शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पूजेत लक्ष लागत नाही? मग स्वामी समर्थांनी सांगितलेला उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 09:30 IST

देवा, नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात. संसाराचे विषय मनात घोळत राहतात, काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते. अशी माझी अवस्था होत असेल, तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ? त्यावर हे उत्तर!

संत नामदेव महाराजांचा एक प्रख्यात अभंग आहे, 'अमृताहुनी गोड  नाम तुझे देवा...' यात संत नामदेव देवाचे नाव किती गोड आहे हे सांगताना अमृताशी तुलना करतात. नामदेवांचे म्हणणे योग्य असले, तरी तुमचा आमचा अनुभव असा, की नामाची गोडी चाखता चाखता आम्हाला लगेच ग्लानी येते. जसे गोडाचे जेवण झाल्यावर येते, अगदी तशीच! ही अवस्था जाणूनच संत नामदेव या अभंगात म्हणतात, 

कीर्तनी बैसता निद्रे नागविले,मन माझे गुंतले विषयसुख।

देवा, नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात. संसाराचे विषय मनात घोळत राहतात, काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते. अशी माझी अवस्था होत असेल, तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ? 

हाच प्रश्न एका स्वामी भक्ताने स्वामींजवळ उपस्थित केला. तो म्हणाला, 'स्वामी देवाचे नाव घेताक्षणी मनात विचारचक्र सुरू होतं. जपाची माळ ओढावी, तर प्रत्येक मन्यागणिक एक एक विचार पुढे ढकलला जातो. मग माझ्याकडून भक्ती घडेल तरी कशी? आपणच उपाय सांगा.'

यावर स्वामी म्हणाले, 'तुझ्या मालकीची दोन घरे आहेत ना? एकात तू राहतोस आणि दुसऱ्यात तुझा भाडेकरू! बरोबर ना? तुला तुझ्या हक्काच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही, पण तू उद्या एकएक तुझ्या भाडेकरूला घराबाहेर निघ म्हटलं, तर तो तुझे ऐकेल का? नाही ना? तो रागवेल, भांडेल, बरीच कटकट करेल आणि त्याची मुदत संपली की तिथून निघून जाईल. मग तुझे दुसरे घरही मोकळे होईल. त्याचप्रमाणे तुझे एक मन देवाला समर्पित आहे. परंतु मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजूनही षड्विकार वास करत आहेत. त्यांना घालवणे सोपे नाही. त्यासाठी नामःस्मरण हाच उपाय आहे. नामःस्मरणाचा धोशा सुरू ठेव. त्यांना तिथून पळ काढावाच लागेल. म्हणून पूजेत, नामःस्मरणात मन रमले नाही, तरी नामःस्मरण सुरू ठेव. तू तुझे कर्म करत राहा. एक ना एक दिवस मनापासून नामस्मरण नक्की घडेल.' 

स्वामींनी दिलेला उपाय आपणही अमलात आणूया आणि निःशंक आणि निर्भय मनाने स्वामींना शरण जाऊया. स्वामी होsss!