शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पूजेत लक्ष लागत नाही? मग स्वामी समर्थांनी सांगितलेला उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 09:30 IST

देवा, नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात. संसाराचे विषय मनात घोळत राहतात, काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते. अशी माझी अवस्था होत असेल, तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ? त्यावर हे उत्तर!

संत नामदेव महाराजांचा एक प्रख्यात अभंग आहे, 'अमृताहुनी गोड  नाम तुझे देवा...' यात संत नामदेव देवाचे नाव किती गोड आहे हे सांगताना अमृताशी तुलना करतात. नामदेवांचे म्हणणे योग्य असले, तरी तुमचा आमचा अनुभव असा, की नामाची गोडी चाखता चाखता आम्हाला लगेच ग्लानी येते. जसे गोडाचे जेवण झाल्यावर येते, अगदी तशीच! ही अवस्था जाणूनच संत नामदेव या अभंगात म्हणतात, 

कीर्तनी बैसता निद्रे नागविले,मन माझे गुंतले विषयसुख।

देवा, नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात. संसाराचे विषय मनात घोळत राहतात, काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते. अशी माझी अवस्था होत असेल, तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ? 

हाच प्रश्न एका स्वामी भक्ताने स्वामींजवळ उपस्थित केला. तो म्हणाला, 'स्वामी देवाचे नाव घेताक्षणी मनात विचारचक्र सुरू होतं. जपाची माळ ओढावी, तर प्रत्येक मन्यागणिक एक एक विचार पुढे ढकलला जातो. मग माझ्याकडून भक्ती घडेल तरी कशी? आपणच उपाय सांगा.'

यावर स्वामी म्हणाले, 'तुझ्या मालकीची दोन घरे आहेत ना? एकात तू राहतोस आणि दुसऱ्यात तुझा भाडेकरू! बरोबर ना? तुला तुझ्या हक्काच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही, पण तू उद्या एकएक तुझ्या भाडेकरूला घराबाहेर निघ म्हटलं, तर तो तुझे ऐकेल का? नाही ना? तो रागवेल, भांडेल, बरीच कटकट करेल आणि त्याची मुदत संपली की तिथून निघून जाईल. मग तुझे दुसरे घरही मोकळे होईल. त्याचप्रमाणे तुझे एक मन देवाला समर्पित आहे. परंतु मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजूनही षड्विकार वास करत आहेत. त्यांना घालवणे सोपे नाही. त्यासाठी नामःस्मरण हाच उपाय आहे. नामःस्मरणाचा धोशा सुरू ठेव. त्यांना तिथून पळ काढावाच लागेल. म्हणून पूजेत, नामःस्मरणात मन रमले नाही, तरी नामःस्मरण सुरू ठेव. तू तुझे कर्म करत राहा. एक ना एक दिवस मनापासून नामस्मरण नक्की घडेल.' 

स्वामींनी दिलेला उपाय आपणही अमलात आणूया आणि निःशंक आणि निर्भय मनाने स्वामींना शरण जाऊया. स्वामी होsss!