटत नाहीत. असा उत्साहाचा झरा बनायचे असेल तर मानसशास्त्राचा तोडगा तुम्हाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आजमावून पाहता येईल. 

ज्यांचे वय पन्नाशीच्या पुढे आहे त्यांनी आपण आपल्या खऱ्या वयापेक्षा दहा बारा वर्षांनी लहान आहोत असा नित्य विचार करावा. वरकरणी तुम्हाला या उपायात काहीच तथ्य नाही असे वाटेल. परंतु जेव्हा तुम्ही मनापासून हा प्रयोग सुरू कराल, तेव्हा आपोआपच तुम्हाला त्याची प्रचिती येईल. 

यामागील मानसशास्त्रीय कारण जाणून घेऊ. आपल्या आयुष्याचा सुमारे एक चतुर्थांश भाग झोपण्यात जातो. या झोपेच्या कालावधीत देहविस्मृती होते. आपल्या वयातून हा देह विस्मृतीचा काळ वजा केला, तर आपल्याला आताच्या वयापेक्षा दहा बारा वर्षे कमी वय मिळेल. हेच आपले खरे वय आहे, असे मानून त्यानुसार तुमच्या ध्येयाप्रती किंवा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाप्रती आचरण सुरू करा. 

तसे केल्यामुळे कर्तबगारी करण्यास हुरूप येईल. देहावर आरोग्याचे तेज दिसू लागेल. वृद्धापकाळ सुरू होताच लोक हे जग कधीही सोडून जावे लागेल अशा आविर्भावात दु:खी, कष्टी राहू लागतात. सरकारने सेवानिवृत्त ठरवले की लोक आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखे वागू लागतात. यावर हा उपाय प्रभावी ठरतो. 

हा तोडगा आजच्या काळात तरुणांनाही अतिशय उपयुक्त ठरू शकतो. वाढलेले वय, अपूर्ण स्वप्ने, विवाहास विलंब, आर्थिक अडचणी आणि रोगराईमुळे त्रस्त झालेला आजचा तरुण प्रचंड नैराश्याचे जीवन जगत आहे. त्याला वाटते, जादुची कांडी फिरावी आणि मागची दहा वर्षे परत मिळावी. मानसशास्त्राने ही कांडी आपल्याच हातात असल्याचे म्हटले आहे. 

मनामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. आपण ते आजमावत नाही. परंतु एकदा का एखादी गोष्ट मनाने घेतली, की ध्येयपूर्ती झाल्याशिवाय मन स्वस्थ बसू देत नाही. अशा मनाला उभारी देण्यासाठी आपल्या वास्तवातील वयापेक्षा दहा वर्षे मागे जाण्याची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाढत्या वयावर शरीरावर मात करता आली नाही, तरी मनाने आमरण चीरतरुण जगता येते.